शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

कांदाटी खोरे अद्याप संपर्कहीनच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

बामणोली : मागील आठवड्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवसांत सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. यामुळे शिवसागर ...

बामणोली : मागील आठवड्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवसांत सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. यामुळे शिवसागर जलाशयापलीकडे असणारी कांदाटी खोऱ्यातील तीसपेक्षा अधिक गावे अद्यापही संपर्कहीनच आहेत.

कांदाटी खोरे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर सातारा जिल्ह्यात आहे. या परिसरातील सोनाडी, दरे, पिंपरी, आकल्पे, लामज, निवळी, वाघावळे, उचाट, मेटसिंदी, पर्वत, शिंदी, कांदाट, कांदाट बन, आरव, मोरणी, सालोशी, कुसापूर, आडोशी, माडोशी, रवदी, शेल्टी, तांबी, उत्तेश्वर, आकल्पे मुरा, लामज मुरा, पिंपरी मुरा, अहिरमुरा या प्रत्येक गावामध्ये नुकसानकारक पाऊस पडला. दरडी कोसळून रस्ते, भातशेती गाडली गेली आहे.

ओढ्याकाठी असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या भातशेतात पाणी शिरून भात खाचरे गाडली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. रस्त्यावरच वीसपेक्षा अधिक ठिकाणी दरडी पडल्या आहेत. गुरुवार, दि. २२ रोजी लामज मुरा येथील संदीप गंगाराम ढेबे हे जनावरे लामज व वाघावळे गावांमध्ये असणाऱ्या माकड दरा या गावच्या डोंगरामध्ये दिवसा गुरे चारत होते. सायंकाळी चारच्या सुमारास या डोंगरात प्रचंड मोठी दरड कोसळली. संपूर्ण डोंगर कोसळला. या डोंगरात त्यांची सत्तर जनावरे गाई, म्हैशी गाडल्या गेल्या. संदीप ढेबे थोडक्यात बचावले आहेत. ते गंभीर जखमी आहेत. दीड हजार फूट डोंगरातून ते पायथ्याशी असणाऱ्या वाघावळे गावात दरडीबरोबर आले. त्यांना गावकऱ्यांनी मुसळधार पावसात रात्रीच्या वेळी डोली करून रात्रभर डोंगरातून चालत तापोळा येथे दवाखान्यात हलविले. त्यांना बोलता येत नाही. पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याला पाठविले आहे.

त्या दरडीने वाघावळे गावाची अर्धी भातशेती गाडली आहे, तेव्हापासून वीज बंद आहे. फोन बंद आहेत. रस्ते बंद आहेत. कोणाचा कोणाशी संपर्क नाही. शेजारच्या गावात काय घडले कोणाला काहीही कळत नाही. स्थानिक लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. आस्मानी संकट उभे ठाकले आहे.

कोट

माझी आकल्पे गावातील पाच एकर भातशेतीसह सेंद्रिय शेती दरड कोसळून गाडली आहे. रस्त्यावर दरड कोसळून सहा दिवसांपासून गावांचा संपर्क तुटला आहे. अजूनही संततधार पाऊस कोसळत आहे. जवळील गावांमध्ये काय घडले आहे, याचा शेजारील गावांना थांगपत्ता नाही. पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनी तुटल्याने प्यायला पाणी नाही. आम्ही शंभर वर्षे पाठीमागे गेलो आहोत.

- शशी भातोसे,

शेतकरी आकल्पे, ता. महाबळेश्वर

फोटो २७बामणोली

वाघावळे येथील माकड दरा डोंगर कोसळून संदीप ढेबे यांची सत्तर जनावरे गाडली गेली होती. तसेच भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. (छाया : लक्ष्मण गोरे)