शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

कांदाटी खोरे अद्याप संपर्कहीनच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

बामणोली : मागील आठवड्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवसांत सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. यामुळे शिवसागर ...

बामणोली : मागील आठवड्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवसांत सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. यामुळे शिवसागर जलाशयापलीकडे असणारी कांदाटी खोऱ्यातील तीसपेक्षा अधिक गावे अद्यापही संपर्कहीनच आहेत.

कांदाटी खोरे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर सातारा जिल्ह्यात आहे. या परिसरातील सोनाडी, दरे, पिंपरी, आकल्पे, लामज, निवळी, वाघावळे, उचाट, मेटसिंदी, पर्वत, शिंदी, कांदाट, कांदाट बन, आरव, मोरणी, सालोशी, कुसापूर, आडोशी, माडोशी, रवदी, शेल्टी, तांबी, उत्तेश्वर, आकल्पे मुरा, लामज मुरा, पिंपरी मुरा, अहिरमुरा या प्रत्येक गावामध्ये नुकसानकारक पाऊस पडला. दरडी कोसळून रस्ते, भातशेती गाडली गेली आहे.

ओढ्याकाठी असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या भातशेतात पाणी शिरून भात खाचरे गाडली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. रस्त्यावरच वीसपेक्षा अधिक ठिकाणी दरडी पडल्या आहेत. गुरुवार, दि. २२ रोजी लामज मुरा येथील संदीप गंगाराम ढेबे हे जनावरे लामज व वाघावळे गावांमध्ये असणाऱ्या माकड दरा या गावच्या डोंगरामध्ये दिवसा गुरे चारत होते. सायंकाळी चारच्या सुमारास या डोंगरात प्रचंड मोठी दरड कोसळली. संपूर्ण डोंगर कोसळला. या डोंगरात त्यांची सत्तर जनावरे गाई, म्हैशी गाडल्या गेल्या. संदीप ढेबे थोडक्यात बचावले आहेत. ते गंभीर जखमी आहेत. दीड हजार फूट डोंगरातून ते पायथ्याशी असणाऱ्या वाघावळे गावात दरडीबरोबर आले. त्यांना गावकऱ्यांनी मुसळधार पावसात रात्रीच्या वेळी डोली करून रात्रभर डोंगरातून चालत तापोळा येथे दवाखान्यात हलविले. त्यांना बोलता येत नाही. पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याला पाठविले आहे.

त्या दरडीने वाघावळे गावाची अर्धी भातशेती गाडली आहे, तेव्हापासून वीज बंद आहे. फोन बंद आहेत. रस्ते बंद आहेत. कोणाचा कोणाशी संपर्क नाही. शेजारच्या गावात काय घडले कोणाला काहीही कळत नाही. स्थानिक लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. आस्मानी संकट उभे ठाकले आहे.

कोट

माझी आकल्पे गावातील पाच एकर भातशेतीसह सेंद्रिय शेती दरड कोसळून गाडली आहे. रस्त्यावर दरड कोसळून सहा दिवसांपासून गावांचा संपर्क तुटला आहे. अजूनही संततधार पाऊस कोसळत आहे. जवळील गावांमध्ये काय घडले आहे, याचा शेजारील गावांना थांगपत्ता नाही. पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनी तुटल्याने प्यायला पाणी नाही. आम्ही शंभर वर्षे पाठीमागे गेलो आहोत.

- शशी भातोसे,

शेतकरी आकल्पे, ता. महाबळेश्वर

फोटो २७बामणोली

वाघावळे येथील माकड दरा डोंगर कोसळून संदीप ढेबे यांची सत्तर जनावरे गाडली गेली होती. तसेच भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. (छाया : लक्ष्मण गोरे)