शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

रिंगावण यात्रा यशस्वी करावी

By admin | Updated: November 19, 2014 23:27 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : आढावा बैठकीत सर्व विभागांना दिल्या सूचना

म्हसवड : ‘येथील रिंगावण यात्रा महाराष्ट्रातील प्रमुख यात्रांपैकी एक असून, यात्रेस लाखो भाविक उपस्थित राहतात. त्यांची गैरसोय होऊ नये, यात्रा सुरळीत व शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाने सर्व विभागांशी समन्वय ठेवून यात्रा यशस्वी करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.सिद्धनाथ मंदिर परिसरातील भक्त निवासात रिंगावण यात्रेसाठी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार महेश पाटील, नगराध्यक्ष विजय सिन्हा, अजितराव राजेमाने. उपविभागीय पोलीस अधिकारी माखनेकर, नगरसेवक विजय धट, सुरेश म्हेत्रे, मुख्याधिकारी पल्लवी मोरे-पाटील, युवराज सूयर्वंशी, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी गुरव, सचिव राजकुमार गुरव, सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. कोरे, मोहनराव डुबल उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘यात्रेच्या मुख्य दिवशी शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता, कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी पार्किंगची व्यवस्था योग्य प्रकारे करावी. पालिकेने स्वच्छता, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करावी. यात्रेकरूंना अडचण होऊ नये यासाठी मंदिर ट्रस्टने उपाययोजना कराव्यात. आरोग्य खात्याने यंत्रणा सज्ज ठेवावी.’आमदार गोरे म्हणाले, ‘यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून भाविकांना अडचण येऊ देऊ नये. पोलिसांनी नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करावे. अपवादात्मक घटनांचा बाऊ करून यात्रेकरूंची अडवणूक करू नये.’आरोग्य, पालिका, ांधकाम, महसूल, एसटी, वीजवितरण आदी विभागांतील अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांचा आढावा मांडला. बैठकीस विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)भेसळ रोखण्याची मागणीअन्नभेसळ प्रतिबंधक कार्यालयाचे अधिकारी गेली अनेक वर्षे यात्रेच्या आढावा बैठकीत येत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. ‘या विभागाला नोटीस द्यावी. यात्राकाळात आरोग्यास अपाय झाल्यास अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच यात्राकाळात निकृष्ट खोबरे मोठ्या प्रमाणावर विकले जाते. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी करण्यात आली.