शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

जयंत पाटील यांचा धूर्तपणा आणि राजकीय खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:30 IST

त्यांच्या मतदारसंघाच्या सीमेवर असणाऱ्या कृष्णा कारखान्याकडे बघण्याचा त्यांचा उद्देश हाच आहे. त्यामुळे ‘कृष्णे’च्या प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका तटस्थ राहते. ...

त्यांच्या मतदारसंघाच्या सीमेवर असणाऱ्या कृष्णा कारखान्याकडे बघण्याचा त्यांचा उद्देश हाच आहे. त्यामुळे ‘कृष्णे’च्या प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका तटस्थ राहते. ‘कृष्णा’तील सर्व गटांमध्ये त्यांचे कार्यकर्ते विखुरले आहेत. याही निवडणुकीत त्यांनी मौन पाळले आहे.

नेर्ले-तांबवे गट विधानसभेच्या शिराळा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांचे वर्चस्व आहे. मात्र, या गटातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जयंत पाटील यांचे नेतृत्व मानतात. या गटात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीतच वेगवेगळे गट आहेत. त्यामुळे कार्यकर्ते ‘कृष्णे’च्या रणांगणात पक्षीय राजकारणाला फाटा देऊन उतरतात. अशीच परिस्थिती बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटात आहे. या गटात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील हे सहकार पॅनलमधून विद्यमान संचालक आहेत. बोरगाव जिल्हा परिषद गटातही त्यांचेच वर्चस्व आहे. तेथे जिल्हा परिषद निवडणुकीत जयंत पाटील आपल्या कार्यकर्त्यांना बळ देतात; परंतु ‘कृष्णे’ची निवडणूक मात्र दुर्लक्षित करतात.

जयंत पाटील यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांना सोबत घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे; परंतु कदम यांनी ‘कृष्णे’च्या निवडणुकीत रयत पॅनलचे डॉ. इंद्रजित मोहिते यांची पाठराखण केली आहे. त्यावरही जयंत पाटील यांनी मौन पाळले आहे.

इस्लामपूर मतदारसंघातील बहुतांशी कार्यकर्त्यांना राजारामबापू उद्योग समूहात संधी मिळत नाही, असे कार्यकर्ते स्वबळावर कोणत्याही गटातून निवडून गेले तरी जयंत पाटील हरकत घेत नाहीत. कारण तो कार्यकर्ता आपल्यापासून दुरावला जाणार नाही, याची काळजी घेण्याचा धूर्तपणा त्यामागे आहे.

- अशोक पाटील, इस्लामपूर