शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

कोट्यवधींची ‘जललक्ष्मी’ तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट

By admin | Updated: April 24, 2017 23:09 IST

सहदेव भणगे : उपसा सिंचन समितीकडून कामाची पाहणी; योजनेत सुचवले बदल, हजारो लिटर पाण्याचा होतोय अपव्यय

बावधन : ‘वाई तालुक्याच्या पश्चिम भागासाठी वरदान ठरणारी जललक्ष्मी योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक वर्षांपासून या योजनेसाठी लढा देणाऱ्या उपसा सिंचन समितीने तांत्रिकदृष्ट्या ही योजना निकृष्ट असल्याचा निष्कर्ष काढत पुन्हा एकदा शासन दरबारी लढा सुरू केला आहे. या योजनेत असंख्य त्रुटी असल्याने समितीने सुचवलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यान्वित करावी, अन्यथा कोट्यवधी रुपयांच्या योजनेचा बोजवारा उडेल,’ अशी भीती उपसा सिंचन समितीचे अध्यक्ष सहदेव भणगे यांनी व्यक्त केली आहे.समितीच्या शिष्टमंडळाने नुकताच धोम-बलकवडी प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत योजनेचा पाहणी दौरा केला होता. यावेळी जललक्ष्मी योजना ही तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे मत समितीने संबंधित अधिकाऱ्यांकडे व्यक्त केले होते. योजना अशीच प्रवाही राहिली तर कोट्यवधी रुपये असेच पाण्यासारखे वाहून जातील, अशी भीती व्यक्त करत भणगे यांनी या संदर्भात समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले असून, योजनेच्या त्रुटीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. निवेदनात सुरुवातीलाच योजनेसाठी वापरण्यात आलेल्या जलवाहिन्यांचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे म्हटले आहे. नाल्यातून लोखंडी पाईप टाकून त्यावर सिमेंट काँक्रीटचा थर टाकणे आवश्यक होते; मात्र तसे न केल्याने पाईपवर पाण्याचा दबाव वाढून त्या अनेक ठिकाणी फुटल्या आहेत. तर काही ठिकाणी जॉइंट निसटले आहेत. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे समितीचे म्हणणे आहे. याशिवाय सर्वात गंभीर बाब म्हणजे डाव्या तिरावर काही ठिकाणी मुख्य जलवाहिनी ही धरण जलाशयातून गेली असून, ती पाण्यात बुडाली आहे. त्यामुळे या ठिकाणी जलवाहिनी फुटल्यास अथवा तिचा जॉइंट निसटल्यास जलाशयातील पाणी कमी झाल्याशिवाय ती दुरुस्त करू शकत नाही. वास्तविक, ती जलाशयाच्या बाहेरून घेण्याची आवश्यकता होती, असेही निवेदनात म्हटले आहे.जललक्ष्मीचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल का? याबाबतही समितीने शंका उपस्थित केली आहे. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी स्वखर्चाने शेतकऱ्यांनी करून घेण्याची भाषा करत आहेत. आॅक्टोबर २०१६ पासून बलकवडी प्रकल्प विभागाने या योजनेतून प्रत्यक्ष पाणी सोडण्यास सुरुवात केली. परंतु शेवटच्या दाराला म्हणजे आकोशी गावाला ते एप्रिलच्या १० तारखेनंतर पाणी पोहोचले. तब्बल सात महिन्यांनंतर या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी अशाच पद्धतीने पाणी मिळणार का?, असा सवाल समितीने उपस्थित केला असून, जललक्ष्मीचे काम योग्य झाले आहे, असं आम्ही म्हणायचं का?, असाही सवाल समितीने केला आहे. (प्रतिनिधी)पोटपाटचे कुठेही नियोजन नाही...डाव्या व उजव्या तिरावरील मुख्य जलवाहिनीची दारे ही शेतीपासून लांब अंतरावर व खूपच कमी ठेवली आहे. पोटपाटाचे कुठेही नियोजन नाही. त्यामुळे जलवाहिनीच्या वर ७८५ मीटरपर्यंत जे क्षेत्र ओलिताखाली येणार होते, ते क्षेत्र आज पाण्यापासून वंचित राहिल्याचा दावा समितीने केला आहे. सुरुवातीला समितीच्या वतीने योजना बंद पाडल्यानंतर तत्कालीन कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांनी दारे व पोटपाट शासनाच्या खर्चाने करून देण्याचे समितीला सांगितले होते.