शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

वृत्ती बदलण्यास परमार्थ समजणे योग्य

By admin | Updated: January 23, 2015 00:39 IST

चिन्मय महाराज : महोत्सवातील चौथ्या पुष्पात कीर्तनाने भाविक भारावले

कऱ्हाड : ‘जग समजून घेताना माणसाने अगोदर स्वत:ला समजून घेतले पाहिजे, त्यासाठी स्वत:ची वृत्तीे बदलणे गरजेचे आहे़ परमार्थाच्या नामस्मरणाबरोबरच ज्ञानेश्वरीचा अर्थाऐवजी त्यातील भाव समजून घ्या,’ असे विवेचन चिन्मय महाराज यांनी यशवंत महोत्सवाच्या चौथ्या पुष्पात बुधवारी उपस्थित भाविकांना पटवून सांगितले.यशवंत को-आॅप. बँकेच्या वतीने आयोजित पाचव्या कीर्तन महोत्सवात चौथ्या दिवशीच्या पुष्पात त्यांनी सुश्राव्य कीर्तन केले. या कीर्तनास भगवती महाराज उपस्थित होत्या.चिन्मय महाराजांनी आपल्या कीर्तनातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सांप्रदायामध्ये किती ताकद आहे़ याविषयी उदाहरणासह आपल्या अभंगातून समजावून सांगितली़ ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगातून संताना एकत्र करून सांप्रदाय स्थापन केला़ तसेच ज्ञानेश्वरीतून सांप्रदायाचे महत्त्व काय, हे साऱ्या जगासमोर मांडले.’‘भिती संपली, आता नाही राहिला दुरावा’, ‘असा भाव समजुनी, तुम्ही-आम्ही घ्यावा!’ भीती असते तेव्हा दुरावा असतो, जेव्हा भीती संपते, तेव्हा दुरावाही संपतो़ त्यामुळे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भाविकांशी त्यांचा असलेला दुरावा दूर केला आहे. एका अंधाला ज्ञानेश्वरी वाचावयाची होती तेव्हा त्याने ज्ञानेश्वरीचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्या हाताच्या बोटांच्या साहाय्याने त्या ज्ञानेश्वरीला स्पर्श करून त्यातील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यावेळी त्याला तो अर्थ उमगला नाही. ज्यावेळी त्या अंधाने ज्ञानेश्वरीतील भाव समजून घेतला तेव्हा ज्ञानेश्वरी त्याच्या तोंडपाठ झाली.’अशा उदाहरणांच्या साहाय्याने चिन्मय महाराजांनी उपस्थितांना ज्ञानेश्वरीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. (प्रतिनिधी)