शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

वृत्ती बदलण्यास परमार्थ समजणे योग्य

By admin | Updated: January 23, 2015 00:39 IST

चिन्मय महाराज : महोत्सवातील चौथ्या पुष्पात कीर्तनाने भाविक भारावले

कऱ्हाड : ‘जग समजून घेताना माणसाने अगोदर स्वत:ला समजून घेतले पाहिजे, त्यासाठी स्वत:ची वृत्तीे बदलणे गरजेचे आहे़ परमार्थाच्या नामस्मरणाबरोबरच ज्ञानेश्वरीचा अर्थाऐवजी त्यातील भाव समजून घ्या,’ असे विवेचन चिन्मय महाराज यांनी यशवंत महोत्सवाच्या चौथ्या पुष्पात बुधवारी उपस्थित भाविकांना पटवून सांगितले.यशवंत को-आॅप. बँकेच्या वतीने आयोजित पाचव्या कीर्तन महोत्सवात चौथ्या दिवशीच्या पुष्पात त्यांनी सुश्राव्य कीर्तन केले. या कीर्तनास भगवती महाराज उपस्थित होत्या.चिन्मय महाराजांनी आपल्या कीर्तनातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सांप्रदायामध्ये किती ताकद आहे़ याविषयी उदाहरणासह आपल्या अभंगातून समजावून सांगितली़ ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगातून संताना एकत्र करून सांप्रदाय स्थापन केला़ तसेच ज्ञानेश्वरीतून सांप्रदायाचे महत्त्व काय, हे साऱ्या जगासमोर मांडले.’‘भिती संपली, आता नाही राहिला दुरावा’, ‘असा भाव समजुनी, तुम्ही-आम्ही घ्यावा!’ भीती असते तेव्हा दुरावा असतो, जेव्हा भीती संपते, तेव्हा दुरावाही संपतो़ त्यामुळे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भाविकांशी त्यांचा असलेला दुरावा दूर केला आहे. एका अंधाला ज्ञानेश्वरी वाचावयाची होती तेव्हा त्याने ज्ञानेश्वरीचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्या हाताच्या बोटांच्या साहाय्याने त्या ज्ञानेश्वरीला स्पर्श करून त्यातील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यावेळी त्याला तो अर्थ उमगला नाही. ज्यावेळी त्या अंधाने ज्ञानेश्वरीतील भाव समजून घेतला तेव्हा ज्ञानेश्वरी त्याच्या तोंडपाठ झाली.’अशा उदाहरणांच्या साहाय्याने चिन्मय महाराजांनी उपस्थितांना ज्ञानेश्वरीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. (प्रतिनिधी)