शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कास परिसरात आठवडाभर पाऊस रमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस मंगळवारी (दि. ७) रात्रीपासून पडत असणाऱ्या जोरदार वाऱ्यासह संततधार पावसामुळे नाले, ओढ्यांसह छोटे-मोठे धबधबे ...

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस मंगळवारी (दि. ७) रात्रीपासून पडत असणाऱ्या जोरदार वाऱ्यासह संततधार पावसामुळे नाले, ओढ्यांसह छोटे-मोठे धबधबे खळाळू लागले आहेत. कास तलावाचा सांडवा मोठ्या प्रमाणावर ओव्हरफ्लो झाला आहे. भारतातील सर्वाधिक उंचीचा भांबवली-वजराई धबधबा खळाळून कोसळत आहे. दरम्यान, परिसरातील ओढे, नाले तुडुंब वाहत असल्याने उरमोडी व कण्हेर धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

पश्चिमेकडील डोंगरमाथ्यावरील या परिसरात अतिवृष्टी असते. गेल्या पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासूनच संततधार सुरू केल्याने परिसरातील जनजीवन गारठू लागले आहे. गेल्या सहा-सात दिवसांपासून जोरदार वारा व वाढलेला पावसाचा जोर यांमुळे थंडीतही प्रचंड वाढ होत आहे.

अतिवृष्टीच्या या डोंगरमाथ्यावर जून ते सप्टेंबर चार महिन्यांत ढग व धुक्यामुळे सूर्यदर्शन दुर्लभ झाले होते. आताही गेल्या आठ दिवसांचा कालावधी वगळता जूनपासून ऊन दुर्मीळ वेळा पडले आहे. सततच्या पावसाने आटण्याच्या मार्गावर असणारे झरे, ओहोळ, ओढे, धबधबे पुन्हा खळाळू लागल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. एकीव धबधबादेखील कोसळू लागला आहे. कण्हेर, उरमोडी धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, डोंगरमाथ्यावरील शेतीस हा पाऊस पूरक असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

चौकट

यंदाच्या वर्षी १७ जूनला कास तलाव भरून वाहू लागला होता. तेव्हापासून आजवरदेखील सलग तीन महिन्यांपासून कास तलावाच्या सांडव्यावरून कमी-जास्त प्रमाणात पाणी वाहतच आहे. गेल्या आठवडाभर पडत असलेल्या सततच्या जोरदार पावसाने सड्यावरून कोसळणारे पाणी यांमुळे कास तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन सांडव्यावरून एक फूट उंचीवरून पाणी वाहू लागले आहे.

१२कास

कास परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करीत असलेल्या कास तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे.

(छाया - सागर चव्हाण)