शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

प्रथमच घडलं; जिल्ह्यातील टँकर मे महिन्यातच बंद, जिल्ह्यात वळीव धुवाॅंधार : टंचाई संपली; ८० गावे अन् ४५० वाड्या होत्या तहानलेल्या

By नितीन काळेल | Updated: May 29, 2025 20:39 IST

सातारा जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर दरम्यान पाऊस पडतो. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहते. पण, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते.

नितीन काळेल 

सातारा : जिल्ह्यात दरवर्षीच जानेवारी ते जून महिन्या दरम्यान टंचाई असतेच. त्यामुळे लोकांना आणि जनावरांनाही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षीही मे महिन्याच्या मध्यापर्यंत ८० गावे आणि ४५० वाड्यांच्या घशाला कोरड पडलेली. पण, वळवाचा पाऊस धुवाॅंधार पडल्याने जिल्ह्यातील सर्वच टॅंकर मे महिन्यातच बंद झालेत. इतिहासात प्रथमच असे घडले आहे.

सातारा जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर दरम्यान पाऊस पडतो. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहते. पण, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. तरीही दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर जिल्ह्यात टंचाई वाढते. त्यामुळे माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांतील टंचाई निवारणासाठी पाऊस पडेपर्यंत म्हणजे जून महिन्यातही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. तर जादा पाऊस पडणाऱ्या तालुक्यांतही टंचाई जाणवते. गेल्यावर्षी तर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२५ टक्क्यांहून अधिक पर्जन्यमान झालेले. तरीही जिल्ह्यातील टंचाईला लवकर सुरूवात झाली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच टॅंकरने लोकांना पाणीपुरवठा सुरू झालेला. मात्र, आता हे चित्र बदलेले आहे. मागील १० दिवसांत वळवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे जिल्ह्यातील टॅंकर पूर्णपणे बंद झाले आहेत.

माणमध्ये ४९ गावे ३५७ वाड्यांना कोरड..

माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई होती. माणमधील ४९ गावे आणि ३५७ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. ५२ टॅंकरवरती ७१ हजार नागरिक आणि ५४ हजार पशुधनाची तहान अवलंबून होती. सध्या माण तालुक्यातच पावसाने उन्हाळ्यातच विक्रमी हजेरी लावली. त्यामुळे उन्हाळ्यातच माणमधील टॅंकर बंद झाला. हा एक इतिहास घडला आहे.वाई, पाटण, खटाव, फलटण तालुक्यातील टंचाई संपली...

जिल्ह्यातील माणबरोबरच पाटण, वाई, कोरेगाव, खटाव, फलटण तालुक्यांत टॅंकर सुरू झाले होते. एकूण ८० गावे आणि ४५० वाड्यांतील १ लाख ६ हजार नागरिक आणि ६८ हजार पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा पुरवठा होत होता. पाटण तालुक्यात एक गाव आणि चार वाड्यांना टॅंकर सुरू होता. तर वाईत चार गावे आणि तीन वाड्या, कोरेगावमध्ये सात गावे, खटाव तालुक्यात १८ गावे आणि ८१ वाड्या, फलटणला एक गाव आणि पाच वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता.

७८ टँकर बंद...

जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यापर्यंत ७८ टॅंकर टंचाई निवारणासाठी धावत होते. यामधील शासकीय ५ तर खासगी ७५ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. पण, आता हे सर्व टॅंकर बंद झाले आहेत.