शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

बाप्पांना पुष्पमाला घालणेही अवघड

By admin | Updated: September 24, 2015 00:06 IST

बाजारात फुलेच नाहीत : गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट

विठ्ठल नलवडे - कातरखटाव  दुष्काळी पट्ट्यातल्या ग्रामीण भागात साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवावर दुष्काळाची छाया दिसत आहे. गेले दोन महिने कातरखटाव गावात माळकऱ्यांच्या घरातल्या, दुकानातल्या, देव्हाऱ्यातील मूर्तीला फुलांचा हारच मिळत नसल्याने नुसती अगरबत्ती लावून ‘देवा माफ करा,’ म्हणून हात जोडायची वेळ व्यापारी व दुकानदारांवर आली आहे. गणेशोत्सवात सुमारे तीस टक्के गणेशमूर्ती विक्री झाल्या नसल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने गणेश मंडळांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक गणेश मंडळांनी यावेळेस गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.गणेशमूर्तींची वाढती मागणी लक्षात घेता कारागीरांची आकर्षक रंगसंगती करून ग्राहकांच्या आवडीनुसार मूर्ती बनविल्या. ज्या बुकिंग झाल्या होत्या त्यांची विक्री झाली. मात्र ज्या अपेक्षेने व्यावसायिकांनी गणेशमूर्ती बाजारात विक्रीकरिता आणल्या, त्या अपेक्षेने विक्रीला प्रतिसाद मिळाला नाही. लहान मूर्तींबरोबर जास्त किमतीच्या मोठ्या गणेशमूर्ती ग्रामीण भागातील कुंभाराकडे विक्रीअभावी शिल्लक राहिल्या आहेत. साधारण: ३० टक्के मूर्ती शिल्लक राहिल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे. पावसाने थोडाफार दिलासा दिला असला तरी खरिपातील पीक पावसाअभावी पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी, गणेशमंडळ, नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत नाही. बाजारपेठांमध्येही शुकशुकाट दिसून येत आहे. तेला-मिठाला महाग... पाणीसंकट, हवामानाच्या बदलामुळे फुलांची रोपे जळून जाऊ लागली आहेत. शंभर रोपांना सहाशे रूपये मोजावे लागतात. गावात रोजचे शंभर हार जात होते. महिन्याचे पाच हजार नुकसान होत आहे. आता तेला-मिठाला महाग झाल्यासारखे दिवस आले आहेत. अनुसया माळी, माळकरी, रानमळा माळीवस्ती.