शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

बाप्पांना पुष्पमाला घालणेही अवघड

By admin | Updated: September 24, 2015 00:06 IST

बाजारात फुलेच नाहीत : गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट

विठ्ठल नलवडे - कातरखटाव  दुष्काळी पट्ट्यातल्या ग्रामीण भागात साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवावर दुष्काळाची छाया दिसत आहे. गेले दोन महिने कातरखटाव गावात माळकऱ्यांच्या घरातल्या, दुकानातल्या, देव्हाऱ्यातील मूर्तीला फुलांचा हारच मिळत नसल्याने नुसती अगरबत्ती लावून ‘देवा माफ करा,’ म्हणून हात जोडायची वेळ व्यापारी व दुकानदारांवर आली आहे. गणेशोत्सवात सुमारे तीस टक्के गणेशमूर्ती विक्री झाल्या नसल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने गणेश मंडळांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक गणेश मंडळांनी यावेळेस गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.गणेशमूर्तींची वाढती मागणी लक्षात घेता कारागीरांची आकर्षक रंगसंगती करून ग्राहकांच्या आवडीनुसार मूर्ती बनविल्या. ज्या बुकिंग झाल्या होत्या त्यांची विक्री झाली. मात्र ज्या अपेक्षेने व्यावसायिकांनी गणेशमूर्ती बाजारात विक्रीकरिता आणल्या, त्या अपेक्षेने विक्रीला प्रतिसाद मिळाला नाही. लहान मूर्तींबरोबर जास्त किमतीच्या मोठ्या गणेशमूर्ती ग्रामीण भागातील कुंभाराकडे विक्रीअभावी शिल्लक राहिल्या आहेत. साधारण: ३० टक्के मूर्ती शिल्लक राहिल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे. पावसाने थोडाफार दिलासा दिला असला तरी खरिपातील पीक पावसाअभावी पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी, गणेशमंडळ, नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत नाही. बाजारपेठांमध्येही शुकशुकाट दिसून येत आहे. तेला-मिठाला महाग... पाणीसंकट, हवामानाच्या बदलामुळे फुलांची रोपे जळून जाऊ लागली आहेत. शंभर रोपांना सहाशे रूपये मोजावे लागतात. गावात रोजचे शंभर हार जात होते. महिन्याचे पाच हजार नुकसान होत आहे. आता तेला-मिठाला महाग झाल्यासारखे दिवस आले आहेत. अनुसया माळी, माळकरी, रानमळा माळीवस्ती.