शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

खासगीकरणाच्या नावाखाली आरक्षण संपविण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST

कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भानुदास माळी बोलत होते. यावेळी ॲड. दीपक माळी, प्रा. प्रदीप लोखंडे, ...

कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भानुदास माळी बोलत होते. यावेळी ॲड. दीपक माळी, प्रा. प्रदीप लोखंडे, संपतराव माळी, नानासाहेब येडगे, संजय माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

माळी म्हणाले, सरकारने सध्या सरकारी कंपन्या विकायला सुरुवात केली आहे; त्यामुळे ओबीसींना आरक्षण असून आरक्षणाचा उपयोग होणार नाही. म्हणून खासगीकरणाच्या नावाखाली सुरू असणारा हा डाव आम्ही ओळखून त्याला विरोध करीत आहोत.

खरंतर राज्यातील सर्व मागासवर्गीय महामंडळांची कर्जमाफी करून कोर्टातील सर्व जाचक खटले काढण्यात आले पाहिजेत. तसेच महामंडळासाठी तोकडी आर्थिक तरतूद न करता राज्य शासनाने दीड हजार कोटी तर केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. सर्व खासगी उद्योगधंद्यांमध्ये देशाबाहेरील कंपन्यांमध्ये सुध्दा बीसी ओबीसींना २७ टक्के आरक्षणाचा कायदा करणे गरजेचे आहे. देशातील सर्व बीसी ओबीसी जातनिहाय जनगणना करावी म्हणजे खरे चित्र समोर येईल, असेही माळी म्हणाले.

महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णा भाऊ साठे यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न किताब देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी वर्षानुवर्षेची मागणी आजही दुर्लक्षित आहे; याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आज राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा लाभ काही ओबीसींना मिळत नाही तर काहीजण खोटे दाखले काढून आरक्षण लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत अशांवर शासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारने परदेशी शिक्षणासाठी खर्चात ७५ टक्के सवलत देण्याचा कायदा करावा, असेही माळी म्हणाले.

चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे वेळ मागितला आहे. बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर बीसी ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.