शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

ऐन आचारसंहितेत घेतल्या मुलाखती

By admin | Updated: November 5, 2014 00:05 IST

भरतीवरच प्रश्नचिन्ह : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील ९१ उमेदवारांच्या सरकारी नोकरीचे स्वप्न भंगले

जगदीश कोष्टी - सातारा -राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत भरती झालेल्या ९१ कर्मचाऱ्यांना फुकट राबविल्याने संताप व्यक्त होत असतानाच सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या ९१ कर्मचाऱ्यांची भरतीच मुळात ऐन आचारसंहितेच्या काळात केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही भरतीच बेकायदा असल्याची खळबळजनक माहिती समोर येऊ लागली आहे.आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २,२९८ अकाउंन्टंट कम डाटा एन्टी आॅपरेटरची (लिपिक) भरती करण्याचा ठेका मुंबई येथील ईगल सिक्युरिटी अ‍ॅण्ड पर्सनल सर्व्हिसेसला दिला होता. त्यानुसार फेबु्रवारी, २०१४ पासून कर्मचार पुरवठा करण्यास सुरुवातही झाली.कर्मचाऱ्यांची भरती भलेही खासगी कंपनी करणार असली तरी ते कर्मचारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात काम करणार होते. त्यामुळे या पदांची भरतीही पारदर्शीपणे व शासकीय नियमांचे पालन करतच होणे आवश्यक होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ५ मार्चपासून लागू झाली होती. आचारसंहितेच्या काळात शासकीय नोकरीभरती प्रक्रिया स्थगित असते. मात्र, आचारसंहिता लागल्यानंतर लगेच चार दिवसांत या मुलाखती घेण्यात आल्या. ९ , १० मार्च रोजी या पदासाठी मुलाखती झाल्या. या मुलाखती घेताना कोणताही शासकीय अधिकारी उपस्थित नव्हता हे विशेष. वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन थेट मुलाखतीसाठी बोलाविले होते. त्याठिकाणी दोन दिवस मुलाखती घेतल्यानंतर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांकडून कंपनीनेच २,१०० रुपये घेऊन त्यांना हजर होण्याचे पत्र दिले होते. त्या पत्रावर तारीख न देता पत्र मिळाल्यापासून पंधरा दिवसांत हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नेमून दिलेल्या ठिकाणी उमेदवार हजरही झाले. तेही चक्क आचारसंहितेतच. त्यांची नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती. ही मुदतही संपली आहे. तरीही त्यांना अद्याप पगार मिळालेला नाही.‘लोकमत’ने फोडली होती वाचाप्राथमिक आरोग्य केंद्रात अकाउन्टंट कम डाटा एन्ट्री आॅपरेटरपदी कार्यरत असलेल्या ९१ कर्मचाऱ्याचे पगार झालेले नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने २१ सप्टेंबर रोजी ‘आरोग्य विभागातील कर्मचारी बिनपगारी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याने भरडले गेलेले कर्मचारी एकत्र आले. त्यांनी वेळोवेळी विविध पातळ्यांवर पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. ंसरकारी नोकरीसाठी हॉटेलात मुलाखतीईगल ही खासगी कंपनी भरती करुन घेणार असली तरी भरती होणारे कर्मचारी सरकारी कार्यालयात काम करणार होते. या भरतीकडे पाहताना प्रत्येक उमेदवार हा ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान’ची भरती म्हणून पाहत होता. सरकारी भरतीप्रक्रिया कोणत्याही खासगी जागेत होत नाही. मात्र, ही भरती सातारा शहरातील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ८ व ९ मार्च रोजी करण्यात आली.संबंधित कंपनीने यासंदर्भात शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याची विनंती केल्याचे समजते. मात्र, आचारसंहिता लागू होती. त्यामुळे शासकीय इमारत व अधिकारीही मदतीला आले नव्हते.