शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

विकासासाठी एकवटली तरुणाई

By admin | Updated: February 1, 2015 01:00 IST

इंजबाव : उजाड माळरान हिरवेगार करण्यासाठी कसली कंबर

गोंदवले : भौगोलिक परिस्थितीमुळे नेहमीच दुष्काळ अनुभवतोय, पाण्याअभावी शेती ओस तर परिसर भकास पडलाय, त्यामुळे जगायचं साधनही नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणाांसह लोकांना मायभूमी सोडावी लागतेय, आता बस्स झालं हे. आता आम्हीही योगदान देऊ अन् गावाचा सर्वांगीण विकास करूनच दाखवू, असा निर्धार इंजबाब, ता. माण येथील सुशिक्षित तरुणांनी घेतला आहे. या तरुणांना तितक्याच ताकदीने सहकार्य करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले आहे.म्हसवडपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर डोंगरमाथ्यावरील उजाड माळरानावर इंजबाब गाव वसले आहे. ग्रामीण दुर्लक्षित राहिलेल्या हे गाव वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसत आहे. त्यामुळेच २००० हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात मात्र प्रत्यक्षात ३०टक्के लोकांचेच वास्तव्य आहे. इतर सुमारे ७० टक्के लोकांना मात्र पोटासाठी स्थलांतरित व्हावे लागल्याची भीषणता आहे. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या संतोष कापसे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. इंजबाब विकास संस्थेच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. ग्रामविकासाची धडपड लक्षात घेऊन तालुका प्रशासनानेही या तरुणांना सर्व सहकार्य करण्यासाठी आता पावले उचलली आहेत. कृषी विभागाने जलसंधारणांच्या कामांसाठी पाहणी केली आहे. इंजबाबमध्ये जलयुक्त शिवार योजनेद्वारे विविध कामे तडीस नेण्यासाठी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी जानकर, गटविकास अधिकारी सीमा जगताप यांनीही युवकांना सहकार्य करण्यासाठी पावले उचलली आहेत. मातृभूमीच्या विकासासाठी संतोष कापसे यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल कापसे, विजय धोत्रे, दत्तात्रय कापसे, केशव चव्हाण, विजय कापसे, राहुल कापसे, महादेव कापसे, सचिन कापसे आदी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. (वार्ताहर)