शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

अपुरा पाणीपुरवठा; सातारकर झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:37 IST

सातारा : सातारा शहरातील पश्चिम भागात कास योजनेतून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सातारा ...

सातारा : सातारा शहरातील पश्चिम भागात कास योजनेतून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

सातारा शहराच्या पश्चिमेकडील काही भागात कास धरणातून पाणीपुरवठा होतो. बोगदा परिसर, धस कॉलनीसह काही भागात गेल्या दीड महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर अपार्टमेंटमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. परिणामी पाणी विकत घेऊन पुरविण्याची वेळ आलेली आहे. याबाबत संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

...................................................

रस्त्यावरील व्हॉल्वचा धोका कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे काही ठिकाणचे व्हॉल्व रस्त्यावरच आहेत. त्यामुळे नागरिकांना कायम धोका आहे.

सातारा शहराला विविध योजनांतून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी शहरात जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणचे व्हॉल्व रस्त्यातच आहेत. त्यामुळे रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांचा त्यामध्ये पाय पडल्यास दुखापतीचीही शक्यता आहे. तसेच शहरात नवीन येणाऱ्यांना याची कल्पनाही असत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक बनलेले आहे.

......................................................

मंडईत कांद्याचा दर झाला कमी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कांद्याच्या दर कमी होत असल्याने भाजीमंडईतही भाव कमी झाला आहे. चांगला कांदा ३० रुपये किलोने विकला जात आहे.

मागील तीन महिन्यांपासून कांद्याचा दर टिकून होता. पण, गेल्या तीन आठवड्यात दर एकदम कमी झाला. सातारा शहरात तर ४० ते ५० रुपये किलोने कांदा मिळत होता. सध्या भाजीमंडई व दुकानातही कांद्याची किरकोळ विक्री २५ ते ३० रुपये किलोने होत आहे.

......................................................

डोंगरपायथा रस्ता डांबरीकरणाची मागणी

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील बनगरवाडी ते श्री भोजलिंग डोंगर पायथा रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. सुमारे चार किलोमीटरचा हा रस्ता आहे. या रस्त्यावर जागोजागी चरी खोदलेल्या आहेत. तसेच खड्डेही पडलेले आहेत. यामुळे वाहनधारकांना कसरत करीत जावे लागत आहे.

...........................................

घंटागाड्यांना उशीर

सातारा : सातारा शहरातील काही भागात घंटागाड्या उशिरा येत आहेत. यामुळे नागरिकांना कचरा टाकण्यासाठी वाट पहावी लागत आहे. शहरातील मंगळवार पेठ भागातच अशी परिस्थिती अधिक आहे. तसेच यामुळे काही नागरिक रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकत असतात.

.........................................

तलावातील पाणीसाठ्यात घट

दहिवडी : गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने माण तालुक्यातील सर्व तलाव भरले होते. सध्या उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठ्यात घट होत चालली आहे. माण तालुक्यात आंधळी, पिंगळी, देवापूर, जांभूळणी, गंगोती, महाबळेश्वरवाडी असे अनेक मोठे तलाव आहेत. गेल्यावर्षीच्या पावसात हे तलाव भरले होते. मागील महिन्यापासून ऊन वाढत चालले आहे. तसेच तलाव परिसरातील विहिरीतून शेतीसाठी पाणी उपसा होत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे.

...............................................

साताऱ्यात अजूनही प्लास्टिकचा वापर

सातारा : सातारा शहरातील काही भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने प्लास्टिक पिशवीवर बंदी घातली आहे. सुरुवातीच्या काळात प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पण, त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आजही साताऱ्यातील काही फळ विक्रेते प्लास्टिक पिशवीतून फळे देताना दिसून येत आहेत.

.........................................................

महामार्ग सेवारस्त्याच्या बाजूला कचरा निर्माण

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या साताऱ्यातील सेवा रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिग पडलेले आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण झालेली आहे.

येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते वाढे फाटा दरम्यानच्या पश्चिमेकडील सेवा रस्त्याच्या बाजूला कचरा पडला आहे. काहीवेळा कचऱ्यातील प्लास्टिक कागद रस्त्यावर येत असतात. तर रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारक, नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

...................

वाहन अपघातामुळे

गतिरोधकाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ भरधाव वाहनांमुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधितांनी येथील रस्त्यावर गतिरोधक उभारावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

येथील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ चार रस्ते एकत्र येत आहेत. रस्ता चांगला असल्याने अनेक वाहने भरधावपणे येत असतात. त्यातच आडव्या बाजूंनी येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी वाहनांचा अपघात होण्याच्या घटना घडत आहे. यासाठी गतिरोधकाची मागणी होत आहे.

......................................................

आवक वाढल्याने

भाज्या झाल्या स्वस्त

सातारा : सातारा शहरात पालेभाज्यांची आवक अधिक होत आहे. त्यामुळे भाज्या काही प्रमाणात स्वस्त झाल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. मेथी, शेपू, कोथिंबीरची पेंडीही १० रुपयांच्या पुढे होती. पण, सध्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे दरही कमी झाले आहेत. वांगी, टोमॅटो, दोडक्यावर दराचा परिणाम झाला आहे.

..........................................

ढगाळ वातावरणामुळे

शेतकऱ्यांत चिंता

वरकुटे मलवडी : माण तालुक्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊसही पडला आहे.

................................