शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला, तरी शेतकरी मालामाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मागील काही वर्षांत सोयाबीनला चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मागील काही वर्षांत सोयाबीनला चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ होत आहे. त्याचबरोबर आता कमी कालावधीतही पीक येणारे सोयाबीन वाण आले आहे. त्यामुळे पाऊस कधीही पडला तरी शेतकरी मालामाल होणार आहे. तसेच जिल्ह्यात पाच वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. यावर्षी हंगामात ऊस वगळून सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर होते. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर, तर सोयाबीनचे ६३७५४ हेक्टर होते. तसेच ज्वारी, भुईमूग, मका या पिकांचेही क्षेत्र राहिले. जिल्ह्यात काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढलेले आहे. याला कारण म्हणजे सोयाबीनला मिळणारा चांगला दर. सध्या तर क्विंटलला ९ हजारांपर्यंत भाव येत आहे. त्यातच यावर्षी ७४ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ११५ च्या वर आहे.

सोयाबीन पीक घेताना कोणी घरचे बियाणे वापरतो, तर कोणी विकतचे आणतो. तसेच आता नवीन वाणही येत आहे. त्यामुळे कमी कालावधीतही सोयाबीन येऊ लागले आहे.

................................

जिल्ह्यात वाढला सोयाबीन पेरा

वर्ष पेरा (हेक्टरमध्ये)

२०१७ ७३०४४

२०१८ ६३३१४

२०१९ ६००७५

२०२० ७३३९१

२०२१ ७४८३९

.................................................

झटपट येणारे सोयाबीन...

सोयाबीनमध्ये विविध संशोधित वाण बाजारात आले आहे. यामध्ये अर्ली व्हरायटी सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. झटपट हातात येणारे पीक म्हणून याकडे पाहिले जात आहे. ८० ते ९० दिवसांत पीक येते.

...........................

मध्यम कालावधीत येणारे...

अल्पावधीबरोबरच मध्यम कालवधीत येणारे सोयाबीन वाणही आहे. साधारणत: ९० ते १०० दिवसांत हे सोयाबीन पीक येत आहे. जमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून याची पेरणी केली जाते.

.................................

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

सोयाबीनमध्ये उशिरा येणारे वाणही उपलब्ध आहे. यामध्ये ११० तसेच १२० दिवसांचे बियाणेही आहे. पण, ऋतूचक्र बदलल्याने याचा वापर कमी होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

...........................................

शेतकरी म्हणतात...

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतील उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच कमी कालावधीत पीक येणार असेल, तर त्याकडे शेतकरी वळतो. आता सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे जास्त आहे.

- राजाराम पाटील, शेतकरी

..........................

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. दरामुळे सोयाबीन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. सोयाबीनचा दर टिकून राहिल्यास आणखी क्षेत्र वाढू शकते.

- प्रवीण काळे, शेतकरी

..............................................................