शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला, तरी शेतकरी मालामाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मागील काही वर्षांत सोयाबीनला चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मागील काही वर्षांत सोयाबीनला चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ होत आहे. त्याचबरोबर आता कमी कालावधीतही पीक येणारे सोयाबीन वाण आले आहे. त्यामुळे पाऊस कधीही पडला तरी शेतकरी मालामाल होणार आहे. तसेच जिल्ह्यात पाच वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. यावर्षी हंगामात ऊस वगळून सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर होते. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर, तर सोयाबीनचे ६३७५४ हेक्टर होते. तसेच ज्वारी, भुईमूग, मका या पिकांचेही क्षेत्र राहिले. जिल्ह्यात काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढलेले आहे. याला कारण म्हणजे सोयाबीनला मिळणारा चांगला दर. सध्या तर क्विंटलला ९ हजारांपर्यंत भाव येत आहे. त्यातच यावर्षी ७४ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ११५ च्या वर आहे.

सोयाबीन पीक घेताना कोणी घरचे बियाणे वापरतो, तर कोणी विकतचे आणतो. तसेच आता नवीन वाणही येत आहे. त्यामुळे कमी कालावधीतही सोयाबीन येऊ लागले आहे.

................................

जिल्ह्यात वाढला सोयाबीन पेरा

वर्ष पेरा (हेक्टरमध्ये)

२०१७ ७३०४४

२०१८ ६३३१४

२०१९ ६००७५

२०२० ७३३९१

२०२१ ७४८३९

.................................................

झटपट येणारे सोयाबीन...

सोयाबीनमध्ये विविध संशोधित वाण बाजारात आले आहे. यामध्ये अर्ली व्हरायटी सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. झटपट हातात येणारे पीक म्हणून याकडे पाहिले जात आहे. ८० ते ९० दिवसांत पीक येते.

...........................

मध्यम कालावधीत येणारे...

अल्पावधीबरोबरच मध्यम कालवधीत येणारे सोयाबीन वाणही आहे. साधारणत: ९० ते १०० दिवसांत हे सोयाबीन पीक येत आहे. जमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून याची पेरणी केली जाते.

.................................

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

सोयाबीनमध्ये उशिरा येणारे वाणही उपलब्ध आहे. यामध्ये ११० तसेच १२० दिवसांचे बियाणेही आहे. पण, ऋतूचक्र बदलल्याने याचा वापर कमी होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

...........................................

शेतकरी म्हणतात...

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतील उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच कमी कालावधीत पीक येणार असेल, तर त्याकडे शेतकरी वळतो. आता सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे जास्त आहे.

- राजाराम पाटील, शेतकरी

..........................

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. दरामुळे सोयाबीन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. सोयाबीनचा दर टिकून राहिल्यास आणखी क्षेत्र वाढू शकते.

- प्रवीण काळे, शेतकरी

..............................................................