शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला, तरी शेतकरी मालामाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मागील काही वर्षांत सोयाबीनला चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मागील काही वर्षांत सोयाबीनला चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ होत आहे. त्याचबरोबर आता कमी कालावधीतही पीक येणारे सोयाबीन वाण आले आहे. त्यामुळे पाऊस कधीही पडला तरी शेतकरी मालामाल होणार आहे. तसेच जिल्ह्यात पाच वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. यावर्षी हंगामात ऊस वगळून सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर होते. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर, तर सोयाबीनचे ६३७५४ हेक्टर होते. तसेच ज्वारी, भुईमूग, मका या पिकांचेही क्षेत्र राहिले. जिल्ह्यात काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढलेले आहे. याला कारण म्हणजे सोयाबीनला मिळणारा चांगला दर. सध्या तर क्विंटलला ९ हजारांपर्यंत भाव येत आहे. त्यातच यावर्षी ७४ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ११५ च्या वर आहे.

सोयाबीन पीक घेताना कोणी घरचे बियाणे वापरतो, तर कोणी विकतचे आणतो. तसेच आता नवीन वाणही येत आहे. त्यामुळे कमी कालावधीतही सोयाबीन येऊ लागले आहे.

................................

जिल्ह्यात वाढला सोयाबीन पेरा

वर्ष पेरा (हेक्टरमध्ये)

२०१७ ७३०४४

२०१८ ६३३१४

२०१९ ६००७५

२०२० ७३३९१

२०२१ ७४८३९

.................................................

झटपट येणारे सोयाबीन...

सोयाबीनमध्ये विविध संशोधित वाण बाजारात आले आहे. यामध्ये अर्ली व्हरायटी सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. झटपट हातात येणारे पीक म्हणून याकडे पाहिले जात आहे. ८० ते ९० दिवसांत पीक येते.

...........................

मध्यम कालावधीत येणारे...

अल्पावधीबरोबरच मध्यम कालवधीत येणारे सोयाबीन वाणही आहे. साधारणत: ९० ते १०० दिवसांत हे सोयाबीन पीक येत आहे. जमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून याची पेरणी केली जाते.

.................................

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

सोयाबीनमध्ये उशिरा येणारे वाणही उपलब्ध आहे. यामध्ये ११० तसेच १२० दिवसांचे बियाणेही आहे. पण, ऋतूचक्र बदलल्याने याचा वापर कमी होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

...........................................

शेतकरी म्हणतात...

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतील उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच कमी कालावधीत पीक येणार असेल, तर त्याकडे शेतकरी वळतो. आता सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे जास्त आहे.

- राजाराम पाटील, शेतकरी

..........................

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. दरामुळे सोयाबीन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. सोयाबीनचा दर टिकून राहिल्यास आणखी क्षेत्र वाढू शकते.

- प्रवीण काळे, शेतकरी

..............................................................