शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला, तरी शेतकरी मालामाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मागील काही वर्षांत सोयाबीनला चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मागील काही वर्षांत सोयाबीनला चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ होत आहे. त्याचबरोबर आता कमी कालावधीतही पीक येणारे सोयाबीन वाण आले आहे. त्यामुळे पाऊस कधीही पडला तरी शेतकरी मालामाल होणार आहे. तसेच जिल्ह्यात पाच वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. यावर्षी हंगामात ऊस वगळून सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर होते. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर, तर सोयाबीनचे ६३७५४ हेक्टर होते. तसेच ज्वारी, भुईमूग, मका या पिकांचेही क्षेत्र राहिले. जिल्ह्यात काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढलेले आहे. याला कारण म्हणजे सोयाबीनला मिळणारा चांगला दर. सध्या तर क्विंटलला ९ हजारांपर्यंत भाव येत आहे. त्यातच यावर्षी ७४ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ११५ च्या वर आहे.

सोयाबीन पीक घेताना कोणी घरचे बियाणे वापरतो, तर कोणी विकतचे आणतो. तसेच आता नवीन वाणही येत आहे. त्यामुळे कमी कालावधीतही सोयाबीन येऊ लागले आहे.

................................

जिल्ह्यात वाढला सोयाबीन पेरा

वर्ष पेरा (हेक्टरमध्ये)

२०१७ ७३०४४

२०१८ ६३३१४

२०१९ ६००७५

२०२० ७३३९१

२०२१ ७४८३९

.................................................

झटपट येणारे सोयाबीन...

सोयाबीनमध्ये विविध संशोधित वाण बाजारात आले आहे. यामध्ये अर्ली व्हरायटी सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. झटपट हातात येणारे पीक म्हणून याकडे पाहिले जात आहे. ८० ते ९० दिवसांत पीक येते.

...........................

मध्यम कालावधीत येणारे...

अल्पावधीबरोबरच मध्यम कालवधीत येणारे सोयाबीन वाणही आहे. साधारणत: ९० ते १०० दिवसांत हे सोयाबीन पीक येत आहे. जमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून याची पेरणी केली जाते.

.................................

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

सोयाबीनमध्ये उशिरा येणारे वाणही उपलब्ध आहे. यामध्ये ११० तसेच १२० दिवसांचे बियाणेही आहे. पण, ऋतूचक्र बदलल्याने याचा वापर कमी होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

...........................................

शेतकरी म्हणतात...

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतील उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच कमी कालावधीत पीक येणार असेल, तर त्याकडे शेतकरी वळतो. आता सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे जास्त आहे.

- राजाराम पाटील, शेतकरी

..........................

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. दरामुळे सोयाबीन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. सोयाबीनचा दर टिकून राहिल्यास आणखी क्षेत्र वाढू शकते.

- प्रवीण काळे, शेतकरी

..............................................................