शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

साहित्य निर्मितीसाठी महिला, कष्टकऱ्यांना प्रेरित करणार

By admin | Updated: November 16, 2014 23:49 IST

निर्मला पाटील : ढवळीत तुकोबाराय साहित्य संमेलन उत्साहात

सांगली : साहित्य निर्मिती करण्यासाठी कष्टकरी, महिला व शेतकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी परिषद प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांनी केले. ढवळी (ता. वाळवा) येथे तुकोबाराय साहित्य परिषदेच्या जिल्ह्यातील पहिल्या ग्राम शाखेचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र यादव यांच्याहस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन डॉ. पाटील बोलत होत्या. प्रदेश सचिव नितीन सावंत आदी उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाल्या की, समाजपरिवर्तनाचा मुख्य हेतू समोर ठेवून साहित्याच्या माध्यमातून विचारक्रांती, समाजक्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न साहित्य परिषदेतून करण्यात येत आहे. यासाठी गावा-गावात परिषदेच्या शाखा पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी आयोजित साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. टाळ, मृदंगासह अभंग गायनाने ही दिंडी गावातील प्रमुख रस्त्यावरून अंबामातेच्या मंदिराजवळ नेण्यात आली. गावाच्या इतिहासाच्या फलकाचे उद्घाटन प्रा. राजेंद्र यादव यांच्याहस्ते करण्यात आले.संमेलनाची सुरुवात लोकगीतांनी करण्यात आली. ग्रामस्थांनी गवळण, भारुड, ओव्यांचे सादरीकरण केले. नितीन सावंत यांनी ‘संतांचे समाजकार्य, त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार’ या विषयावर प्रवचन दिले. दत्तात्रय भोसले यांनी, विठोबाचा वारकरी व तुकोबाचा शेतकरी कसा असला पाहिजे याबाबत विचार मांडले. आभार तंटामुक्तीचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी मानले. यावेळी ग्रामशाखेच्या अध्यक्षा सुवर्णा पाटील, शीतल पाटील, डॉ. दिग्विजय पाटील, माजी सरपंच शरद पाटील, एम. एस. पाटील, उमेश शेवाळे, अमर पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ढवळी (ता. वाळवा) येथे साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी डॉ. निर्मला पाटील, प्रा. राजेंद्र यादव, नितीन सावंत, दत्तात्रय भोसले, उमेश शेवाळे, शरद पाटील आदी उपस्थित होते.