शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

साहित्य निर्मितीसाठी महिला, कष्टकऱ्यांना प्रेरित करणार

By admin | Updated: November 16, 2014 23:49 IST

निर्मला पाटील : ढवळीत तुकोबाराय साहित्य संमेलन उत्साहात

सांगली : साहित्य निर्मिती करण्यासाठी कष्टकरी, महिला व शेतकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी परिषद प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांनी केले. ढवळी (ता. वाळवा) येथे तुकोबाराय साहित्य परिषदेच्या जिल्ह्यातील पहिल्या ग्राम शाखेचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र यादव यांच्याहस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन डॉ. पाटील बोलत होत्या. प्रदेश सचिव नितीन सावंत आदी उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाल्या की, समाजपरिवर्तनाचा मुख्य हेतू समोर ठेवून साहित्याच्या माध्यमातून विचारक्रांती, समाजक्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न साहित्य परिषदेतून करण्यात येत आहे. यासाठी गावा-गावात परिषदेच्या शाखा पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी आयोजित साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. टाळ, मृदंगासह अभंग गायनाने ही दिंडी गावातील प्रमुख रस्त्यावरून अंबामातेच्या मंदिराजवळ नेण्यात आली. गावाच्या इतिहासाच्या फलकाचे उद्घाटन प्रा. राजेंद्र यादव यांच्याहस्ते करण्यात आले.संमेलनाची सुरुवात लोकगीतांनी करण्यात आली. ग्रामस्थांनी गवळण, भारुड, ओव्यांचे सादरीकरण केले. नितीन सावंत यांनी ‘संतांचे समाजकार्य, त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार’ या विषयावर प्रवचन दिले. दत्तात्रय भोसले यांनी, विठोबाचा वारकरी व तुकोबाचा शेतकरी कसा असला पाहिजे याबाबत विचार मांडले. आभार तंटामुक्तीचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी मानले. यावेळी ग्रामशाखेच्या अध्यक्षा सुवर्णा पाटील, शीतल पाटील, डॉ. दिग्विजय पाटील, माजी सरपंच शरद पाटील, एम. एस. पाटील, उमेश शेवाळे, अमर पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ढवळी (ता. वाळवा) येथे साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी डॉ. निर्मला पाटील, प्रा. राजेंद्र यादव, नितीन सावंत, दत्तात्रय भोसले, उमेश शेवाळे, शरद पाटील आदी उपस्थित होते.