शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

नुकसानग्रस्त गावांसह रस्त्यांचीही पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:42 IST

कऱ्हाड : पाटण तालुक्यातील केरा विभागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित गावांचा पाहणी दौरा राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांनी केला. ...

कऱ्हाड : पाटण तालुक्यातील केरा विभागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित गावांचा पाहणी दौरा राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांनी केला. यावेळी ठिकठिकाणी झालेल्या नुकसानाची ग्रामस्थांकडून त्यांनी माहिती घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे यावेळी उपस्थित होते. पिंपळोशी, बोंद्री, चिटेघर, आंबवणे, दिवशी खुर्द, खिवशी, चाफोली येथील नुकसानाची सारंग पाटील यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त ग्रामस्थांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.

मालदनच्या विद्यालयाला सांगलीच्या संस्थेची मदत

कऱ्हाड : महापुरात मोठे नुकसान झालेल्या मालदन (ता. पाटण) येथील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलला सांगलीच्या स्वस्वरूप शोधक साधक संस्था व राधाकृष्ण मंदिरामार्फत शैक्षणिक साहित्याची मदत देण्यात आली. पुस्तके, वह्या, फळा, डस्टर, मार्कर पेन अशा स्वरुपात संस्थेने दिलेल्या मदतीचे वाटप सचिन काळे, शिवाजी काळे, विक्रम सपकाळ, रमेश चव्हाण, प्रवीण इंगळे, हेमंत खैरमोडे, प्रतीक सुतार, अभिजीत जाधव आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजी वाघ, अजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले.

येरवळे शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन

कऱ्हाड : कोळे (ता. कऱ्हाड) येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारत बांधकामासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. माजी सरपंच सुभाषराव पाटील यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी ‘कृष्णा’चे माजी संचालक सर्जेराव लोकरे, माजी सरपंच पांडुरंग यादव, ग्रामपंचायत सदस्य कविता यादव, मंगल कुंभार, तानाजी यादव, राहुल राऊत, राजेंद्र वाघमारे, दिलीप यादव, बजरंग यादव, शंकर कुंभार, दादासाहेब यादव, संजय यादव, बापूराव यादव, गणेश पवार, हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष उत्तम पाटील, के. पी. यादव, तानाजी वास्के, ज्ञानेश्वर लोकरे उपस्थित होते.

राजाभाऊ काळे यांचा निवडीबद्दल सत्कार

कऱ्हाड : पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ काळे यांची जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव जगताप, शिवप्रेमी मनोहर यादव, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव कोळेकर, आनंद गुरव, शंकर मोहिते, लक्ष्मण चव्हाण, अनिल भोसले, गणेश मोरे, मंगेश पाटणकर, सुरेश संकपाळ, राजेंद्र साळुंखे, विक्रम मोहिते, सागर माळी, हरिश तवटे, महेश साळुंखे, राजेंद्र कोळी आदी उपस्थित होते.