शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात आवक वाढली; कांद्याला २८०० रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असून, निर्यात बंदी उठविल्यापासून दरातही वाढ झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असून, निर्यात बंदी उठविल्यापासून दरातही वाढ झाली आहे. रविवारी क्विंटलला दीड हजारापासून २८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. या आठवड्यात दरात ५०० रुपयांची वाढ झाली, तर पालेभाज्या अजूनही स्वस्तच असून, शेवगा मात्र तेजीत आहे. हिरव्या मिरचीलाही भाव मिळू लागला आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होते.

सातारा बाजार समितीत रविवारी एकूण १ हजार २४ क्विंटल शेतमालाची आवक झाली. यामध्ये कांद्याची १२३ क्विंटलची आवक झाली. वांग्याचा दर कमी-जास्त होत असल्याचे दिसून आले. १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर या आठवड्यातही शेवग्याचा दर तेजीत निघाला. हिरव्या मिरचीला १० किलोला ३५० ते ४०० रुपये भाव आला.

तेलाचे दर आणखी वाढले...

मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. आतातर १५ किलोंच्या डब्यामागे १०० ते १५० रुपयांची वाढ झाली. शेंगदाणा तेल २२०० ते २३०० रुपयांपर्यंत मिळत आहे. पामतेल १७०० ते १८००, सोयाबीन १९५० ते २०००, सूर्यफूल तेल डबा २००० ते २१०० पर्यंत मिळत आहे, तर लिटरमागे सरासरी पाच रुपये वाढ आहे.

फळांची आवक चांगली

साताऱ्यात फळांची आवक चांगली आहे. त्यामुळे दर स्थिर आहेत. सफरंचद ८० ते १०० रुपये, तर केळी ३० रुपये डझनपासून मिळत आहे.

आले स्वस्त

भाज्यांच्या दरात चढ-उतार सुरू आहे. गवारला १० किलोला ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. दोडका १५० ते २००, कोबी ३० ते ५० रुपये, कारली २०० ते २५०, टोमॅटोला ४० ते ६० रुपये दर १० किलोला मिळाला. आले स्वस्त असून, क्विंटलला एक हजारपासून १८०० पर्यंत भाव मिळाला.

भाज्यांच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहे. एखाद्या आठवड्यात वांगी महाग होतात, तर दुसऱ्यावेळी अन्य फळभाज्यांचे दर वाढलेले असतात. सध्या टोमॅटो, कोबी, फ्लॉवरचे दर आटोक्यात आहेत.

- ज्ञानेश्वर पवार, ग्राहक

खाद्यतेलाची आवक कमी आहे. त्यामुळे पुरवठा कमी आहे. परिणामी तेलाचे दर वाढत चालले आहेत. कोरोना विषाणूमुळेच ही स्थिती निर्माण झालेली आहे. पुढील महिन्यापर्यंत असेच चित्र राहील.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

बाजार समितीत भाजीपाल्यांची आवक चांगली होत आहे. यामुळे दरात अपेक्षेऐवढी वाढ नाही. कोबी, फ्लॉवर आणि टोमॅटोला भाव कमीच आहे, अशीची स्थिती काही दिवस राहील.

- कोंडिबा काळे, शेतकरी

.....................................................................................................................................................