शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

लसीचे डोस वाढवा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:35 IST

वडूज : वडूजमध्ये सध्या अगदी कासवगतीने लसीकरण सुरू आहे. चार दिवसातून एकदा फक्त ८० ते १०० डोस येत आहेत ...

वडूज : वडूजमध्ये सध्या अगदी कासवगतीने लसीकरण सुरू आहे. चार दिवसातून एकदा फक्त ८० ते १०० डोस येत आहेत तर लस घेण्यासाठी तालुक्यातील चार-पाचशे लोक गर्दी करतात, त्यामुळे लसीकरणाच्या दिवशी उपस्थित असणाऱ्या काही लोकांना लस मिळते तर ७० टक्के लोकांना लस न घेताच परत जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून लसीचे डोस वाढवावेत अन्यथा येत्या चार-पाच दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे नगरसेवक अनिल माळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनातील अधिक माहिती अशी की, वडूजसारख्या तालुक्याच्या ठिकाणी दररोज सुमारे ५०० डोस देणे गरजेचे असून, यामध्ये प्रथम डोस घेतलेल्या सुमारे १,५०० लोकांना ८५ दिवस उलटून गेले तरीही दुसरा डोस मिळालेला नाही. तसेच पहिल्या डोससाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्याही हजारांच्या घरात आहे. जिल्ह्याच्या ठिकाणाहून नियोजन करणारे अधिकारी जाणूनबुजून कोणताही निकष न लावता वडूजला कमी प्रमाणात डोस उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे वृद्ध व अपंगांना लसीसाठी महिनाभर हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून लसीकरण केंद्र तसेच लसीकरणाला येणाऱ्याची संख्या विचारात घेऊन वडूज येथे आरोग्य विभागाची स्वतंत्र यंत्रणा लावून जास्तीत जास्त लस देण्याचे प्रयत्न करावेत. आमच्या या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास नजीकच्या काळात आम्हाला शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. आमच्या या मागणीचा सारासार विचार करण्यात यावा अन्यथा येत्या चार ते पाच दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर बोबाबोंब आंदोलन करणार असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जयवंत पाटील, नियोजन सभापती प्रदीप खुडे, शशिकांत पाटोळे, सोमनाथ जाधव, संजय काळे आदी उपस्थित होते.

(चौकट)

नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपची सत्ता...

तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरातील नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षासोबत भाजपच्या नगरसेवकांची अभेद्य युती असूनही कोरोना महामारीच्या काळात ठोस अशी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. केंद्रात एकमेव भाजप तर राज्यात राष्ट्रवादीसोबत काँग्रेस अशी सत्ता आहे. तर वडूज नगर पंचायतीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्तेवर असूनही या काळात जनतेकडे कानाडोळा केला जातो, याला सर्वस्वी जबाबदार कोण, असा प्रश्न येथील नागरिकांमधून विचारला जात आहे.