शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

लसीचे डोस वाढवा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:35 IST

वडूज : वडूजमध्ये सध्या अगदी कासवगतीने लसीकरण सुरू आहे. चार दिवसातून एकदा फक्त ८० ते १०० डोस येत आहेत ...

वडूज : वडूजमध्ये सध्या अगदी कासवगतीने लसीकरण सुरू आहे. चार दिवसातून एकदा फक्त ८० ते १०० डोस येत आहेत तर लस घेण्यासाठी तालुक्यातील चार-पाचशे लोक गर्दी करतात, त्यामुळे लसीकरणाच्या दिवशी उपस्थित असणाऱ्या काही लोकांना लस मिळते तर ७० टक्के लोकांना लस न घेताच परत जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून लसीचे डोस वाढवावेत अन्यथा येत्या चार-पाच दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे नगरसेवक अनिल माळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनातील अधिक माहिती अशी की, वडूजसारख्या तालुक्याच्या ठिकाणी दररोज सुमारे ५०० डोस देणे गरजेचे असून, यामध्ये प्रथम डोस घेतलेल्या सुमारे १,५०० लोकांना ८५ दिवस उलटून गेले तरीही दुसरा डोस मिळालेला नाही. तसेच पहिल्या डोससाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्याही हजारांच्या घरात आहे. जिल्ह्याच्या ठिकाणाहून नियोजन करणारे अधिकारी जाणूनबुजून कोणताही निकष न लावता वडूजला कमी प्रमाणात डोस उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे वृद्ध व अपंगांना लसीसाठी महिनाभर हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून लसीकरण केंद्र तसेच लसीकरणाला येणाऱ्याची संख्या विचारात घेऊन वडूज येथे आरोग्य विभागाची स्वतंत्र यंत्रणा लावून जास्तीत जास्त लस देण्याचे प्रयत्न करावेत. आमच्या या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास नजीकच्या काळात आम्हाला शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. आमच्या या मागणीचा सारासार विचार करण्यात यावा अन्यथा येत्या चार ते पाच दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर बोबाबोंब आंदोलन करणार असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जयवंत पाटील, नियोजन सभापती प्रदीप खुडे, शशिकांत पाटोळे, सोमनाथ जाधव, संजय काळे आदी उपस्थित होते.

(चौकट)

नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपची सत्ता...

तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरातील नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षासोबत भाजपच्या नगरसेवकांची अभेद्य युती असूनही कोरोना महामारीच्या काळात ठोस अशी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. केंद्रात एकमेव भाजप तर राज्यात राष्ट्रवादीसोबत काँग्रेस अशी सत्ता आहे. तर वडूज नगर पंचायतीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्तेवर असूनही या काळात जनतेकडे कानाडोळा केला जातो, याला सर्वस्वी जबाबदार कोण, असा प्रश्न येथील नागरिकांमधून विचारला जात आहे.