शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

लसीचे डोस वाढवा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:35 IST

वडूज : वडूजमध्ये सध्या अगदी कासवगतीने लसीकरण सुरू आहे. चार दिवसातून एकदा फक्त ८० ते १०० डोस येत आहेत ...

वडूज : वडूजमध्ये सध्या अगदी कासवगतीने लसीकरण सुरू आहे. चार दिवसातून एकदा फक्त ८० ते १०० डोस येत आहेत तर लस घेण्यासाठी तालुक्यातील चार-पाचशे लोक गर्दी करतात, त्यामुळे लसीकरणाच्या दिवशी उपस्थित असणाऱ्या काही लोकांना लस मिळते तर ७० टक्के लोकांना लस न घेताच परत जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून लसीचे डोस वाढवावेत अन्यथा येत्या चार-पाच दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे नगरसेवक अनिल माळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनातील अधिक माहिती अशी की, वडूजसारख्या तालुक्याच्या ठिकाणी दररोज सुमारे ५०० डोस देणे गरजेचे असून, यामध्ये प्रथम डोस घेतलेल्या सुमारे १,५०० लोकांना ८५ दिवस उलटून गेले तरीही दुसरा डोस मिळालेला नाही. तसेच पहिल्या डोससाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्याही हजारांच्या घरात आहे. जिल्ह्याच्या ठिकाणाहून नियोजन करणारे अधिकारी जाणूनबुजून कोणताही निकष न लावता वडूजला कमी प्रमाणात डोस उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे वृद्ध व अपंगांना लसीसाठी महिनाभर हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून लसीकरण केंद्र तसेच लसीकरणाला येणाऱ्याची संख्या विचारात घेऊन वडूज येथे आरोग्य विभागाची स्वतंत्र यंत्रणा लावून जास्तीत जास्त लस देण्याचे प्रयत्न करावेत. आमच्या या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास नजीकच्या काळात आम्हाला शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. आमच्या या मागणीचा सारासार विचार करण्यात यावा अन्यथा येत्या चार ते पाच दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर बोबाबोंब आंदोलन करणार असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जयवंत पाटील, नियोजन सभापती प्रदीप खुडे, शशिकांत पाटोळे, सोमनाथ जाधव, संजय काळे आदी उपस्थित होते.

(चौकट)

नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपची सत्ता...

तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरातील नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षासोबत भाजपच्या नगरसेवकांची अभेद्य युती असूनही कोरोना महामारीच्या काळात ठोस अशी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. केंद्रात एकमेव भाजप तर राज्यात राष्ट्रवादीसोबत काँग्रेस अशी सत्ता आहे. तर वडूज नगर पंचायतीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्तेवर असूनही या काळात जनतेकडे कानाडोळा केला जातो, याला सर्वस्वी जबाबदार कोण, असा प्रश्न येथील नागरिकांमधून विचारला जात आहे.