शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

पुनर्वापराशिवाय खाद्यपदार्थ करणेच अशक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:42 IST

सातारा : वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. मात्र, एकदा वापरलेले तेल फेकून दिल्यानंतर पदार्थ बनविण्याचा ...

सातारा : वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. मात्र, एकदा वापरलेले तेल फेकून दिल्यानंतर पदार्थ बनविण्याचा खर्चाचा आकडा वाढेल जो सामान्यांना न परवडणारा असेल. त्यामुळे हातगाड्यासह हॉटेलमध्येही या तेलाचा सर्रास वापर केला जातो. वापरलेल्या तेलातून निघणारे ट्रान्स फॅट हृदयासाठी घातक आहेत.

बहुतांश हॉटेल, रेस्टॉरंट, स्नॅक्स सेंटरमध्ये खाद्यपदार्थ तळण्यासाठी एकदा तेल टाकल्यानंतर त्याच तेलात वेगवेगळे पदार्थ तळतात. वास्तविक, पाहता प्रत्येक पदार्थांसाठी वेगळं तेल वापरणे आवश्यक आहे; पण ते परवडत नसल्याने तेलाचा पुनर्वापर होत आहे. लोकही विचार न करता स्वादिष्ट अन् चविष्ट लागल्यावर पदार्थ आवडीने खातात. जिभेचे हे चोचले अवघ्या शरीराला त्रास देणारे आहेत.

वडे, भजी, पुऱ्या, समोसे, कचोरी असे पदार्थ वारंवार तळलेल्या तेलाचा वापर करून करतात. हेच पदार्थ आपण आवडीने खातो. अशा पुनर्वापर करून तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे घसा दुखणे, पोटाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोगासारखे आजारही बळावू शकतात.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) तेलाचा पुनर्वापर वाढवतोय कॉलेस्ट्रॉल

(कोटला फोटो आहे)

तेलात फॅटी ॲसिड असतात. पुनर्वापर केलेल्या तेलाचे फॅटी ॲसिडचे रूपांतर ट्रान्स फॅट्समध्ये होते. हे ट्रान्स फॅटस कोलेस्ट्रॉल वाढवून हृदयावर परिणाम करतात. त्यामुळे बाहेर खाताना तळलेले पदार्थ टाळणे हा उत्तम पर्याय आहे. कार्यालयीन दौऱ्याच्या निमित्ताने बाहेर पडणं होत असेल तर घरात केलेला चिवडा, ड्रायफ्रुटस्, फळे हा आहार ठेवणं सर्वोत्तम.

- प्रीती रेवले, आहारतज्ज्ञ, सातारा

या पर्यायांचा विचार होणे आवश्यक आहे

नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने फिरण होत असल्याने अनेकांच्या खाण्याचा प्रश्न उद्भवतो. अशा वेळी घरून सुक अन्न नेणं उपयुक्त ठरते. यात पौष्टिक लाडू, भाजून केलेला चिवडा, भडंग, सुकामेवा हे सोबत ठेवणे उपयुक्त आहे. ज्याही ठिक़ाणी फिरताय तिथे स्थानिक फळांचा आस्वाद घेणंही आरोग्यदायी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. स्नॅकिंगची हौस भविष्यात अनेक आजारांचे निमित्त ठरू शकते याचे भान ठेवून अन्नाचे सेवन करावे असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

२) रस्त्यावर न खाल्लेलेच बरे

बाहेर मिळणाऱ्या तळलेल्या पदार्थांचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. हातगाडीवर वडा तळणाऱ्या व्यावसायिकाला तेलाचे पुनर्वापर टाळणे केवळ अशक्य आहे. घरातही एकदा वापरलेले तेल कोणी टाकून देत नाही, त्यामुळे व्यावसायिक तर सर्रासपणे तेलाचा पुनर्वापर करतात. त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होणार असेल तर ते अन्नपदार्थ न खाणं हा उत्तम पर्याय आहे. अगदीच तळलेले पदार्थ खायचेच असतील तर मग रेडी टू फ्राय पदार्थ घरी आणावेत आणि ते घरात तळून खाणे हा एक पर्याय असू शकतो.