शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

ऊस बिलाबाबतीत राबवा गुजरात पॅटर्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST

सातारा : उसाची एकरकमी किंमत देताना कारखाने बँकांकडून कर्ज घेतात व व्याजाचा जादा बोजा सहन करतात, त्यापेक्षा टप्प्यात किंमत ...

सातारा : उसाची एकरकमी किंमत देताना कारखाने बँकांकडून कर्ज घेतात व व्याजाचा जादा बोजा सहन करतात, त्यापेक्षा टप्प्यात किंमत दिली तर वाचलेली व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असे म्हटले आहे. गुजरातमधील कारखाने अशा प्रकारे ऊस बिले देत आल्याने तेथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. तेथील शेतकरी शेवटच्या टप्प्याची रक्कम कारखान्यांकडे ठेव म्हणून ठेवतात. त्यामुळे उसाचे पैसे एकरकमी की टप्प्यात हा गौण मुद्दा आहे, असे शेतकरी संघटनेचे मत आहे.

नीती आयोग तसेच केंद्रीय कृषी मूल्य व खर्च समितीने उसाची किंमत हप्त्याने देण्याची शिफारस केल्याने अनेक संघटना व त्यांचे नेते विरोध दर्शवत आहेत. ऊस नियंत्रण आदेश १९६६ मध्ये, ऊस विकणारा व खरेदीदार यांच्यात करार झाला असेल तर कराराप्रमाणे उसाची किंमत अदा करावी. नसेल तर १४ दिवसात एफआरपी ध्यावी ’असे म्हणाले आहे. याचा अर्थ शेतकरी व कारखाना यांच्यात टप्प्यात ऊस बिल घेण्या-देण्याचे ठरले असेल तर तसे दिले जाईल, अशी जुनी तरतूद आहे. यात नीती व सीएसीपीने ही शिफारस करताना नवे काही सांगितले नाही.

आताही माजी खासदार राजू शेट्टी राजकीय कारणास्तव शेतकऱ्यांना भरीस घालत आहेत. टप्प्याला विरोध करणारी उरलेली मंडळी तुकडे पाडताना शेट्टींचे सहकारी राहिले आहेत. अलीकडील चार वर्षांत कारखाने एफआरपी देऊ शकत नसल्याने केंद्राने साखर निर्यातीला सक्ती करत त्यासाठी प्रती क्विंटल ११०० व ६०० रुपये अनुदान दिले आहे तसेच बंदरापर्यंतचा वाहतूक खर्च, साखर तारण कर्जावर व्याज, गोदाम भाडे यासाठी अनुदान तर बाजारात साखरेचे भाव घसरू नयेत म्हणून साखरेचे किमान विक्री मूल्य ३१०० रूपये क्विंटल केले आहे. तसेच मासिक विक्री हिस्सा ठरवून दिला आहे. तसेच पेट्रोलियम कंपन्यांना १० टक्के इथेनॉल मिश्रणाची सक्ती करत वेगवेगळ्या टप्प्यांतील इथेनॉलला प्रति लिटर ४५,६९, ५७,६१,६२,६५ इतका दर दिला आहे. इथेनॉल टाक्या उभा करण्यासाठी अनुदान दिले आहे. हे सर्व शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी मिळावी व ती देण्यासाठी कारखानदारांना मदत केली आहे.

कोट...

अतिरिक्त ऊस व साखर उत्पादन या सध्याच्या समस्या पाहता टप्प्यात ऊस बिले द्या, पण गुजरातमधील कारखान्याप्रमाणे दर द्या, अशी आमची मागणी आहे.

- बाळासाहेब चव्हाण अध्यक्ष शेतकरी संघटना सातारा

शेट्टींची श्रेयासाठी घाई

‘गुजरातप्रमाणे दर द्यावा’ अशी शेतकरी संघटनेची दीर्घकाळापासून मागणी आहे. आता टप्प्यांना विरोध करणाऱ्या व दहा वर्षे खासदार राहिलेल्या राजू शेट्टींनी कायद्यातील कराराच्या तरतुदी विरुद्ध लोकसभेत तोंड उघडले नाही. इतकेच नव्हे तर आम्ही ऊसदर आंदोलन करत असताना श्रेयासाठी घाईघाईने कधी ९०० ३८० रु; १२०० ३००रु; १९०० ४६०; कधी ८० २० अशा तुकड्यांची तडजोड केली, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.