शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ऊस बिलाबाबतीत राबवा गुजरात पॅटर्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST

सातारा : उसाची एकरकमी किंमत देताना कारखाने बँकांकडून कर्ज घेतात व व्याजाचा जादा बोजा सहन करतात, त्यापेक्षा टप्प्यात किंमत ...

सातारा : उसाची एकरकमी किंमत देताना कारखाने बँकांकडून कर्ज घेतात व व्याजाचा जादा बोजा सहन करतात, त्यापेक्षा टप्प्यात किंमत दिली तर वाचलेली व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असे म्हटले आहे. गुजरातमधील कारखाने अशा प्रकारे ऊस बिले देत आल्याने तेथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. तेथील शेतकरी शेवटच्या टप्प्याची रक्कम कारखान्यांकडे ठेव म्हणून ठेवतात. त्यामुळे उसाचे पैसे एकरकमी की टप्प्यात हा गौण मुद्दा आहे, असे शेतकरी संघटनेचे मत आहे.

नीती आयोग तसेच केंद्रीय कृषी मूल्य व खर्च समितीने उसाची किंमत हप्त्याने देण्याची शिफारस केल्याने अनेक संघटना व त्यांचे नेते विरोध दर्शवत आहेत. ऊस नियंत्रण आदेश १९६६ मध्ये, ऊस विकणारा व खरेदीदार यांच्यात करार झाला असेल तर कराराप्रमाणे उसाची किंमत अदा करावी. नसेल तर १४ दिवसात एफआरपी ध्यावी ’असे म्हणाले आहे. याचा अर्थ शेतकरी व कारखाना यांच्यात टप्प्यात ऊस बिल घेण्या-देण्याचे ठरले असेल तर तसे दिले जाईल, अशी जुनी तरतूद आहे. यात नीती व सीएसीपीने ही शिफारस करताना नवे काही सांगितले नाही.

आताही माजी खासदार राजू शेट्टी राजकीय कारणास्तव शेतकऱ्यांना भरीस घालत आहेत. टप्प्याला विरोध करणारी उरलेली मंडळी तुकडे पाडताना शेट्टींचे सहकारी राहिले आहेत. अलीकडील चार वर्षांत कारखाने एफआरपी देऊ शकत नसल्याने केंद्राने साखर निर्यातीला सक्ती करत त्यासाठी प्रती क्विंटल ११०० व ६०० रुपये अनुदान दिले आहे तसेच बंदरापर्यंतचा वाहतूक खर्च, साखर तारण कर्जावर व्याज, गोदाम भाडे यासाठी अनुदान तर बाजारात साखरेचे भाव घसरू नयेत म्हणून साखरेचे किमान विक्री मूल्य ३१०० रूपये क्विंटल केले आहे. तसेच मासिक विक्री हिस्सा ठरवून दिला आहे. तसेच पेट्रोलियम कंपन्यांना १० टक्के इथेनॉल मिश्रणाची सक्ती करत वेगवेगळ्या टप्प्यांतील इथेनॉलला प्रति लिटर ४५,६९, ५७,६१,६२,६५ इतका दर दिला आहे. इथेनॉल टाक्या उभा करण्यासाठी अनुदान दिले आहे. हे सर्व शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी मिळावी व ती देण्यासाठी कारखानदारांना मदत केली आहे.

कोट...

अतिरिक्त ऊस व साखर उत्पादन या सध्याच्या समस्या पाहता टप्प्यात ऊस बिले द्या, पण गुजरातमधील कारखान्याप्रमाणे दर द्या, अशी आमची मागणी आहे.

- बाळासाहेब चव्हाण अध्यक्ष शेतकरी संघटना सातारा

शेट्टींची श्रेयासाठी घाई

‘गुजरातप्रमाणे दर द्यावा’ अशी शेतकरी संघटनेची दीर्घकाळापासून मागणी आहे. आता टप्प्यांना विरोध करणाऱ्या व दहा वर्षे खासदार राहिलेल्या राजू शेट्टींनी कायद्यातील कराराच्या तरतुदी विरुद्ध लोकसभेत तोंड उघडले नाही. इतकेच नव्हे तर आम्ही ऊसदर आंदोलन करत असताना श्रेयासाठी घाईघाईने कधी ९०० ३८० रु; १२०० ३००रु; १९०० ४६०; कधी ८० २० अशा तुकड्यांची तडजोड केली, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.