शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

अजिंक्यताऱ्यावर तळीजोड प्रकल्प राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:58 IST

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले अजिंंक्यतारा येथील संस्मरणीय इतिहास जागता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ...

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले अजिंंक्यतारा येथील संस्मरणीय इतिहास जागता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. येथे तळीजोड प्रकल्प राबविण्याबरोबरच इतर विकासात्मक कामे व गोडोली तळे सुशोभीकरणासाठी नगरपरिषदेने अंदाजपत्रकात भरीव तरतूद करावी, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आजपर्यंत किल्ले अजिंंक्यताराचा परिसर आणि गोडोली तळ्याचा भाग नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट नव्हता. तथापि, चार महिन्यांपूर्वी झालेल्या हद्दवाढीत हा परिसर नगरपरिषदेच्या क्षेत्रात आला आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाची प्राथमिक जबाबदारी नगरपरिषदेची राहणार आहे. त्यामुळेच किल्ला परिसराचा विकास करण्यासाठी कायमस्वरूपी आर्थिक उपाययोजना करायला हव्यात.

किल्ले अजिंक्यतारा हा दीपस्तंभाप्रमाणे सातारकरांना नेहमीच प्रेरणा देत आला आहे. याच किल्ला परिसरातून अटकेपार पोहोचलेल्या मराठा साम्राज्याचा कारभार पाहिला जात होता. या किल्ल्यावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे अल्पकाळ वास्तव्य होते, याचा सार्थ अभिमान सर्व सातारकरांना आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या किल्ले अजिंंक्यताऱ्याचा विकास साध्य करण्यासाठी नगरपरिषदेने येथील राजसदरेवरून नागरिकांकरिता पहाता येईल, असा लाईट ॲंड साऊंड शो, गडावरील तळी जोड प्रकल्प, आवश्यक तेथे विद्युतीकरण, गडावरील मंदिरांची डागडुजी आणि सुशोभीकरण, वृक्षारोपण आदी कामांसाठी भरीव तरतूद करावी.

तसेच गोडोली तळ्याची निर्मिती तत्कालीन जिल्हाधिकारी आणि समाजसेवक डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गर्शनाखाली करण्यात आली आहे. या तळ्याच्या भिंतीवर वॉकिंग पाथवे, तळ्याच्या बाजूने वृक्षारोपण करणे, ओपन जिम आदींसाठी नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात यावी, अशा सूचना उदयनराजे भोसले यांनी केल्या आहेत.