शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

पावसासाठी ढगांना दोरीनं बांधून खेचता आलं तर !

By admin | Updated: June 6, 2016 00:42 IST

शेतकऱ्यांच्या व्यथा : चित्ररुपातून मांडल्या

खंडाळा : कोरडे डोळे, कोरडे आभाळ, भेगाळलेली धरती...गर्जत ये घनश्यामा, कर धरणीची स्वप्नपूर्ती..! दुष्काळाचे सावट, पाणीटंचाईची भीषण समस्या, यामुळे कंबरडे मोडले आहे. वाळलेली पिके आणि भेगाळलेल्या जमिनी अशी सर्वत्र विदारक परिस्थिती पाहायला मिळते. माणसांबरोबरच मुक्या जनावरांचाही जीव कासावीस झाला आहे. कुठुनतरी पाऊस बरसावा आणि तृष्णा भागावी. अशावेळी ढगांना बांधून खेचता आलं तर अशी अपेक्षा शेतकरी करीत असताना मेघराजा आता बरसू लागला आहे. शेतकऱ्यांच्या या व्यथा चित्राच्या माध्यमातून मांडून खंडाळ्यातील स्वप्नील पवार आणि रवींद्र पवार या बंधूंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. समाजप्रबोधनात्मक अनेक विषयांवर विविधांगी उपदेश देणारी चित्रे बनवून सोशल मीडियावर ती लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. स्वप्नील पवार हे व्यवसायाने फोटोग्राफर तर रवींद्र पवार हे सर्पमित्र, प्राणीमित्र म्हणून ओळखले जातात. सध्या स्वत:चेच फोटो काढून सोशल मीडियावर वाहवा मिळविण्यासाठी तरुणांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. अशावेळी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी प्रबोधनात्मक चित्रे बनवून ती प्रसारीत करण्याची कल्पना पवार बंधूंना सूचली. त्यामधून वेगवेगळ्या विषयांवरील चित्रांची निर्मिती झाली. बोलण्यापेक्षा कृतीतून समाजाला दिशा देण्याचा हा प्रयत्न इतरांना प्रोत्साहन देणारा आहे. (प्रतिनिधी) प्राण्यांविषयी लहानपणापासून लळा आहे. त्यातूनच फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. याच कलेतून सामाजिक ज्वलंत विषयावर समाजप्रबोधन करण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. प्राणी-पक्ष्यांविषयी माहितीपर पुस्तिका तयार करून ती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. - रवींद्र पवार, प्राणीमित्र