शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

कुराणात विवेकवादी विचारांची मांडणी

By admin | Updated: January 14, 2015 23:50 IST

बाबूराव गुरव : ‘इस्लाम’ समज-गैरसमज याबाबत जनजागृती अभियान

कऱ्हाड : विवेकवादी विचारांची पहिली मांडणी ‘कुराणा’त झाली आहे़ त्यामुळे मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाने कुराण वाचलेच पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ बाबूराव गुरव यांनी केले़ येथील वेणूताई चव्हाण स्मारकात ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’ या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘इस्लाम : समज, गैरसमज’ या विषयावर बाबुराव गुरव बोलत होते़ यावेळी इम्तीयाज शेख, नौशाद उस्मान, इकबाल मुल्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ गुरव म्हणाले, आजही मुस्लिम समाजात जागृती गरजेची आहे़ हे लोक जागे होत नाहीत, हीच तर विरोधकांची ताकद आहे़ त्यामुळे ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’चा हा जनजागरण अभियानाचा उपक्रम स्तुत्य आहे़ यातून जागृती होईल अशी आशा धरायला हरकत नाही़मुळामध्ये धर्म म्हणजे काय ? हे समजून घेतले पाहिजे, स्वामी विवेकानंदांनी माणसांमध्ये दैवत व पूर्णत्व असते; असे सांगितले आहे़ पण दैवत्वाचा साक्षात्कार म्हणजे दैव अन पूर्णत्वाचा साक्षातकार म्हणजे शिक्षण हे मुस्लिम समाजबांधवांनी समजून घेतले पाहिजे़ खरं तर आज प्रत्येकाच्या घरात तुकारामांची गाथा अन् कुराणाची प्रत गरजेची आहे़ आज कुराणाचा मराठीतील अनुवाद उपलब्ध आहे़ तो वाचा म्हणजे इस्लाम म्हणजे काय..? याबाबत आमच्या डोक्यात जे गैरसमज निर्माण झाले आहेत ते दूर होतील अन् इस्लाम चा खरा अर्थ ‘शांती’ आहे हे आम्हाला पटेल़ आज विज्ञान अन अध्यात्म असा वाद घालणं चुकीचं आहे़ कारण धर्माशिवाय विज्ञान आंधळं आहे़ तर विज्ञानाशिवाय धर्म पांगळा आहे़ हे साऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे़ कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यावेळी मान्यवर सहभागी झाले होते.नदीम सिद्ीकी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले़ (प्रतिनिधी)़़़तर पश्चिम महाराष्ट्र शहाणा होईल कऱ्हाड अन् मिरज ही पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लिम संख्या अधिक असणारी शहरं आहेत़ इथला मुस्लिम समाज शिक्षित व सुसंस्कृत झाला, तर पश्चिम महाराष्ट्रातील समाज शहाणा होईल असे डॉ़ गुरव यांनी व्यक्त केले़