शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

कुराणात विवेकवादी विचारांची मांडणी

By admin | Updated: January 14, 2015 23:50 IST

बाबूराव गुरव : ‘इस्लाम’ समज-गैरसमज याबाबत जनजागृती अभियान

कऱ्हाड : विवेकवादी विचारांची पहिली मांडणी ‘कुराणा’त झाली आहे़ त्यामुळे मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाने कुराण वाचलेच पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ बाबूराव गुरव यांनी केले़ येथील वेणूताई चव्हाण स्मारकात ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’ या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘इस्लाम : समज, गैरसमज’ या विषयावर बाबुराव गुरव बोलत होते़ यावेळी इम्तीयाज शेख, नौशाद उस्मान, इकबाल मुल्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ गुरव म्हणाले, आजही मुस्लिम समाजात जागृती गरजेची आहे़ हे लोक जागे होत नाहीत, हीच तर विरोधकांची ताकद आहे़ त्यामुळे ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’चा हा जनजागरण अभियानाचा उपक्रम स्तुत्य आहे़ यातून जागृती होईल अशी आशा धरायला हरकत नाही़मुळामध्ये धर्म म्हणजे काय ? हे समजून घेतले पाहिजे, स्वामी विवेकानंदांनी माणसांमध्ये दैवत व पूर्णत्व असते; असे सांगितले आहे़ पण दैवत्वाचा साक्षात्कार म्हणजे दैव अन पूर्णत्वाचा साक्षातकार म्हणजे शिक्षण हे मुस्लिम समाजबांधवांनी समजून घेतले पाहिजे़ खरं तर आज प्रत्येकाच्या घरात तुकारामांची गाथा अन् कुराणाची प्रत गरजेची आहे़ आज कुराणाचा मराठीतील अनुवाद उपलब्ध आहे़ तो वाचा म्हणजे इस्लाम म्हणजे काय..? याबाबत आमच्या डोक्यात जे गैरसमज निर्माण झाले आहेत ते दूर होतील अन् इस्लाम चा खरा अर्थ ‘शांती’ आहे हे आम्हाला पटेल़ आज विज्ञान अन अध्यात्म असा वाद घालणं चुकीचं आहे़ कारण धर्माशिवाय विज्ञान आंधळं आहे़ तर विज्ञानाशिवाय धर्म पांगळा आहे़ हे साऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे़ कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यावेळी मान्यवर सहभागी झाले होते.नदीम सिद्ीकी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले़ (प्रतिनिधी)़़़तर पश्चिम महाराष्ट्र शहाणा होईल कऱ्हाड अन् मिरज ही पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लिम संख्या अधिक असणारी शहरं आहेत़ इथला मुस्लिम समाज शिक्षित व सुसंस्कृत झाला, तर पश्चिम महाराष्ट्रातील समाज शहाणा होईल असे डॉ़ गुरव यांनी व्यक्त केले़