शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक चालवायचीय बंद पाडायची नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST

वावरहिरे, (ता. माण) येथे श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वावरहिरे शाखेच्या नूतनीकरणाच्या उदघाटनप्रसंगी रामराजे बोलत होते. यावेळी माजी विभागीय ...

वावरहिरे, (ता. माण) येथे श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वावरहिरे शाखेच्या नूतनीकरणाच्या उदघाटनप्रसंगी रामराजे बोलत होते. यावेळी माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक नरेंद्र पाटील, सुभाष नरळे, संदीप मांडवे, उपनगराध्यक्ष धनाजी माने, एम.के. भोसले, बाळासाहेब सावंत, सरपंच चंद्रकांत वाघ, रमेश कदम, सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील पोळ, उपाध्यक्ष सुरेश इंगळे तसेच संचालक, सरव्यवस्थापक महादेव गोंजारी उपस्थित होते. रामराजे म्हणाले, ‘येणाऱ्या काळात सहकार क्षेत्रावर मोठे संकट घोंघावत आहे, त्यामुळे सहकार टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत शेतकऱ्यांची पत

नसल्याने त्यांना कर्ज प्रकरणे मिळत नव्हती. यावर कै. वाघोजीराव काकांसारख्या दूरदृष्टी नेत्यांनी सहकार क्षेत्रात लक्ष घालत पतसंस्था काढल्या. बँकेत पत नसलेल्या लोकांना पतसंस्थेच्या माध्यमातून पत मिळवून देत कर्जप्रकरणे देऊन आर्थिक साहाय्य केले.’

प्रभाकर

घार्गे म्हणाले, ‘काकांच्याकडे आम्ही अनेकांना कर्ज द्या म्हणून केलेल्या शिफारशी त्वरित मान्य झाल्या; परंतु एखाद्याला कर्जप्रकरणात वसुलीला थोडी सवलत द्या, अशा शिफारशी कधीच ऐकल्या नाहीत. यावरूनच त्यांच्या कार्याची ओळख होऊन जाते. प्रभाकर देशमुख म्हणाले, काकांच्या निधनाने संस्थेत मोठी पोकळी

निर्माण झाली असली तरी ती पोकळी भरून काढण्याचे काम सुनील पोळ सर्वांना बरोबर घेऊन करताना दिसून येत आहे. नरेंद्र पाटील म्हणाले, काकांच्यानंतर सुनील बापूंना बळ देण्याची गरज आहे. त्यांना राजेंचा राजाश्रय तर आहेच, पण सर्व सभासद ठेवीदारांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. सुनील पोळ यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा दिला. संचालिका नीलिमाताई पोळ यांनी स्वागत केले. सभासदांच्या वतीने वीरभद्र कावडे यांनी मनोगत व्यक्त केले. अमोल काटकर यांनी सूत्रसंचालन केले. सरव्यवस्थापक महादेव गोंजारी यांनी आभार मानले.

चौकट..

मल्ल्याचे कर्ज रिझर्व्ह बँक भरतेय...

रिझर्व्ह बँक सहकारच्या मुळावर उठली आहे. त्यांना सहकार संस्थाच मोडीतच काढायच्या आहेत. त्यामुळेच त्यांचे जाचक नियम पतसंस्था, जिल्हा बँकांवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठे कर्ज बुडवून गेलेल्या विजय मल्ल्याचे कर्ज रिझर्व्ह बँक भरतेय. मात्र, छोट्या कर्जधारकांना रिझर्व्ह बँक धारेवर धरतेय, हा कोणता न्याय. माझे तर असे मत आहे की ही रिझर्व्ह बँकच नष्ट करून टाकली पाहिजे.

फोटो - वावरहिरे ता.माण येथे रामराजे नाईक निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी आमदार

प्रभाकर घार्गे, निवृत्त सनदी आधिकारी प्रभाकर देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, फेडरेशन अध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

3 Attachments