शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनात आलं ते केलं; आयुष्याचं समाधान मिळालं!

By admin | Updated: April 20, 2016 23:30 IST

जितेंद्र शिंदे : शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धांतून आलं ‘डेअरिंग’; शेतीत प्रयोग करण्याच्या जिद्दीने बनविलं जिल्हा कृषी अधीक्षक

सागर गुजर ल्ल साताराठरवून क्षेत्र निवडायचं आणि त्यातच करिअर करायचं, हे मोजक्याच लोकांच्या बाबतीत घडतं. त्यासाठी लागते ती जे काय करायचंय त्याबद्दलची श्रद्धा आणि अफाट प्रयत्न! साताऱ्याचे जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे यांनी हेच काम एका व्रताप्रमाणे अंगीकारले. वडिलांची इच्छा होती, त्यांनी पोलिस व्हावे, पण त्यांना वेध लागले होते, कृषी अधिकारी होऊन निर्णय प्रक्रियेत जायचे! हे ध्येय त्यांनी साध्य केलंय. अगदी मनात आले ते केले; आयुष्यभराचे समाधान मिळाले, असे त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवत राहिले. फलटण तालुक्यातील साठेफाटा हे जितेंद्र शिंदे यांचे मूळ गाव! घरची अडीच एकर शेती. मात्र केवळ शेतीवर अवलंबून न राहता, नोकरीच्या माध्यमातून कुटुंब सावरण्यासाठी जितेंद्र शिंदे यांचे वडील पांडुरंग शिंदे यांनी मुंबईत पोलिस दलात सेवेसाठी दाखल झाले. पत्नीसह चार मुले असे मोठे कुटुंब मुंबईतल्या पोलिस वसाहतीत राहत होते. त्यामुळे जितेंद्र यांचे प्राथमिक ते बारावीचे शिक्षण मुंबईतच झाले. अभ्यासासोबत खेळ, वक्तृत्व स्पर्धा, नाटके यांमध्ये सहभाग घेऊन आपली आवड जोपासण्याचा त्यांनी प्रयत्न केला. थोरांची चरित्रे वाचून काढली. खेळामुळे संघटित वृत्ती तर वाचनामुळे विचारांची बैठक तयार झाली. आत्मविश्वास वाढला. त्याकाळी आकाशवाणीवर किलबिलसारख्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असायचा. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, या शालेय जीवनातील नाटकात त्यांनी बालशिवाजी साकारला होता.१९८२ मध्ये दहावीमध्ये पोलिस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यांनी संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक मिळविला. त्यानंतर अकरावी व बारावीसाठी ते पारला कॉलेजमध्ये दाखल झाले. योगायोगाने प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित त्यांच्या वर्गात शिकायला होती. तिच्याशी जास्त बोलणे झाले नाही; पण नशिबामुळे व गुणवत्तेमुळे शाळा, महाविद्यालये चांगली मिळाली. शिक्षकांनी सर्वच विषयांचा पाया मजबूत करून घेतला. आयोगाच्या परीक्षांसाठी हा पाया मजबूत असणे आवश्यक असते. स्पर्धा परीक्षेची तयारीच जणू शालेय जीवनापासून सुरू होती. बारावीनंतर कृषी अभियांत्रिकीमध्ये पदवी घेण्याचा निर्णय घेतला. राहुरी कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी घेतली. महाविद्यालयाच्या स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. पदवीनंतर लगेचच पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली. या परीक्षेत ते महाराष्ट्रात पहिले आले; पण त्यांना वर्ग १ चे पद खुणावत होते. त्यामुळे त्यांनी ही नोकरी स्वीकारली नाही. त्यानंतर कृषी खात्यातच वर्ग २ च्या जागी संधी मिळाली. एमटेक झाल्यानंतर कृषी उपसंचालक ही वर्ग १ ची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. सोलापूर, नांदेड, सातारा येथे काम करताना ज्ञानाचा त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपयोग करायचा ठरविले.शेतीसाठी पाणी आणि मजूर या दोन समस्यांवरच त्यांचे सध्या काम चालले आहे. जलयुक्त शिवारमध्ये असंख्य कामे त्यांनी उभी केली. ‘पर ड्रॉप...मोअर क्रॉप,’ हर खेत को पाणी,’ ‘वावर तिथे ठिबकची पॉवर,’ अशा संकल्पना साकारल्या. एका शेतकऱ्याने निर्माण केलेले यांत्रिकी शेतीचे तंत्रज्ञान कृषी विभागामार्फत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायची तळमळ त्यांच्या कृतीतून नेहमी दिसते.‘तंत्रज्ञान विकास’ हा अजेंडा घेऊन पुढे काम सुरू असल्याचे जितेंद्र शिंदे सांगतात. अभ्यासाच्या पुस्तकात ठेवून वाचली थोरांची चरित्रे!आई-वडिलांचे लक्ष अभ्यासावर असायचे. क्रमिक पुस्तके वाचण्यावर भर असायचा, आई अशिक्षित तर वडील सातवी पास पोलिस, तरीही त्यांचे विशेष लक्ष आम्ही काय अभ्यास करतोय, याच्यावर असायचे. मला वाचनाची एवढी हौस की क्रमिक पुस्तकांच्या पानांत ठेवून शिवचरित्र व इतर थोरा-मोठ्यांची चरित्रे मी वाचून काढली.खेळाने टिकवला उत्साहसंपूर्ण आयुष्य मुंबईत गेले. टेबल टेनिस, क्रिकेट, मॅरेथॉन या खेळांची आवड. अजूनही ती जोपासली आहे. साताऱ्यात झालेल्या हिल मॅरेथॉन स्पर्धा केवळ दोन तासांत पूर्ण केली. टेबल टेनिस स्पर्धेत विद्यापीठातील कॅप्टन होतो. तर क्रिकेट हा खेळ जीव की प्राण! रोज दोन तास व्यायाम काम करण्यासाठी फायद्याचा ठरतोय त्यामुळेच उत्साह कायम टिकून आहे.