शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक भाजीला स्वच्छतेचा उतारा

By admin | Updated: October 5, 2015 00:14 IST

हॉटेलमध्ये भाज्या निवडीचा कंटाळा : भाजी स्वच्छतेबाबत गृहिणी अधिक सजग; फ्लॉवर, कोबी, टोमॅटो ताजे असले तरी आतून असू शकतात खराब--लोकमत सर्वेक्षण

सातारा : भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा बेसुमार मारा केला जातो. त्यामुळे निर्भेळ, सकस, पौष्टिक म्हणावा असा आहार आता राहिलेला नाही. प्रत्येक भाजीत विषारी अंश हे असतातच, हे सर्वांना कळून चुकले आहे. भाज्यांची स्वच्छता आवश्यक असते. स्वयंपाक घरात आणि हॉटेल्समध्ये अन्नपदार्थ बनविताना याबाबत नेमकी काय काळजी घेतली जाते याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात असे दिसून आले की, हॉटेलमध्ये भाज्या न निवडता फक्त धुवून वापरण्याचे प्रमाण २१ टक्के आहे, तर गृहिणी मात्र भाज्यांच्या स्वच्छतेबाबत अधिक सजग असून त्या भाज्या निवडून स्वच्छ धुवून घेत असल्याचे प्रमाण ६८ टक्के आहे. (लोकमत चमू)रसायने करताहेत रोगप्रतिकारशक्ती क्षीणफळभाज्यांवर पडलेल्या किडीमुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर रसायने, कीटकनाशकांची फवारणी करतात. कीटकनाशकांची फवारणी केलेल्या भाज्या, फळे न धुता खाल्यास अनेक रोगांना नियंत्रण दिले जाते. विशेषत: यामुळे मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच क्षीण होत असल्याचे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे.जागतिक आरोग्य संघटनेनेही पिकांवरील कीटकनाशकांच्या दुष्परिणामामुळे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अनेक नामवंत कंपन्यांनी कोणत्या पिकावर किती प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करावा, हे ठरवून दिलेले असते. मात्र, याची काटेकोर अंमलबजावणी केली जातेच, असे नाही. औषधांची विक्री केल्या जात असलेल्या दुकानदारांकडूनही यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. कीटनाशकांमध्ये अनेक घातक रसायने असतात. डोळ्यांना सहजासहजी दिसत नसले तरी त्या खाल्याने अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. त्वचा विकास जडणे, कॅन्सर किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचा धोका असतो. नोकरदार महिलांची कसरतभाजीवर कीटकनाशके मारली असल्याचे कितीही सांगितले जात असले तरी त्या पूर्णपणे निर्जंतुक करणे नोकरदार गृहिणींसाठी जिकिरीचे झाले आहे. आदल्या दिवशीच भाजीची तयारी करून ठेवावी लागत आहे.भाजीमंडईत येणाऱ्या भाज्यांवर कीटकनाशके फवारलेली असतात. याची माहिती असणाऱ्या गृहिणी अत्यंत सावधपणे भाजी धुऊन घेतात.मेथी, चाकवत, पालक यासारख्या पालेभाज्या किमान तीन ते चार वेळा पाण्यातून काढूनच धुतलेल्या भाज्या फोडणीला दिल्या जातात. ४वांगे, दोडका या फळभाज्या कापण्याआधीच धुऊन घेण्याची सवय अनेक गृहिणींनी स्वत:ला लावून घेतली आहे; पण भेंडी आणि गवारी यासारख्या भाज्या तातडीने धुऊन करणे कसरतीचे ठरते. भेंडीत चिकटपणा जास्त असतो.धुऊन घेणे म्हणजे काय?स्वयंपाक करताना अनेक महिला एकात एक कामे उरकून घेत असतात. एकीकडे चपाती, दुसरीकडे भाजी तर तिसरीकडे दूध तापवणे अशा सर्व आखाड्यांवर तिला लढावे लागते. अनेकदा सकाळी मुलांची शाळा, डबे यात त्यांना भाजी धुण्यासाठी वेळ कमी पडतो. अशावेळी केवळ पाण्यातून काढण्यातच त्या समाधान मानतात. वास्तविक पालेभाज्या करताना त्या धुऊन अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवल्याने निर्जंतुक होतात, असे तज्ज्ञ सांगतात. म्हणून रात्रीच जर ही तयारी करून ठेवली तर ताण कमी होईल आणि आरोग्य जपले जाईल. भेंडी लगेच धुऊन केली तर ती अधिक चिकट होते. म्हणून रात्री भेंडी स्वच्छ धुऊन कापडात गुंडाळून ठेवणे सोयीस्कर ठरते. भाजी धुणे म्हणजे पाण्यातून काढणे नव्हे, हे गृहिणींनी मनाशी पक्के करावे.पालेभाजी करताना काही खबरदारी घेणे गरजेचे असते. भाजी निवडल्यानंतर ती चिरण्यापूर्वीच धुवून घ्यावी. चिरलेली भाजी धुतल्यास त्यातील जीवनसत्वे कमी होतात. भाज्या निवडण्याचे प्रमाण कमीचभाज्यांवर कीटकनाशकांची फवारणी केलेली असते. हॉटेलसाठी मंडईतून आलेल्या भाज्या वापरण्यापूर्वी कोणती काळजी घेता, याबाबत विचारले असता काही हॉटेलचालकांनी स्वच्छ धुवून मगच वापरल्या जातात असे उत्तर दिले; पण फ्लॉवर, कोबी, टोमॅटो अशा फळभाज्या वरून धुवून स्वच्छ होत नाहीत. धुण्यापूर्वी भाज्या निवडणे गरजेचे आहे. किडलेल्या भाज्यांचा वापर न केलेलाच बरा. वरुन ताज्या वाटणाऱ्या फळभाज्या अनेकदा आतून किडलेल्या असतात. फ्लॉवरला आतून बारीक पांढऱ्या अळ्या असतात. टोमॅटोंना कीड लागलेली असते. त्यामुळे व्यवस्थित निवडूनच फळभाज्या वापरल्या पाहिजेत.