शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

रासायनिक भाजीला स्वच्छतेचा उतारा

By admin | Updated: October 5, 2015 00:14 IST

हॉटेलमध्ये भाज्या निवडीचा कंटाळा : भाजी स्वच्छतेबाबत गृहिणी अधिक सजग; फ्लॉवर, कोबी, टोमॅटो ताजे असले तरी आतून असू शकतात खराब--लोकमत सर्वेक्षण

सातारा : भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा बेसुमार मारा केला जातो. त्यामुळे निर्भेळ, सकस, पौष्टिक म्हणावा असा आहार आता राहिलेला नाही. प्रत्येक भाजीत विषारी अंश हे असतातच, हे सर्वांना कळून चुकले आहे. भाज्यांची स्वच्छता आवश्यक असते. स्वयंपाक घरात आणि हॉटेल्समध्ये अन्नपदार्थ बनविताना याबाबत नेमकी काय काळजी घेतली जाते याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात असे दिसून आले की, हॉटेलमध्ये भाज्या न निवडता फक्त धुवून वापरण्याचे प्रमाण २१ टक्के आहे, तर गृहिणी मात्र भाज्यांच्या स्वच्छतेबाबत अधिक सजग असून त्या भाज्या निवडून स्वच्छ धुवून घेत असल्याचे प्रमाण ६८ टक्के आहे. (लोकमत चमू)रसायने करताहेत रोगप्रतिकारशक्ती क्षीणफळभाज्यांवर पडलेल्या किडीमुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर रसायने, कीटकनाशकांची फवारणी करतात. कीटकनाशकांची फवारणी केलेल्या भाज्या, फळे न धुता खाल्यास अनेक रोगांना नियंत्रण दिले जाते. विशेषत: यामुळे मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच क्षीण होत असल्याचे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे.जागतिक आरोग्य संघटनेनेही पिकांवरील कीटकनाशकांच्या दुष्परिणामामुळे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अनेक नामवंत कंपन्यांनी कोणत्या पिकावर किती प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करावा, हे ठरवून दिलेले असते. मात्र, याची काटेकोर अंमलबजावणी केली जातेच, असे नाही. औषधांची विक्री केल्या जात असलेल्या दुकानदारांकडूनही यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. कीटनाशकांमध्ये अनेक घातक रसायने असतात. डोळ्यांना सहजासहजी दिसत नसले तरी त्या खाल्याने अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. त्वचा विकास जडणे, कॅन्सर किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचा धोका असतो. नोकरदार महिलांची कसरतभाजीवर कीटकनाशके मारली असल्याचे कितीही सांगितले जात असले तरी त्या पूर्णपणे निर्जंतुक करणे नोकरदार गृहिणींसाठी जिकिरीचे झाले आहे. आदल्या दिवशीच भाजीची तयारी करून ठेवावी लागत आहे.भाजीमंडईत येणाऱ्या भाज्यांवर कीटकनाशके फवारलेली असतात. याची माहिती असणाऱ्या गृहिणी अत्यंत सावधपणे भाजी धुऊन घेतात.मेथी, चाकवत, पालक यासारख्या पालेभाज्या किमान तीन ते चार वेळा पाण्यातून काढूनच धुतलेल्या भाज्या फोडणीला दिल्या जातात. ४वांगे, दोडका या फळभाज्या कापण्याआधीच धुऊन घेण्याची सवय अनेक गृहिणींनी स्वत:ला लावून घेतली आहे; पण भेंडी आणि गवारी यासारख्या भाज्या तातडीने धुऊन करणे कसरतीचे ठरते. भेंडीत चिकटपणा जास्त असतो.धुऊन घेणे म्हणजे काय?स्वयंपाक करताना अनेक महिला एकात एक कामे उरकून घेत असतात. एकीकडे चपाती, दुसरीकडे भाजी तर तिसरीकडे दूध तापवणे अशा सर्व आखाड्यांवर तिला लढावे लागते. अनेकदा सकाळी मुलांची शाळा, डबे यात त्यांना भाजी धुण्यासाठी वेळ कमी पडतो. अशावेळी केवळ पाण्यातून काढण्यातच त्या समाधान मानतात. वास्तविक पालेभाज्या करताना त्या धुऊन अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवल्याने निर्जंतुक होतात, असे तज्ज्ञ सांगतात. म्हणून रात्रीच जर ही तयारी करून ठेवली तर ताण कमी होईल आणि आरोग्य जपले जाईल. भेंडी लगेच धुऊन केली तर ती अधिक चिकट होते. म्हणून रात्री भेंडी स्वच्छ धुऊन कापडात गुंडाळून ठेवणे सोयीस्कर ठरते. भाजी धुणे म्हणजे पाण्यातून काढणे नव्हे, हे गृहिणींनी मनाशी पक्के करावे.पालेभाजी करताना काही खबरदारी घेणे गरजेचे असते. भाजी निवडल्यानंतर ती चिरण्यापूर्वीच धुवून घ्यावी. चिरलेली भाजी धुतल्यास त्यातील जीवनसत्वे कमी होतात. भाज्या निवडण्याचे प्रमाण कमीचभाज्यांवर कीटकनाशकांची फवारणी केलेली असते. हॉटेलसाठी मंडईतून आलेल्या भाज्या वापरण्यापूर्वी कोणती काळजी घेता, याबाबत विचारले असता काही हॉटेलचालकांनी स्वच्छ धुवून मगच वापरल्या जातात असे उत्तर दिले; पण फ्लॉवर, कोबी, टोमॅटो अशा फळभाज्या वरून धुवून स्वच्छ होत नाहीत. धुण्यापूर्वी भाज्या निवडणे गरजेचे आहे. किडलेल्या भाज्यांचा वापर न केलेलाच बरा. वरुन ताज्या वाटणाऱ्या फळभाज्या अनेकदा आतून किडलेल्या असतात. फ्लॉवरला आतून बारीक पांढऱ्या अळ्या असतात. टोमॅटोंना कीड लागलेली असते. त्यामुळे व्यवस्थित निवडूनच फळभाज्या वापरल्या पाहिजेत.