शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

रासायनिक भाजीला स्वच्छतेचा उतारा

By admin | Updated: October 5, 2015 00:14 IST

हॉटेलमध्ये भाज्या निवडीचा कंटाळा : भाजी स्वच्छतेबाबत गृहिणी अधिक सजग; फ्लॉवर, कोबी, टोमॅटो ताजे असले तरी आतून असू शकतात खराब--लोकमत सर्वेक्षण

सातारा : भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा बेसुमार मारा केला जातो. त्यामुळे निर्भेळ, सकस, पौष्टिक म्हणावा असा आहार आता राहिलेला नाही. प्रत्येक भाजीत विषारी अंश हे असतातच, हे सर्वांना कळून चुकले आहे. भाज्यांची स्वच्छता आवश्यक असते. स्वयंपाक घरात आणि हॉटेल्समध्ये अन्नपदार्थ बनविताना याबाबत नेमकी काय काळजी घेतली जाते याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात असे दिसून आले की, हॉटेलमध्ये भाज्या न निवडता फक्त धुवून वापरण्याचे प्रमाण २१ टक्के आहे, तर गृहिणी मात्र भाज्यांच्या स्वच्छतेबाबत अधिक सजग असून त्या भाज्या निवडून स्वच्छ धुवून घेत असल्याचे प्रमाण ६८ टक्के आहे. (लोकमत चमू)रसायने करताहेत रोगप्रतिकारशक्ती क्षीणफळभाज्यांवर पडलेल्या किडीमुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर रसायने, कीटकनाशकांची फवारणी करतात. कीटकनाशकांची फवारणी केलेल्या भाज्या, फळे न धुता खाल्यास अनेक रोगांना नियंत्रण दिले जाते. विशेषत: यामुळे मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच क्षीण होत असल्याचे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे.जागतिक आरोग्य संघटनेनेही पिकांवरील कीटकनाशकांच्या दुष्परिणामामुळे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अनेक नामवंत कंपन्यांनी कोणत्या पिकावर किती प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करावा, हे ठरवून दिलेले असते. मात्र, याची काटेकोर अंमलबजावणी केली जातेच, असे नाही. औषधांची विक्री केल्या जात असलेल्या दुकानदारांकडूनही यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. कीटनाशकांमध्ये अनेक घातक रसायने असतात. डोळ्यांना सहजासहजी दिसत नसले तरी त्या खाल्याने अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. त्वचा विकास जडणे, कॅन्सर किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचा धोका असतो. नोकरदार महिलांची कसरतभाजीवर कीटकनाशके मारली असल्याचे कितीही सांगितले जात असले तरी त्या पूर्णपणे निर्जंतुक करणे नोकरदार गृहिणींसाठी जिकिरीचे झाले आहे. आदल्या दिवशीच भाजीची तयारी करून ठेवावी लागत आहे.भाजीमंडईत येणाऱ्या भाज्यांवर कीटकनाशके फवारलेली असतात. याची माहिती असणाऱ्या गृहिणी अत्यंत सावधपणे भाजी धुऊन घेतात.मेथी, चाकवत, पालक यासारख्या पालेभाज्या किमान तीन ते चार वेळा पाण्यातून काढूनच धुतलेल्या भाज्या फोडणीला दिल्या जातात. ४वांगे, दोडका या फळभाज्या कापण्याआधीच धुऊन घेण्याची सवय अनेक गृहिणींनी स्वत:ला लावून घेतली आहे; पण भेंडी आणि गवारी यासारख्या भाज्या तातडीने धुऊन करणे कसरतीचे ठरते. भेंडीत चिकटपणा जास्त असतो.धुऊन घेणे म्हणजे काय?स्वयंपाक करताना अनेक महिला एकात एक कामे उरकून घेत असतात. एकीकडे चपाती, दुसरीकडे भाजी तर तिसरीकडे दूध तापवणे अशा सर्व आखाड्यांवर तिला लढावे लागते. अनेकदा सकाळी मुलांची शाळा, डबे यात त्यांना भाजी धुण्यासाठी वेळ कमी पडतो. अशावेळी केवळ पाण्यातून काढण्यातच त्या समाधान मानतात. वास्तविक पालेभाज्या करताना त्या धुऊन अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवल्याने निर्जंतुक होतात, असे तज्ज्ञ सांगतात. म्हणून रात्रीच जर ही तयारी करून ठेवली तर ताण कमी होईल आणि आरोग्य जपले जाईल. भेंडी लगेच धुऊन केली तर ती अधिक चिकट होते. म्हणून रात्री भेंडी स्वच्छ धुऊन कापडात गुंडाळून ठेवणे सोयीस्कर ठरते. भाजी धुणे म्हणजे पाण्यातून काढणे नव्हे, हे गृहिणींनी मनाशी पक्के करावे.पालेभाजी करताना काही खबरदारी घेणे गरजेचे असते. भाजी निवडल्यानंतर ती चिरण्यापूर्वीच धुवून घ्यावी. चिरलेली भाजी धुतल्यास त्यातील जीवनसत्वे कमी होतात. भाज्या निवडण्याचे प्रमाण कमीचभाज्यांवर कीटकनाशकांची फवारणी केलेली असते. हॉटेलसाठी मंडईतून आलेल्या भाज्या वापरण्यापूर्वी कोणती काळजी घेता, याबाबत विचारले असता काही हॉटेलचालकांनी स्वच्छ धुवून मगच वापरल्या जातात असे उत्तर दिले; पण फ्लॉवर, कोबी, टोमॅटो अशा फळभाज्या वरून धुवून स्वच्छ होत नाहीत. धुण्यापूर्वी भाज्या निवडणे गरजेचे आहे. किडलेल्या भाज्यांचा वापर न केलेलाच बरा. वरुन ताज्या वाटणाऱ्या फळभाज्या अनेकदा आतून किडलेल्या असतात. फ्लॉवरला आतून बारीक पांढऱ्या अळ्या असतात. टोमॅटोंना कीड लागलेली असते. त्यामुळे व्यवस्थित निवडूनच फळभाज्या वापरल्या पाहिजेत.