शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

शंभर कोटींचे धरण साडेतीनशे कोटींवर !

By admin | Updated: April 17, 2015 00:14 IST

वांग-मराठवाडीचे काम अद्याप अपूर्णच : वीस वर्षांत तीनवेळा काम बंद पडले, बुडीत क्षेत्रही अद्याप कोरडे

सणबूर : वांग-मराठवाडी धरणामुळे पाटण तालुक्यातील २ हजार ८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या धरणासाठी आजपर्यंत सुमारे साडेतीनशे कोटी खर्च झाले आहेत. मात्र, तरीही धरणाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकरी व स्थलांतरीत झालेले धरणग्रस्त यांचे हाल सुरू आहेत.सध्याच्या पुनर्वसित गावांचा खर्च शासनाच्या तिजोरीवर पडत आहे. तो खर्च वांग-मराठवाडी धरण पूर्ण झाल्यावरच थांबणार आहे. शासनाने धरणाच्या कामाला निधी उपलब्ध करून दिला तरच धरणाच्या कामाला गती येईल. सध्या दुष्काळावर होणारा खर्च धरणाच्या कामाला झाला असता तर बराच दुष्काळ कमी झाला असता. ज्या ठिकाणी धरणग्रस्तांना जमिनी देण्यात आल्या ते ठिकाण लाभक्षेत्र म्हणून शासनाने घोषित केले आहे. त्या ठिकाणच्या जमिनीला पाणी मिळालेच पाहिजे. शासनाने त्यांना पाणी दिले नाही, तर नवीन भूसंपादन व पुनर्वसन कायद्यानुसार संबंधित धरणग्रस्तांना प्रतिमहिना तीन हजार रुपये शासनाने देण्याची तरतूद कायद्यामध्येच आहे. त्यामुळे हा होणारा खर्च शासनावरच पडणार आहे. ही मागणीही धरणग्रस्तांनी चळवळीच्या माध्यमातून शासनाकडून मान्य करून घेतली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात बागायती जमीन मिळविण्याची खात्री धरणग्रस्तांना झाली आहे. शासनाने विशेष बाब म्हणून सिंचन प्रकल्प व सिंचनाच्या योजनेसाठी निधीची तरतूद करण्याची गरज आहे. यापूर्वी आघाडी सरकारकडून धरणग्रस्तांना खास बाब म्हणून वेगळा निधी दिला जात होता. त्याचप्रमाणे युती शासनाने याच धोरणावर निधी उपलब्ध करून द्यावा व सिंचनाच्या योजना पूर्ण कराव्यात, अशी धरणग्रस्तांची मागणी आहे. धरणग्रस्तांचे ज्या ठिकाणी पुनर्वसन झाले आहे, त्याठिकाणी त्यांनी जमिनी उपलब्ध आहेत. त्याठिकाणी गावठाण आणि सर्व नागरी सुविधाही उपलब्ध असताना धरणग्रस्त त्याठिकाणी राहण्यास जात नाहीत. १९ वर्षांच्या कालावधीत धरणाचे काम तीन वेळा बंद पडले. कधी निधीअभावी तर कधी धरणग्रस्तांच्या आंदोलनामुळे. सुरुवातीला धरणाचे काम सुरू झाले, त्यावेळी हे धरण ८६ कोटींचे होते. मात्र १९ वर्षांच्या कालावधीत हे धरण ३२५ कोटींवर गेले आहे. मात्र, तरीही अद्याप धरणाचे ४० टक्के काम बाकी आहे. यापुढे या धरणाला अजून किती खर्च होईल, हे सांगणेही कठीण बनले आहे. तसेच प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनी शासनाच्या ताब्यात असूनसुद्धा प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाणीसाठा होत नाही. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी व स्थलांतर झालेले धरणग्रस्त या दोघींचेही हाल होत आहेत. (वार्ताहर) दुष्काळी भागालाही फायदाप्रत्येकवर्षी मार्च ते जून महिन्यांपर्यंत या ठिकाणी पिण्याच्या पाण्याबरोबरच रब्बी हंगामात या प्रकल्पामुळे फायदा होणार आहे. शिवाय दुष्काळग्रस्त भागाला या प्रकल्पामुळे लाभ होणार आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव व खानापूर तालुक्याला या धरणाच्या पाण्याचा लाभ होणार आहे. असे असतानाही अद्याप या धरणाच्या कामाचे भिजत घोंगडे कायम आहे.वांग-मराठवाडी धरण निधीअभावी तर कधीकधी आंदालनामुळे बंद पडले. ते सुरू होण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने पुनर्वसनासाठी घेतल्या आहेत, तेथील शेतकऱ्यांच्या जमिनीला शासनाने पाणी द्यावे, अशी आमची मागणी आहे. - जगन्नाथ विभुते, सदस्य, श्रमिक मुक्ती दल