शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

किती ही लूट; बाजार समितीत कांदा १५ तर घराजवळ ३० रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्यांना दर जेमतेम मिळत असला तरी मंडई, दुकानात जादा दर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्यांना दर जेमतेम मिळत असला तरी मंडई, दुकानात जादा दर आकारला जातो. साताऱ्यात तर बाजार समितीत १० ते १५ किलोने मिळणारा कांदा घराजवळच्या दुकानात ३० रुपये किलोने दिला जात आहे. तसेच मेथी, शेपूच्या पेंडीमागे ५ ते १० रुपये जादा घेतले जातात.

सातारा शहरातील विविध भागात चार मंडई आहेत. तसेच फुटपाथ आणि दुकानांतून भाज्यांची विक्री होते. याठिकाणी बहुतांश शेतमाल हा सातारा बाजार समितीतून खरेदी करुन विक्रीसाठी आणलेला असतो. तसेच काही शेतकरी स्वत: रस्त्यावर उभे राहून भाजीपाला विकतात. बाजार समितीत शेतमालाचा भाव कमी निघतो. पण, भाजी मंडई आणि दुकानांतून भाज्यांमागे जादा दर आकारला जातो. त्यामुळे किरकोळ विक्रेते हे भाज्यांमागे किलोला १० ते २० रुपये जादा घेतात. सध्या बाजार समितीत कांद्याला ५ ते २० रुपये दर मिळतो. पण, किरकोळ विक्रेते हा चांगला कांदा ३० रुपये किलोपर्यंत विकतात. तसेच इतर भाज्यांचे दरही वाढवले जात असल्याचे दिसते.

..........

मंडईत कांदा २५ तर दुकानात ३० रुपये किलो...

मंडईत येणाऱ्या ग्राहकांची संख्या जादा असते. त्यातच विक्रेते हे मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करुन मंडईत ठेवतात. त्यामुळे एकदम कांदा घेतल्याने त्यांना बऱ्यापैकी स्वस्त मिळतो. त्यामुळे मंडईत चांगला कांदा २५ रुपयांना किलो मिळतो तर छोट्या दुकानात त्यासाठी ३० रुपये घेतले जातात.

..........................

पिकवतात शेतकरी, अधिकचा पैसा तिसऱ्याच्याच हातात...

- शेतकरी भाजीपाला पिकवतात. त्यानंतर वाहनांतून हा शेतमाल बाजारात आणला जातो. याठिकाणी जेमतेमच पैसेच त्यांच्या हातात पडतात.

- कधी-कधी दर पडल्यास वाहतूक खर्चही निघत नाही. पण, बाजार समितीतून हा भाजीपाला दुकानदार, विक्रेते घेऊन जातात व वाढीव दराने विकतात.

- किरकोळ दुकानदार आणि मंडईतील विक्रेते गिऱ्हाईकांना अधिक किंमत सांगून नंतर थोडा दर कमी करुन भाजीपाला विकतात. पण, भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच मिळत नसते.

....................................

हा बघा, दरातील फरक (प्रतिकिलो दर)

बाजार समिती दुकानात

कांदा १० ते २० ३०

वांगी ३० ६०

टोमॅटो ८ ते १० २०

कोबी ६ ते ७ २०

गवार ३० ८०

कारली ३० ६०

दोडका ३० ६०

फ्लॉवर ४० ६०

वाटाणा ६० १००

शेवगा शेंग ४० ८०

....................................................

पाव, अर्धा किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही...

बाजार समितीत घाऊक स्वरुपात भाजीपाला मिळतो. पण, नेहमीच ताजी भाजी खाण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे पाव किंवा अर्धा किलो भाजीसाठी घाऊक बाजाराच्या ठिकाणी जाता येत नाही.

- शांताराम काळे, ग्राहक

.........................

आवश्यकता वाटेल तेव्हा भाजी विकत घेण्यात येते. त्यामुळे जवळच्या दुकानातून किंवा मंडईतून ती आणली जाते. त्यामुळे घाऊकपेक्षा अधिक दर द्यावा लागतो.

- राधा पवार, गृहिणी

......................................................

एवढा फरक कसा ?

बाजार समितीतून तसेच तेथीलच जवळपास विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला दररोज आणला जातो. त्यामुळे वाहतूक खर्च करावा लागतो. त्यामुळे ग्राहकांकडून चार-पाच रुपये किलोमागे जादा घ्यावे लागतात तरच दुकान चालणार आहे.

- रामचंद्र पाटील, दुकानदार

.......

दररोज बाजार समितीतून भाज्या आणतो. दुकानात भाज्या ठेवल्यावर गिऱ्हाईक सगळा माल नेत नसते. काही भाज्या खराब होतात. त्याचाही विचार करुन परवडेल अशा पद्धतीने भाज्यांची विक्री होते.

- आनंद काळे, दुकानदार

.........................................................