शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

चक्क घरचं अंगण घेतलं भाडेकरारावर!

By admin | Updated: May 26, 2015 00:54 IST

वृध्द जोडप्याचं हाल : पोलीसदादा म्हणतो, ‘तुम्हाला कोणी सांगितलं फसायला’

सातारा : भाकरीच्या अर्ध्या चंद्रासाठी महानगरांत गेलेल्या मुलांच्या संसाराला हातभार लागावा म्हणून घरचं आंगण पवनचक्की कंपनीला भाडे करारावर देणाऱ्या चंद्रू गालवे यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. तीन लाखांची बोली ठरवून दीड वर्षात केवळ पन्नास हजार रुपये देऊन त्यांची बोळवण करणाऱ्या कंपनी कर्मचाऱ्यांना पोलिसांचीही साथ मिळत असल्याचे खेदजनक वास्तव पुढे आले आहे. गोकुळ तर्फ पाटण येथील चंद्रू गालवे यांना तीन मुले. त्यांची ही तिन्ही मुलं रोजगाराच्या निमित्ताने महानगरांत स्थायिक आहेत. सत्तरी ओलांडलेल्या गालवे यांना दोन वर्षांपूर्वी पवनचक्की कंपनीतून काही माणसं भेटायला आली. प्राथमिक बोलणी झाल्यानंतर अंतिम चर्चेसाठी मुलगा येणार असल्याचे सांगून ती बैठकही झाली. बैठकीत ठरल्याप्रमाणे गालवे यांना दीड वर्षांपूर्वी कंपनीने पन्नास हजार रुपये रोख दिले. त्यानंतर मात्र कंपनीने आज, उद्या करत वेळ घालविला. तब्बल दीड वर्षे हेलपाटे मारूनही गालवे यांना त्यांची निर्धारित रक्कम मिळाली नाही.मोरगिरी ते गोकुळ हा १२ किलोमीटरचा रस्ता आहे. यातील चार किलोमीटरची पायपीट करून गालवे पाटण स्टॅण्डला पोहोचतात. तेथून एक किलोमीटरवर कंपनीचे आॅफिस तेही पायीच जाणे. या हेलपाट्यांना वैतागून गालवे यांनी अखेर चढ्या आवाजात कंपनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर ‘पुढील सप्ताहात येऊन चेक न्या,’ असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. त्यानुसार त्यांना एप्रिल २०१५ चा चेक दिला. यातही कंपनीने चलाखी केली. ‘चेक हा सुरक्षेच्या कारणास्तव दिला आहे. तो खात्यात भरू नये,’ असा उल्लेख चेकच्या मागे करण्यात आला आहे. त्यामुळे या धनादेशाचा काहीच उपयोग नसल्याचे गालवे यांच्या लक्षात आले. गालवे यांनी पोलिसांत धाव घेतली तर तिथेही त्यांना धक्कादायक वागणूक मिळाली. आपल्याबाबतीत घडलेल्या गोष्टींची माहिती त्यांना दिल्यानंतर ‘तुम्हाला कोणी सांगितलं होतं फसायला’ अशी भाषा पोलिसांनी वापरली. ‘सद्रक्षणाय’ चे ब्रिद छातीवर बाळगणाऱ्या पोलिसांच्या या भूमिकेमुळे गालवे पुरते खचून गेले आहेत. (प्रतिनिधी)कोणाला सोबत आणायचं नाही.सत्तरी ओलांडलेल्या गालवे यांना संधीवाताचा त्रास आहे. घरापासून कंपनीच्या कार्यालयापर्यंत प्रवासात त्यांच्याबरोबर गावातील तरुण जायचे. कंपनीचे अधिकारी गोड बोलून गालवे यांना फसवू लागले की हे तरुण आक्रमकपणे आपले मत मांडायचे. हे कंपनी कर्मचाऱ्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी गालवे यांना ‘तुम्ही एकटे या, सोबत कोणाला आणले तर कार्यालयात घेणार नाही,’ अशी धमकीही दिली.‘आमच्या गावाकडं शिक्षण आणि नोकरी याची सोय नसल्यामुळे तिन्ही मुलं मुंबईत राहतात. त्यांच्या संसाराला हातभार लागावा आणि अंगणाच्या मोबदल्यात प्रत्येकाला लाख-लाख रुपये मिळावे, या हेतूने मी जागा भाडेकरारावर दिली. डोळे मिटेपर्यंत हे पैसे मिळणार नाहीत, असेच वाटू लागले आहे.’- चंद्रू गालवे, शेतकरी, गोकुळ तर्फ पाटण