शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

रात्री दहानंतर हॉटेल्स बंद

By admin | Updated: July 8, 2015 21:54 IST

जिल्हाधिकारी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक; अधिकाऱ्यांना सूचना

सातारा : ‘जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी संबंधित यंत्रणेने आपापसात समन्वय ठेवून राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील हॉटेल, ढाबे, बिअरबार, परमिट रुम रात्री दहा नंतर बंद करावेत. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंधित व्यक्तींकडील शस्त्रे जमा करून घ्यावीत,’ असे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांची बुधवारी (दि. ८) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘सर्व तहसीलदार पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणताही हलगर्जी होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंधित व्यक्तींकडून शस्त्रास्त्रे जमा करावीत. त्याचबरोबर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता म्हणून संवेदनशील गावे, मतदान केंद्रे यांच्यावर सुरुवातीपासूनच बारकाईने लक्ष ठेवावे. आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. बैठका घेऊन सूचना कराव्यात. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील हॉटेल, धाबे, मद्यविक्रीची दुकाने रात्री दहा नंतर पूर्णपणे बंद करावीत. ग्रामपंचायत निवडणूक पारदर्शी, निर्भयपणे आणि शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहावे, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना काटेकोरपणे अंमलात आणाव्यात,’ अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी मुदगल यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्ट्राँगरुम, मतमोजणीचे ठिकाण, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, संवेदनशील केंद्रे, मनुष्यबळ व प्रशिक्षण याबाबतचा आढावादरम्यान, बुधवारी सकाळी येथील शाहू कला मंदिरात जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंधित प्रशिक्षण दिले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे यांसह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) रात्री दहानंतर हॉटेल बंद करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन नक्कीच करू. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला हॉटेल व्यावसायिकांचे नेहमीच सहकार्य असते. - मारूती जगताप,सातारा, हॉटेल चालक