शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

रात्री दहानंतर हॉटेल्स बंद

By admin | Updated: July 8, 2015 21:54 IST

जिल्हाधिकारी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक; अधिकाऱ्यांना सूचना

सातारा : ‘जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी संबंधित यंत्रणेने आपापसात समन्वय ठेवून राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील हॉटेल, ढाबे, बिअरबार, परमिट रुम रात्री दहा नंतर बंद करावेत. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंधित व्यक्तींकडील शस्त्रे जमा करून घ्यावीत,’ असे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांची बुधवारी (दि. ८) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘सर्व तहसीलदार पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणताही हलगर्जी होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंधित व्यक्तींकडून शस्त्रास्त्रे जमा करावीत. त्याचबरोबर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता म्हणून संवेदनशील गावे, मतदान केंद्रे यांच्यावर सुरुवातीपासूनच बारकाईने लक्ष ठेवावे. आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. बैठका घेऊन सूचना कराव्यात. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील हॉटेल, धाबे, मद्यविक्रीची दुकाने रात्री दहा नंतर पूर्णपणे बंद करावीत. ग्रामपंचायत निवडणूक पारदर्शी, निर्भयपणे आणि शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहावे, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना काटेकोरपणे अंमलात आणाव्यात,’ अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी मुदगल यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्ट्राँगरुम, मतमोजणीचे ठिकाण, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, संवेदनशील केंद्रे, मनुष्यबळ व प्रशिक्षण याबाबतचा आढावादरम्यान, बुधवारी सकाळी येथील शाहू कला मंदिरात जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंधित प्रशिक्षण दिले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे यांसह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) रात्री दहानंतर हॉटेल बंद करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन नक्कीच करू. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला हॉटेल व्यावसायिकांचे नेहमीच सहकार्य असते. - मारूती जगताप,सातारा, हॉटेल चालक