शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसे स्थापनेपासून सोबत असलेला नेता पक्षाची साथ सोडणार?
2
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
3
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
4
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
5
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
6
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
7
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
8
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
9
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
10
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
11
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
12
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
13
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
14
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
15
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
16
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
17
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
18
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
19
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
20
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!

वणव्यात शेकडो झाडांची होळी

By admin | Updated: February 9, 2015 00:48 IST

कुसूर परिसरातील डोंगर बोडका : पालापाचोळा जाळताना लागतेय वनक्षेत्राला आग, शेतकऱ्यांचा निष्काळजीपणा पशुपक्ष्यांच्या मुळावर

गणेश काटेकर - कुसूर -कऱ्हाड तालुक्यातील कोळे वनविभागाच्या हद्दीत डोंगराला वणवा लावण्याचा प्रकार सुरू आहे. अज्ञानी लोकांकडून हे कृत्य केले जात असून, वणव्यात वनविभागाकडून लावल्या गेलेल्या वृक्षांची होळी होत आहे. झाडे जळण्याबरोबरच छोट्या-मोठ्या वन्यप्राण्यांच्या वावरावरही त्याचा परिणाम होत आहे. जनतेमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याने या घटना घडत आहेत. या घटनांना चाप लावण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.कोळे हे वनविभागाचे सर्वात मोठे नियत क्षेत्र आहे. हे संपूर्ण क्षेत्र डोंगरी भागात असल्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. घनदाट झाडे-झुुडपे असल्यामुळे वन्यप्राण्यांसाठी येथे पोषक वातावरण आहे. तर वनविभागाच्या वनक्षेत्राला लागून अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. काही जमिनी आजही कसल्या जात आहेत. तर पडीक जमिनींमध्ये पाळीव जनावरांच्या चाऱ्यासाठी गवत घेतले जाते. जानेवारीअखेर डोंगरी भागातील गवत काढणी पूर्ण होऊन शिवार मोकळा केला जातो. शेतामध्ये पडलेला पालापाचोळा तसेच बांधावरील गवताचे बुडके जाळले जातात. मात्र, शेतकऱ्यांकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे ही आग वनक्षेत्रात लागली जाते. यामध्ये शेकडो एकर क्षेत्र जळून खाक होते. तर काही बुरसटलेल्या विचाराच्या लोकांकडून जाणीवपूर्वक डोंगर पेटवून दिले जात आहेत. वणव्यांमुळे अनेक वन्य प्राण्यांचे जीव जात आहेत. तर लागवड केलेले वृक्ष जळून खाक होत आहेत. वणव्यात लाखोंचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. वनकर्मचाऱ्यांचे प्रयत्न; स्थानिकांचे दुर्लक्षप्रत्येक वर्षी डोंगरांना लागलेले वणवे विझविण्यासाठी रात्रीच्या वेळीही वन कर्मचारी जीवाची पराकाष्टा करताना दिसत आहेत. आग लागल्याची माहिती समजताच वनकर्मचारी त्याठिकाणी धाव घेतात. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे काहीवेळा आग आटोक्यात आणण्यास उशीर होतो. तोपर्यंत बहुतांश डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला असतो. डोंगराला लागलेला वणवा विझविण्यासाठी स्थानिकांकडून म्हणावे तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत.तारुख परिसरात झाडे जळालीगतवर्षी कोळे क्षेत्रात दहा हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले आहे. तारुख, बामणवाडी, पवारवाडी, वानरवाडी, शिंदेवाडी, तुळसण नियत क्षेत्रालगत गत सात वर्षांपूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यापैकी साठ टक्के झाडे जगविण्यात वनविभागास यश आले आहे. तर वणव्यामुळे तीस टक्के रोपे जळून खाक झाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीरकोळे नियत क्षेत्रातील हजारो पाळीव जनावरे वनक्षेत्रातील चाऱ्यावर अवलंबून असतात. वनक्षेत्रातील मुबलक चाऱ्यामुळे मे अखेरपर्यंत सुकलेला चारा या जनावरांना उपलब्ध असतो. मात्र, वणवा लावण्याच्या प्रकारामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. औषधी वनस्पती नष्ट झाडाझुडपाने घनदाट गर्द असलेला वनक्षेत्रातील काही भाग वणवा लावण्याच्या प्रकारामुळे ओसाड होत आहे. अनेक औषधी वनस्पतीही नष्ट झाल्या असून, याठिकाणी वृक्षांची पुनर्लागवड करण्यात आली नसल्याने भविष्यात येथे ओसाड माळरान होण्याची चिन्हे दिसत आहेत.