शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

‘जरंडेश्वर’च्या मालमत्तेवर टाच; ऊस गाळपाचे काय होणार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाठार स्टेशन : महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कथित हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जरंडेश्वर कारखान्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाठार स्टेशन : महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कथित हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जरंडेश्वर कारखान्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मात्र, यंदाच्या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे नोंद अंदाजे १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा तिढा कोण सोडवणार, हा प्रश्न निर्माण होणार आहे. तर कारखान्याची मालमत्ता जप्त झाल्यास काय? यामुळे कामगार व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.

कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी १८ वर्षांच्या संघर्षातून माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केली. राज्य बँकेतून कारखाना उभारणीसाठी कर्ज घेतलेले होते. इतर बँकांचेही आर्थिक सहकार्य मिळाले. १९९९ ला कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम यशस्वी झाल्यानंतर डॉ. शालिनीताई पाटील यांचे बंधू अ‍ॅड. वसंतराव फाळके व उपाध्यक्ष संभाजीराव बर्गे यांच्या कार्यकाळात २००० ते २००४ असे चार गळीत हंगाम शेतकऱ्यांनी पाहिले.

२००४ नंतर दुष्काळ व इतर अडचणींमुळे गळीत हंगाम पार पाडणे जिकिरीचे होत गेले. त्यामुळे कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढू लागला. त्यावर मात करण्यासाठी संस्थापिका डॉ. शालिनीताई पाटील यांनी केएम शुगर, वारणा समूह व स्नेहा शुगर यांच्याकडे कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला. शिखर बँकेच्या कर्जाचे चार वार्षिक हप्ते फेडल्यानंतर पाचवा भरण्यास विलंब झाला. ३ कोटींचा हप्ता थकला म्हणून राज्य बँकेने कारखान्याला जप्तीची नोटीस पाठवून लिलाव मांडला. गुरू कमोडिटीजने ६५ कोटी ७५ लाखांत कारखाना लिलावात घेतला. तर १२ कोटी भागभांडवल असलेल्या २७ हजार सभासदांचे स्वप्न भंग पावले.

शिखर बँकेच्या धनलक्ष्मी ठेव योजनेमध्ये कारखान्याची ८ कोटी ३४ लाख इतकी रक्कम होती. त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर राज्य बँकेने कारवाई केल्याने डॉ. शालिनीताई पाटील यांनी शिखर बँकेविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, अनेक घडामोडी होऊन २२ ऑगस्ट २०१९ रोजी खटल्याचा निकाल लागला. त्यानंतर डॉ. शालिनीताई पाटील यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन एफआयआर दाखल केला.

आता कारखाना ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू झाली आहे. कारखान्याची मालमत्ता सध्या गुरू कमोडिटीजच्या नावावर आहे. ती जरंडेश्वर शुगर मिल, मेसर्स स्पार्कलिंग साइल प्रा. लि. यांना लीजवर देण्यात आली होती. आता ईडीच्या तपासातून अनपेक्षितपणे कोणती माहिती बाहेर पडणार, याकडे कोरेगाव तालुक्याबरोबरच जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जरंडेश्वर कारखान्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मात्र, यंदाच्या गाळप हंगामात कारखान्याकडे नोंद असलेल्या उसाच्या गाळपाचा तिढा कसा सुटणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

चौकट :

मागील वर्षी १४ लाख मेट्रिक टन गाळप

गतवर्षी जिल्ह्यातील १५ कारखान्यांनी ९९ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले. यामध्ये सर्वाधिक १४ लाख मेट्रिक टन गाळप एकट्या जरंडेश्वर शुगर मिल्सने केले होते. दैनंदिन २५०० मेट्रिक टन क्षमता असलेला हा कारखाना अल्पावधीत १० हजार मेट्रिक टन गाळप करू लागला. गेल्या चार ते पाच हंगामात समाधानकारक दर दिल्याने कारखान्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. आता ईडीच्या कारवाईत जे होईल ते होईल; पण कारखाना बंद राहिला तर अंदाजे १४ लाख मेट्रिक टन ऊस कोठे जाणार, हा प्रश्न आहे.

.......................................................................