शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

सुदृढ मुले हीच आपली संपत्ती : भीमराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:39 IST

रहिमतपूर : ‘सुदृढ मुले हीच आपली संपत्ती असून, मुलांचे सर्वांगीण पोषण करण्याची नैतिक जबाबदारी पालकांची आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा ...

रहिमतपूर : ‘सुदृढ मुले हीच आपली संपत्ती असून, मुलांचे सर्वांगीण पोषण करण्याची नैतिक जबाबदारी पालकांची आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे ग्रामपंचायत व एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्यातर्फे पोषण आहार पंधरवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, ‘लहान मुलांना पौष्टिक आहार देऊन सुदृढ बनविणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या पालनपोषणाकडे दुर्लक्ष न करता परिपूर्ण आहार देऊन त्यांचे पोषण करण्याकडे लक्ष द्यावे. जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या वतीने पोषण आहारासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,’ असे आश्वासन दिले. बीट पर्यवेक्षिका प्रज्ञा बेंद्रे व सरपंच सुनील कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पौष्टिक आहार व औषधांचे वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शंकरराव गायकवाड, सदस्या उषा गायकवाड, अनिता पिसे, मनीषा गुजले, सुनंदा गायकवाड, मालन पवार, स्नेहल शिंदे, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते. शोभा शिवदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

१७रहिमतपूर

फोटो : वाठार किरोली, ता. कोरेगाव येथे भीमराव पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पौष्टिक आहार व औषधांचे वाटप करण्यात आले.

(छाया : जयदीप जाधव)