शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मलेरिया, डेंग्यू, गोचडी तापानंतरही आरोग्य विभाग सुस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:42 IST

फलटण : फलटण तालुक्यातील अनेक गावांत मागील काही दिवसांपासून मलेरिया, डेंग्यू, गोचडी ताप या आजाराची रुग्ण संख्या वाढू लागली ...

फलटण : फलटण तालुक्यातील अनेक गावांत मागील काही दिवसांपासून मलेरिया, डेंग्यू, गोचडी ताप या आजाराची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडूनही प्रशासन व आरोग्य विभागाकडून कोणतीही दक्षता घेतली गेली नाही. यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

फलटण तालुक्यातील काही गावांत गेल्या महिन्यापासून डेंग्यू व इतर तत्सम आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. उलट्या, जुलाब, तापासह मलेरिया रुग्णांचीही संख्या वाढत चालली आहे. अनेक रुग्ण ताप, सर्दी, खोकला या आजारांनी ग्रासले आहे. गावातील आजारी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक रुग्ण सरकारी व फलटण येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. अद्यापही या आजाराविषयी शासकीय यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र संबंधित आजारांविषयी फ्लेक्स, पत्रके, दवंडी, सूचना, जनजागृती, औषधे फवारणीसारखी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.

डेंग्यू या आजारांची साधारण लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, अंगावर पुरळ येणे, नाक तोंड आदीद्वारे रक्तस्राव, उलट्या, मळमळ अशा प्रकारची दिसून येतात व ही लक्षणे आढळल्यास लोकांनी ताबडतोब सरकारी व खासगी दवाखान्यात जाऊन तपासणी करून औषधोपचार करून घेणे गरजेचे आहे. तसेच लोकांनी घरांमध्ये व परिसरात घरगुती वापरासाठी साठवलेले पाणी रांजण, हौद, डबे, उघड्या टाक्या तसेच आदी वस्तूंमध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये या डासांच्या विषाणूचा प्रसार होत असतो. त्यामुळे लोकांनीही वेळीच खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळला पाहिजे. नगरपालिका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील, उपकेंद्रातील आरोग्य सेवक, इतर आरोग्य अधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने गावागावांत जाऊन लोकांना या रोगांविषयी व रोगप्रतिबंधक उपाययोजनाविषयी जनजागृतीद्वारे माहिती दिली गेली पाहिजे, अन्यथा आजारात वाढ होऊ शकते, हे माहिती असूनही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून मात्र असे काही होताना दिसत नाही. शासकीय यंत्रणा सुस्त पडली आहे, कोरोनामधून तालुका सावरत असताना आता इतर रोगांनी जनता त्रस्त होऊ लागली आहे.

(कोट)

पावसाळ्यात अनेक आजार पसरत असतात आरोग्य यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. मात्र गाव पातळीवर पण प्रशासन आणि ग्रामपंचायतीने जनजागृती केली पाहिजे. औषधांची फवारणी केली पाहिजे, आमची यंत्रणा सर्वत्र कार्यन्वित आहे. दररोज आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला जात आहे. पुरेसा औषध साठा आहे. रुग्णांनी आजारी पडल्यास आरोग्य सेवक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत.

-डॉ. विक्रांत पोटे, तालुका आरोग्य अधिकारी, फलटण