शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मलेरिया, डेंग्यू, गोचडी तापानंतरही आरोग्य विभाग सुस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:42 IST

फलटण : फलटण तालुक्यातील अनेक गावांत मागील काही दिवसांपासून मलेरिया, डेंग्यू, गोचडी ताप या आजाराची रुग्ण संख्या वाढू लागली ...

फलटण : फलटण तालुक्यातील अनेक गावांत मागील काही दिवसांपासून मलेरिया, डेंग्यू, गोचडी ताप या आजाराची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडूनही प्रशासन व आरोग्य विभागाकडून कोणतीही दक्षता घेतली गेली नाही. यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

फलटण तालुक्यातील काही गावांत गेल्या महिन्यापासून डेंग्यू व इतर तत्सम आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. उलट्या, जुलाब, तापासह मलेरिया रुग्णांचीही संख्या वाढत चालली आहे. अनेक रुग्ण ताप, सर्दी, खोकला या आजारांनी ग्रासले आहे. गावातील आजारी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक रुग्ण सरकारी व फलटण येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. अद्यापही या आजाराविषयी शासकीय यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र संबंधित आजारांविषयी फ्लेक्स, पत्रके, दवंडी, सूचना, जनजागृती, औषधे फवारणीसारखी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.

डेंग्यू या आजारांची साधारण लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, अंगावर पुरळ येणे, नाक तोंड आदीद्वारे रक्तस्राव, उलट्या, मळमळ अशा प्रकारची दिसून येतात व ही लक्षणे आढळल्यास लोकांनी ताबडतोब सरकारी व खासगी दवाखान्यात जाऊन तपासणी करून औषधोपचार करून घेणे गरजेचे आहे. तसेच लोकांनी घरांमध्ये व परिसरात घरगुती वापरासाठी साठवलेले पाणी रांजण, हौद, डबे, उघड्या टाक्या तसेच आदी वस्तूंमध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये या डासांच्या विषाणूचा प्रसार होत असतो. त्यामुळे लोकांनीही वेळीच खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळला पाहिजे. नगरपालिका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील, उपकेंद्रातील आरोग्य सेवक, इतर आरोग्य अधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने गावागावांत जाऊन लोकांना या रोगांविषयी व रोगप्रतिबंधक उपाययोजनाविषयी जनजागृतीद्वारे माहिती दिली गेली पाहिजे, अन्यथा आजारात वाढ होऊ शकते, हे माहिती असूनही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून मात्र असे काही होताना दिसत नाही. शासकीय यंत्रणा सुस्त पडली आहे, कोरोनामधून तालुका सावरत असताना आता इतर रोगांनी जनता त्रस्त होऊ लागली आहे.

(कोट)

पावसाळ्यात अनेक आजार पसरत असतात आरोग्य यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. मात्र गाव पातळीवर पण प्रशासन आणि ग्रामपंचायतीने जनजागृती केली पाहिजे. औषधांची फवारणी केली पाहिजे, आमची यंत्रणा सर्वत्र कार्यन्वित आहे. दररोज आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला जात आहे. पुरेसा औषध साठा आहे. रुग्णांनी आजारी पडल्यास आरोग्य सेवक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत.

-डॉ. विक्रांत पोटे, तालुका आरोग्य अधिकारी, फलटण