शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मलेरिया, डेंग्यू, गोचडी तापानंतरही आरोग्य विभाग सुस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:42 IST

फलटण : फलटण तालुक्यातील अनेक गावांत मागील काही दिवसांपासून मलेरिया, डेंग्यू, गोचडी ताप या आजाराची रुग्ण संख्या वाढू लागली ...

फलटण : फलटण तालुक्यातील अनेक गावांत मागील काही दिवसांपासून मलेरिया, डेंग्यू, गोचडी ताप या आजाराची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडूनही प्रशासन व आरोग्य विभागाकडून कोणतीही दक्षता घेतली गेली नाही. यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

फलटण तालुक्यातील काही गावांत गेल्या महिन्यापासून डेंग्यू व इतर तत्सम आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. उलट्या, जुलाब, तापासह मलेरिया रुग्णांचीही संख्या वाढत चालली आहे. अनेक रुग्ण ताप, सर्दी, खोकला या आजारांनी ग्रासले आहे. गावातील आजारी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक रुग्ण सरकारी व फलटण येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. अद्यापही या आजाराविषयी शासकीय यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र संबंधित आजारांविषयी फ्लेक्स, पत्रके, दवंडी, सूचना, जनजागृती, औषधे फवारणीसारखी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.

डेंग्यू या आजारांची साधारण लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, अंगावर पुरळ येणे, नाक तोंड आदीद्वारे रक्तस्राव, उलट्या, मळमळ अशा प्रकारची दिसून येतात व ही लक्षणे आढळल्यास लोकांनी ताबडतोब सरकारी व खासगी दवाखान्यात जाऊन तपासणी करून औषधोपचार करून घेणे गरजेचे आहे. तसेच लोकांनी घरांमध्ये व परिसरात घरगुती वापरासाठी साठवलेले पाणी रांजण, हौद, डबे, उघड्या टाक्या तसेच आदी वस्तूंमध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये या डासांच्या विषाणूचा प्रसार होत असतो. त्यामुळे लोकांनीही वेळीच खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळला पाहिजे. नगरपालिका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील, उपकेंद्रातील आरोग्य सेवक, इतर आरोग्य अधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने गावागावांत जाऊन लोकांना या रोगांविषयी व रोगप्रतिबंधक उपाययोजनाविषयी जनजागृतीद्वारे माहिती दिली गेली पाहिजे, अन्यथा आजारात वाढ होऊ शकते, हे माहिती असूनही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून मात्र असे काही होताना दिसत नाही. शासकीय यंत्रणा सुस्त पडली आहे, कोरोनामधून तालुका सावरत असताना आता इतर रोगांनी जनता त्रस्त होऊ लागली आहे.

(कोट)

पावसाळ्यात अनेक आजार पसरत असतात आरोग्य यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. मात्र गाव पातळीवर पण प्रशासन आणि ग्रामपंचायतीने जनजागृती केली पाहिजे. औषधांची फवारणी केली पाहिजे, आमची यंत्रणा सर्वत्र कार्यन्वित आहे. दररोज आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला जात आहे. पुरेसा औषध साठा आहे. रुग्णांनी आजारी पडल्यास आरोग्य सेवक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत.

-डॉ. विक्रांत पोटे, तालुका आरोग्य अधिकारी, फलटण