शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान न मिळाल्यास निम्मे कारखाने बंद

By admin | Updated: March 14, 2015 00:01 IST

कारखानदारांची स्पष्टोक्ती : साखर आयुक्तांच्या बैठकीत गेली अनुदानाची मागणी

वाठार स्टेशन : राज्य व केंद्र शासनाने चालू गाळप हंगामात ‘एफआरपी’चा मुद्दा उपस्थित करीत ‘एफआरपी’ न देणाऱ्या कारखान्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा देत कारखान्यांना कोणतेही शासकीय अनुदान न देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे राज्यातील सर्वच कारखानदारांनी या हंगामात अनुदान न दिल्यास पुढील गाळप हंगामात राज्यातील ५० टक्के कारखाने बंद राहतील,’ अशी स्पष्टोक्ती साखर आयुक्तालयात झालेल्या बैठकीत दिल्याने पुढील हंगामात कारखाने सुरू करण्याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.चालू गाळप हंगामात केंद्र शासनाने साडेनऊ साखर उताऱ्यासाठी २ हजार २०० रुपये ‘एफआरपी’ जाहीर केली. यावेळी साखरचे दर ३ हजार ३०० रुपये होते. आज साखरेचे दर २ हजार ३०० रुपयांवर आले असताना ‘एफआरपी’नुसार दर कसा द्यायचा? हाच मुख्य प्रश्न कारखानदारांपुढे आहे. यासाठी शासनाने कारखान्यांना अनुदान दिले तरच कारखानदारी वाचू शकेल, अन्यथा कारखानदार मोठ्या आर्थिक अडचणीत येणार आहेत. जिल्ह्यात किसन वीर, प्रतापगड व अजिंक्यतारा या कारखान्यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे ‘एफआरपी’नुसार दर देण्याचा निर्णय घेतला; परंतु इतर कारखान्यांनी एफआरपी पोटी १ हजार ८०० ते १ हजार ९०० रुपये उचल देत ‘एफआरपी’पासून स्वत:चा बचाव करण्याचेच काम केले. कारवाईचा केवळ धाक दाखवत मौन बाळगले.चालू हंगामात केंद्र शासनाने जाहीर केलेली एफआरपी चुकीच्या साखर मूल्यांकनावर जाहीर केल्याने आजच्या परिस्थितीत ‘एफआरपी’ प्रमाणे दर दिल्यास कारखाने अडचणीत येतील. यासाठी या शासनाने अनुदान द्यावे, अशी कारखानदारांची मागणी आहे. (वार्ताहर)सातारा जिल्ह्यात ज्या कारखानदारांनी एफआरपीनुसार दर दिले आहेत, त्या कारखानदारांनाच आता सर्वाधिक ऊस गाळपाचे आव्हान आहे. परिणामी सध्या जेवढे गाळप वाढणार, त्या उसाला एफआरपीप्रमाणे दर द्यावा लागणार आहे. यामुळे जास्त गाळप करणाऱ्या कारखान्यांवर आर्थिक बोजा पडणार आहे.- विजय वाबळे,कार्यकारी संचालक- किसन वीर कारखाना, भुर्इंज