शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

शासन आदेशानुसार गुरुजींची हजेरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील शाळा बंद होत्या. तरीही शासन आदेशानुसार कोविड ड्युटीसह शैक्षणिक कामात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील शाळा बंद होत्या. तरीही शासन आदेशानुसार कोविड ड्युटीसह शैक्षणिक कामात हजेरी लावून शिक्षकांनी आपले काम पूर्ण केल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

मार्च २०२० पासून जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने शिक्षण विभागाने नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर महिन्यात शाळा सुरू झाल्या, पण त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच कोविडचे आकडे वाढू लागल्याने शाळा बंद करण्यात आल्या. शिक्षकांना शैक्षणिकबरोबरच प्रशासकीय कामाचा भागही सोपविण्यात आला. शासनाच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढून शिक्षकांची टीम कोविडच्या कामासाठीही धाडली होती.

नोव्हेंबर ते डिसेंबरच्या कालावधीत कोरोनाचा प्रकोप जरा कमी झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पालकांचे संमतिपत्र घेणे बंधनकारक केले. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश पालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळेत पाठविण्यास नकार दिला. परिणामी शिक्षकांचीही हजेरी कमी झाली.

चौकट :

प्राथमिक शाळा सुरूच नाहीत

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा गेल्या शैक्षणिक सत्रात सुरूच झाल्या नाहीत. पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र, कोरोनामुळे हे वर्ग सुरू होऊ शकले नाहीत.

ग्रामीण भागात वाढल्या तक्रारी!

शाळा बंद असल्यामुळे शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू ठेवले. पण ग्रामीण भागात आॅनलाइन शिक्षणाची गोची झाली आहे. विद्यार्थ्यांकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाईल नसणे, नेटवर्कच्या समस्या, रिचार्जचा खर्च, कुणाला आॅनलाईन समजलेच नाही, अशा अनेक अडचणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. सुमारे ३० टक़्के विद्यार्थ्यांकडे आॅनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही.

कोट :

तेव्हा सर्व यंत्रणा कामाला लागली होती

शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्देश आल्यानंतर शिक्षण विभागाबरोबरच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. फार काळ शाळा सुरू राहू शकल्या नाहीत. यंदाही शासनाकडून शाळा सुरू करण्याचे निर्देश आले नाहीत. पण शिक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्देश आले आहेत. त्यानुसार पहिली ते नववीपर्यंत व इयत्ता अकरावीचे ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती राहील. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आवश्यक असल्याचे आदेश आहेत.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, सातारा

काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर आम्ही शाळा सुरू करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. शाळेची स्वच्छता, सॅनिटायझेशन, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांचे थर्मल स्कॅनिंग, सोशल डिस्टन्सिंगनुसार बसण्याची व्यवस्था केली. पण कोरोनामुळे अल्पावधीतच शाळा बंद कराव्या लागल्या.

- मनोहर साळुंखे, सातारा

मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. विद्यालय सुरू झाल्यामुळे आम्हाला झाला होता. शाळेत १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती होती. तेव्हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जोखीमही होती. पालकांकडून तसे संमतिपत्र भरून घेतले होते. शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांमध्येही आनंद होता. पण तो प्रयत्न अल्पावधीतच अपयशी ठरला.

- वसंत देशमुख, सातारा