शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

शासन आदेशानुसार गुरुजींची हजेरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील शाळा बंद होत्या. तरीही शासन आदेशानुसार कोविड ड्युटीसह शैक्षणिक कामात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील शाळा बंद होत्या. तरीही शासन आदेशानुसार कोविड ड्युटीसह शैक्षणिक कामात हजेरी लावून शिक्षकांनी आपले काम पूर्ण केल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

मार्च २०२० पासून जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने शिक्षण विभागाने नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर महिन्यात शाळा सुरू झाल्या, पण त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच कोविडचे आकडे वाढू लागल्याने शाळा बंद करण्यात आल्या. शिक्षकांना शैक्षणिकबरोबरच प्रशासकीय कामाचा भागही सोपविण्यात आला. शासनाच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढून शिक्षकांची टीम कोविडच्या कामासाठीही धाडली होती.

नोव्हेंबर ते डिसेंबरच्या कालावधीत कोरोनाचा प्रकोप जरा कमी झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पालकांचे संमतिपत्र घेणे बंधनकारक केले. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश पालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळेत पाठविण्यास नकार दिला. परिणामी शिक्षकांचीही हजेरी कमी झाली.

चौकट :

प्राथमिक शाळा सुरूच नाहीत

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा गेल्या शैक्षणिक सत्रात सुरूच झाल्या नाहीत. पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र, कोरोनामुळे हे वर्ग सुरू होऊ शकले नाहीत.

ग्रामीण भागात वाढल्या तक्रारी!

शाळा बंद असल्यामुळे शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू ठेवले. पण ग्रामीण भागात आॅनलाइन शिक्षणाची गोची झाली आहे. विद्यार्थ्यांकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाईल नसणे, नेटवर्कच्या समस्या, रिचार्जचा खर्च, कुणाला आॅनलाईन समजलेच नाही, अशा अनेक अडचणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. सुमारे ३० टक़्के विद्यार्थ्यांकडे आॅनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही.

कोट :

तेव्हा सर्व यंत्रणा कामाला लागली होती

शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्देश आल्यानंतर शिक्षण विभागाबरोबरच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. फार काळ शाळा सुरू राहू शकल्या नाहीत. यंदाही शासनाकडून शाळा सुरू करण्याचे निर्देश आले नाहीत. पण शिक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्देश आले आहेत. त्यानुसार पहिली ते नववीपर्यंत व इयत्ता अकरावीचे ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती राहील. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आवश्यक असल्याचे आदेश आहेत.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, सातारा

काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर आम्ही शाळा सुरू करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. शाळेची स्वच्छता, सॅनिटायझेशन, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांचे थर्मल स्कॅनिंग, सोशल डिस्टन्सिंगनुसार बसण्याची व्यवस्था केली. पण कोरोनामुळे अल्पावधीतच शाळा बंद कराव्या लागल्या.

- मनोहर साळुंखे, सातारा

मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. विद्यालय सुरू झाल्यामुळे आम्हाला झाला होता. शाळेत १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती होती. तेव्हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जोखीमही होती. पालकांकडून तसे संमतिपत्र भरून घेतले होते. शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांमध्येही आनंद होता. पण तो प्रयत्न अल्पावधीतच अपयशी ठरला.

- वसंत देशमुख, सातारा