शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

कऱ्हाड अर्बनला ६७.७३ कोटींचा ढोबळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

कऱ्हाड : मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा विचार करता, बँकेचा एकूण ठेव व्यवहार २,७८० कोटी तर कर्ज व्यवहार ...

कऱ्हाड : मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा विचार करता, बँकेचा एकूण ठेव व्यवहार २,७८० कोटी तर कर्ज व्यवहार १,६७२ कोटी झाला आहे. एकूण व्यवसाय ४,४५२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बँकेला ६७.७३ कोटींचा ढोबळ तर आयकर व तरतुदी वजा जाता २१.८९ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. कोरोनासारख्या अनिश्चिततेच्या वातावरणात सुरू झालेला या आर्थिक वर्षाचा प्रवास अंतिम चरणात उत्तम यश देऊन गेला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, सन २०२०- २१ या आर्थिक वर्षाची सुरूवातच कोरोना विषाणू महामारीच्या साथीमध्ये आणि लॉकडाऊनमध्ये झाली. त्यातच रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना दिलासा देताना एकंदर सहा महिन्यांचा विश्रांती कालावधी देऊ केला आणि त्यामुळे कर्जाची मुदत सहा महिन्यांनी वाढली. तसेच बँकेने आवाहन करूनही कोणत्याही कर्जदाराने कर्ज पुनर्रचना योजनेचा फायदा न घेता, नियमितपणे कर्ज परतफेड केली, हे विशेष आहे.

बॅंकेने वसुलीच्या आघाडीवरही उत्तम कामगिरी करत जुन्या एन. पी. ए. खात्यांतून जवळपास ५० कोटींपेक्षा अधिकची रक्कम वसूल करण्यात यश मिळवले आहे. गतवर्षी निव्वळ एन. पी. ए.चे प्रमाण ७.६५ टक्के होते. त्यामध्ये २.७७ टक्क्यांनी घट नोंदवत हे प्रमाण ४.८८ टक्के इतके राहिले आहे. त्याचप्रमाणे एन. पी. ए. रक्कमेतही १६ कोटींची घट झाली आहे. खंडोबा प्रसन्न साखर कारखाना लि. यांच्याविरूद्ध बँकेने नादारी व दिवाळखोरी संहितेंतर्गत दाखल केलेला वसुलीचा दावा सुप्रीम कोर्टात यशस्वी झाला आहे. त्यामध्ये १७ कोटींहून अधिक रकमेची प्रत्यक्ष वसुली झाली आहे. अशाप्रकारे यशस्वी कारवाई करणारी ही पहिली सहकारी बँक आहे, अशी माहिती अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी दिली.

बँकेच्या स्वभांडवलाचा पाया दिवसेंदिवस मजबूत होत आहे. चालू वर्षात भांडवल पर्याप्तता प्रमाण १६.२४ टक्के राखून आपली सक्षमता आणि आर्थिक सुदृढता सिद्ध आर्थिक प्रमाणकांवर सिद्ध केली आहे. संस्थात्मक ठेवी कमी राखण्याचे धोरण राबवूनही गतवर्षीपेक्षा २६ कोटींनी ठेव व्यवहारांत वाढ झाली आहे. चालू वर्षात बँकेने ‘कोव्हिड अनसिक्युअर्ड कर्ज योजना’ राबविल्याचे उपाध्यक्ष समीर जोशी यांनी म्हटले आहे.

बँकेच्या कर्जव्यवहारांचा आढावा घेतला असून, त्याच्या पूर्ततेसाठी एक पथदर्शी धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या वेळेत या सर्व निकषांची पूर्तता बँक नियोजबद्धपणे करेल, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांनी दिली.