शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड अर्बनला ६७.७३ कोटींचा ढोबळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

कऱ्हाड : मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा विचार करता, बँकेचा एकूण ठेव व्यवहार २,७८० कोटी तर कर्ज व्यवहार ...

कऱ्हाड : मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा विचार करता, बँकेचा एकूण ठेव व्यवहार २,७८० कोटी तर कर्ज व्यवहार १,६७२ कोटी झाला आहे. एकूण व्यवसाय ४,४५२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बँकेला ६७.७३ कोटींचा ढोबळ तर आयकर व तरतुदी वजा जाता २१.८९ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. कोरोनासारख्या अनिश्चिततेच्या वातावरणात सुरू झालेला या आर्थिक वर्षाचा प्रवास अंतिम चरणात उत्तम यश देऊन गेला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, सन २०२०- २१ या आर्थिक वर्षाची सुरूवातच कोरोना विषाणू महामारीच्या साथीमध्ये आणि लॉकडाऊनमध्ये झाली. त्यातच रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना दिलासा देताना एकंदर सहा महिन्यांचा विश्रांती कालावधी देऊ केला आणि त्यामुळे कर्जाची मुदत सहा महिन्यांनी वाढली. तसेच बँकेने आवाहन करूनही कोणत्याही कर्जदाराने कर्ज पुनर्रचना योजनेचा फायदा न घेता, नियमितपणे कर्ज परतफेड केली, हे विशेष आहे.

बॅंकेने वसुलीच्या आघाडीवरही उत्तम कामगिरी करत जुन्या एन. पी. ए. खात्यांतून जवळपास ५० कोटींपेक्षा अधिकची रक्कम वसूल करण्यात यश मिळवले आहे. गतवर्षी निव्वळ एन. पी. ए.चे प्रमाण ७.६५ टक्के होते. त्यामध्ये २.७७ टक्क्यांनी घट नोंदवत हे प्रमाण ४.८८ टक्के इतके राहिले आहे. त्याचप्रमाणे एन. पी. ए. रक्कमेतही १६ कोटींची घट झाली आहे. खंडोबा प्रसन्न साखर कारखाना लि. यांच्याविरूद्ध बँकेने नादारी व दिवाळखोरी संहितेंतर्गत दाखल केलेला वसुलीचा दावा सुप्रीम कोर्टात यशस्वी झाला आहे. त्यामध्ये १७ कोटींहून अधिक रकमेची प्रत्यक्ष वसुली झाली आहे. अशाप्रकारे यशस्वी कारवाई करणारी ही पहिली सहकारी बँक आहे, अशी माहिती अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी दिली.

बँकेच्या स्वभांडवलाचा पाया दिवसेंदिवस मजबूत होत आहे. चालू वर्षात भांडवल पर्याप्तता प्रमाण १६.२४ टक्के राखून आपली सक्षमता आणि आर्थिक सुदृढता सिद्ध आर्थिक प्रमाणकांवर सिद्ध केली आहे. संस्थात्मक ठेवी कमी राखण्याचे धोरण राबवूनही गतवर्षीपेक्षा २६ कोटींनी ठेव व्यवहारांत वाढ झाली आहे. चालू वर्षात बँकेने ‘कोव्हिड अनसिक्युअर्ड कर्ज योजना’ राबविल्याचे उपाध्यक्ष समीर जोशी यांनी म्हटले आहे.

बँकेच्या कर्जव्यवहारांचा आढावा घेतला असून, त्याच्या पूर्ततेसाठी एक पथदर्शी धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या वेळेत या सर्व निकषांची पूर्तता बँक नियोजबद्धपणे करेल, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांनी दिली.