शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

सीतामाई घाट रस्त्याला हिरवा कंदील

By admin | Updated: August 9, 2015 21:07 IST

रणजितसिंह नाईक-निंबाळकर : तीन तालुक्यांतील दळणवळणात येणार गतिमानता

फलटण : ‘प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा मार्ग म्हणून मंजुरी मिळालेल्या फलटण ते सीतामाई डोंगर घाटरस्त्याला अखेर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे फलटण-माण-खटाव तालुक्यांत अधिक दळणवळण वाढून हे तालुके आणखी जवळ येणार आहेत,’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘सीतामाई डोंगराला ऐतिहासिक परंपरा व वारसा आहे. माता सीतामार्इंनी येथे बराचकाळ वास्तव्य केले होते. फलटण तालुक्यातून सीतामाई डोंगर जवळ असूनही रस्ता नसल्याने त्याला माण तालुक्यातून किंवा खटाव तालुक्यातून वळसा घालून जावे लागत असे. यात वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. रोजगार हमी योजनेतून घाट रस्त्याचे काही काम झाले होते. मात्र रस्ता नव्हता. रोजगार हमीतून हा रस्ता वगळून या रस्त्याचा प्लॅन माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी करून घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हिंदुराव निंबाळकर यांनी फलटण, उपळवे, सीतामाई घाटरस्ता याला जिल्हामार्ग म्हणून मंजुरी मिळविली. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे.’जिल्हामार्ग म्हणून मंजुरी देताना राज्य शासनाने अर्थसंकल्पात ७ कोटी ५४ लाखांची तरतूद करताना हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला. फलटण-कुरवली-दालवडी-उपळवे-वेळोशी- कुळकुजाई असा जिल्हामार्ग मंजूर झाला असताना सीतामाई डोंगर व घाटरस्ता वनविभागाच्या ताब्यात असल्याने अडचणी येत होत्या. राज्यशासन पर्यायी जागा देण्यासाठी तयार होते. मात्र, केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागातून परवानगी मिळणे गरजेचे होते. त्यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी दोन वर्षे सातत्याने दिल्ली दरबारी प्रयत्न केल्यानंतर केंद्राने हिरवा कंदील दाखविला आहे.हा रस्ता होणार असल्याने फलटण-माण-खटाव हे तालुके आणखी जवळ येणार आहेत. दळणवळण वाढण्याबरोबरच बाजारपेठाही जवळ येणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत या रस्त्याच्या कामाचे टेंडर निघून कामाला सुरुवात होणार आहे, असेही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकात स्पष्ट केले. (प्रतिनिधी) जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दुष्काळी पट्ट्यातून जाणाऱ्या या रस्त्याचे काम करण्याचा आम्ही शब्द दिला होता. तो शब्द आम्ही पाळला आहे. फलटण ते वेळोशी चकाचक व अधिक रुंद असा रस्ता होणार आहे. वाहतुकीसाठी चांगल्या रस्त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.- रणजितसिंह नाईक-निंबाळकर