शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

सीतामाई घाट रस्त्याला हिरवा कंदील

By admin | Updated: August 9, 2015 21:07 IST

रणजितसिंह नाईक-निंबाळकर : तीन तालुक्यांतील दळणवळणात येणार गतिमानता

फलटण : ‘प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा मार्ग म्हणून मंजुरी मिळालेल्या फलटण ते सीतामाई डोंगर घाटरस्त्याला अखेर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे फलटण-माण-खटाव तालुक्यांत अधिक दळणवळण वाढून हे तालुके आणखी जवळ येणार आहेत,’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘सीतामाई डोंगराला ऐतिहासिक परंपरा व वारसा आहे. माता सीतामार्इंनी येथे बराचकाळ वास्तव्य केले होते. फलटण तालुक्यातून सीतामाई डोंगर जवळ असूनही रस्ता नसल्याने त्याला माण तालुक्यातून किंवा खटाव तालुक्यातून वळसा घालून जावे लागत असे. यात वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. रोजगार हमी योजनेतून घाट रस्त्याचे काही काम झाले होते. मात्र रस्ता नव्हता. रोजगार हमीतून हा रस्ता वगळून या रस्त्याचा प्लॅन माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी करून घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हिंदुराव निंबाळकर यांनी फलटण, उपळवे, सीतामाई घाटरस्ता याला जिल्हामार्ग म्हणून मंजुरी मिळविली. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे.’जिल्हामार्ग म्हणून मंजुरी देताना राज्य शासनाने अर्थसंकल्पात ७ कोटी ५४ लाखांची तरतूद करताना हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला. फलटण-कुरवली-दालवडी-उपळवे-वेळोशी- कुळकुजाई असा जिल्हामार्ग मंजूर झाला असताना सीतामाई डोंगर व घाटरस्ता वनविभागाच्या ताब्यात असल्याने अडचणी येत होत्या. राज्यशासन पर्यायी जागा देण्यासाठी तयार होते. मात्र, केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागातून परवानगी मिळणे गरजेचे होते. त्यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी दोन वर्षे सातत्याने दिल्ली दरबारी प्रयत्न केल्यानंतर केंद्राने हिरवा कंदील दाखविला आहे.हा रस्ता होणार असल्याने फलटण-माण-खटाव हे तालुके आणखी जवळ येणार आहेत. दळणवळण वाढण्याबरोबरच बाजारपेठाही जवळ येणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत या रस्त्याच्या कामाचे टेंडर निघून कामाला सुरुवात होणार आहे, असेही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकात स्पष्ट केले. (प्रतिनिधी) जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दुष्काळी पट्ट्यातून जाणाऱ्या या रस्त्याचे काम करण्याचा आम्ही शब्द दिला होता. तो शब्द आम्ही पाळला आहे. फलटण ते वेळोशी चकाचक व अधिक रुंद असा रस्ता होणार आहे. वाहतुकीसाठी चांगल्या रस्त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.- रणजितसिंह नाईक-निंबाळकर