शहरं
Join us  
Trending Stories
1
गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
2
माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
3
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
5
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
6
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
7
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...
8
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
9
दहावीतील गुणांवरून नातेवाईकांनी उडवली होती खिल्ली, आता तरुणाने बँकेचा SMS दाखवला; आकडा पाहून 'बोलती बंद'
10
कोल्हापूरकरांच्या विरोधाची धग अंबानीपर्यंत पोहोचली; वनताराचे पथक नांदणीत येणार
11
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
12
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
13
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
14
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
15
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
16
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
17
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
18
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
19
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
20
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

दादा-आबा सावधपणे ऐका सभासदांच्या हाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:39 IST

सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना हा देशातील नावाजलेला कारखाना आहे. ...

सागर गुजर

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना हा देशातील नावाजलेला कारखाना आहे. या कारखान्याला भूगोल आणि इतिहास दोन्ही आहेत. स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल घेऊन ब्रिटिश राजवटीविरोधात त्वेषाने लढलेल्या दिवंगत यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर यांनी या कारखान्याचा पाया रचलाय... हा पाया खचू द्यायचा नसेल अन्‌ किसन वीरांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर हा कारखाना वाचवायलाच हवा. ‘दादा-आबा सावधपणे ऐका सभासदांच्या हाका’, अशी आर्त साद शेतकरी घालताना दिसत आहेत.

दिवंगत यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब शिंदे, आबासाहेब वीर यांनी भुईंजच्या माळावर साखर कारखाना उभारायचे स्वप्न पाहिले. १ ऑक्टोबर १९६८ मध्ये राज्य शासनाचे तर ७ ऑगस्ट १९६९ मध्ये केंद्र शासनाकडून कारखान्याला औद्योगिक परवाना मिळाला. यासाठी विनायकराव पाटील, पी. के. सावंत, राजारामबापू पाटील, माजी खासदार प्रतापराव भोसले यांच्या सकारात्मक विचारांतून हा कारखाना उभा राहिला. या नेत्यांनी शासनामध्ये असलेली राजकीय ताकद वापरली ती शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी! पुढे दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांनी देखील या कारखान्यासाठी मोठे योगदान दिले.

या नेत्यांनी धोम धरण, कण्हेर धरण उभारणीसाठी अविश्रांत प्रयत्न केले. वाई, खंडाळा, कोरेगाव, सातारा, जावळी या तालुक्यांतील शेती ओलिताखाली आणली. अनेक प्रश्न असतानाही त्यांची सोडवणूक सकारात्मक ऊर्जेतून करत या तालुक्यांतील शेती हिरवीगार केली. या तालुक्यांना उसाचा बेल्ट म्हणून ओळख सर्वत्र झाली. तालुक्यांचे नुसते नाव घेतले तरी सधन शेतकरी हे चित्र संपूर्ण देशातील लोकांपुढे आजही उभे राहते. आपल्या नेत्यांच्या प्रयत्नांना साद देत शेतकऱ्यांनी देखील मेहनत घेऊन ऊस शेती सुरू केली अन्‌ आजच्या घडीला या भागातील ऊस हे प्रमुख पीक आहे.

सध्या कारखाना मोठ्या अडचणींचा सामना करून सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळत नाहीत अन्‌ मिळाले तरी इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी मिळतात, अशी व्यथा शेतकरी व्यक्त करतात. मात्र, पैसे बुडत नाहीत... शेत पडीक ठेवण्यापेक्षा ऊस करायचा, तो आपल्या मालकीच्या कारखान्याला घालायचा, हा शिरस्ता शेतकऱ्यांनी सुरू ठेवलेला आहे. कारखानदारीत खासगीकरणाचे वारे वाहत असताना आपला कारखाना सुरू राहावा, या निर्मळ हेतूने शेतकरी ऊस उत्पादन घेतायत. आपल्याला परवडेल इतका दर मिळावा अन्‌ कारखाना वाचावा, एवढीच इच्छा शेतकऱ्यांची आहे. नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मुक्या हाका ऐकाव्यात, हीच त्यांची भावना आहे.

चौकट..

सभासद शेतकऱ्यांचा विचार करा

वाई, जावळी, सातारा, खंडाळा, कोरेगाव, महाबळेश्वर या सहा तालुक्यांतील ५२ हजार शेतकरी किसन वीर कारखान्याचे सभासद आहेत. महाबळेश्वर वगळता इतर पाच तालुक्यांत या कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. सातारा, कोरेगाव तालुक्यांमध्ये साखर कारखाने असल्याने या तालुक्यांतील शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध असला तरी वाई, खंडाळा आणि जावळी तालुक्यातील सभासद शेतकरी हे किसन वीर कारखान्यावर अवलंबून आहेत. कारखान्याच्या अडचणी वाढल्या तर हे सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी पोळले जाणार आहेत. त्यामुळे त्यांचा विचार नेत्यांनी पहिल्यांदा करायला हवा, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

चौकट..

५२ वर्षांत एकदाच कारखाना बंद

किसन वीर साखर कारखान्यामध्ये १९६९-७० पहिला गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. त्यानंतर दुष्काळी परिस्थितीमुळे १९७३-७४ मध्ये उसाची उपलब्धता न झाल्याने कारखाना बंद ठेवावा लागला होता. त्यानंतर आजतागायत म्हणजे तब्बल ५२ वर्षे हा कारखाना ऊस गाळप करत आहे. राज्यातील नावाजलेल्या कारखान्यांच्या पंक्तीत किसन वीरचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जावळीसाठी प्रतापगड कारखाना आणि खंडाळा तालुक्यासाठी खंडाळा कारखाना उपलब्ध आहे. मात्र, वाई तालुक्यातील आणि तालुक्याच्या सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांचा किसन वीर कारखाना हा श्वास आहे. इतर पिकांना कवडीमोल भाव मिळत असताना ऊस शेतीच्या आधारावर वाईमधील बहुतांश शेतकरी अवलंबून आहेत. कितीही अडचणी आल्या, उसाचा दर परवडत नसला तरी शेतकरी ऊस घेतोय. त्यात आंतरपीक लावून खर्चाचा ताळेबंद साधतोय.

लोगो : किसन वीर कारखाना वाचवा

१७ किसन वीर