शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

दादा-आबा सावधपणे ऐका सभासदांच्या हाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:39 IST

सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना हा देशातील नावाजलेला कारखाना आहे. ...

सागर गुजर

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना हा देशातील नावाजलेला कारखाना आहे. या कारखान्याला भूगोल आणि इतिहास दोन्ही आहेत. स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल घेऊन ब्रिटिश राजवटीविरोधात त्वेषाने लढलेल्या दिवंगत यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर यांनी या कारखान्याचा पाया रचलाय... हा पाया खचू द्यायचा नसेल अन्‌ किसन वीरांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर हा कारखाना वाचवायलाच हवा. ‘दादा-आबा सावधपणे ऐका सभासदांच्या हाका’, अशी आर्त साद शेतकरी घालताना दिसत आहेत.

दिवंगत यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब शिंदे, आबासाहेब वीर यांनी भुईंजच्या माळावर साखर कारखाना उभारायचे स्वप्न पाहिले. १ ऑक्टोबर १९६८ मध्ये राज्य शासनाचे तर ७ ऑगस्ट १९६९ मध्ये केंद्र शासनाकडून कारखान्याला औद्योगिक परवाना मिळाला. यासाठी विनायकराव पाटील, पी. के. सावंत, राजारामबापू पाटील, माजी खासदार प्रतापराव भोसले यांच्या सकारात्मक विचारांतून हा कारखाना उभा राहिला. या नेत्यांनी शासनामध्ये असलेली राजकीय ताकद वापरली ती शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी! पुढे दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांनी देखील या कारखान्यासाठी मोठे योगदान दिले.

या नेत्यांनी धोम धरण, कण्हेर धरण उभारणीसाठी अविश्रांत प्रयत्न केले. वाई, खंडाळा, कोरेगाव, सातारा, जावळी या तालुक्यांतील शेती ओलिताखाली आणली. अनेक प्रश्न असतानाही त्यांची सोडवणूक सकारात्मक ऊर्जेतून करत या तालुक्यांतील शेती हिरवीगार केली. या तालुक्यांना उसाचा बेल्ट म्हणून ओळख सर्वत्र झाली. तालुक्यांचे नुसते नाव घेतले तरी सधन शेतकरी हे चित्र संपूर्ण देशातील लोकांपुढे आजही उभे राहते. आपल्या नेत्यांच्या प्रयत्नांना साद देत शेतकऱ्यांनी देखील मेहनत घेऊन ऊस शेती सुरू केली अन्‌ आजच्या घडीला या भागातील ऊस हे प्रमुख पीक आहे.

सध्या कारखाना मोठ्या अडचणींचा सामना करून सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळत नाहीत अन्‌ मिळाले तरी इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी मिळतात, अशी व्यथा शेतकरी व्यक्त करतात. मात्र, पैसे बुडत नाहीत... शेत पडीक ठेवण्यापेक्षा ऊस करायचा, तो आपल्या मालकीच्या कारखान्याला घालायचा, हा शिरस्ता शेतकऱ्यांनी सुरू ठेवलेला आहे. कारखानदारीत खासगीकरणाचे वारे वाहत असताना आपला कारखाना सुरू राहावा, या निर्मळ हेतूने शेतकरी ऊस उत्पादन घेतायत. आपल्याला परवडेल इतका दर मिळावा अन्‌ कारखाना वाचावा, एवढीच इच्छा शेतकऱ्यांची आहे. नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मुक्या हाका ऐकाव्यात, हीच त्यांची भावना आहे.

चौकट..

सभासद शेतकऱ्यांचा विचार करा

वाई, जावळी, सातारा, खंडाळा, कोरेगाव, महाबळेश्वर या सहा तालुक्यांतील ५२ हजार शेतकरी किसन वीर कारखान्याचे सभासद आहेत. महाबळेश्वर वगळता इतर पाच तालुक्यांत या कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. सातारा, कोरेगाव तालुक्यांमध्ये साखर कारखाने असल्याने या तालुक्यांतील शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध असला तरी वाई, खंडाळा आणि जावळी तालुक्यातील सभासद शेतकरी हे किसन वीर कारखान्यावर अवलंबून आहेत. कारखान्याच्या अडचणी वाढल्या तर हे सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी पोळले जाणार आहेत. त्यामुळे त्यांचा विचार नेत्यांनी पहिल्यांदा करायला हवा, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

चौकट..

५२ वर्षांत एकदाच कारखाना बंद

किसन वीर साखर कारखान्यामध्ये १९६९-७० पहिला गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. त्यानंतर दुष्काळी परिस्थितीमुळे १९७३-७४ मध्ये उसाची उपलब्धता न झाल्याने कारखाना बंद ठेवावा लागला होता. त्यानंतर आजतागायत म्हणजे तब्बल ५२ वर्षे हा कारखाना ऊस गाळप करत आहे. राज्यातील नावाजलेल्या कारखान्यांच्या पंक्तीत किसन वीरचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जावळीसाठी प्रतापगड कारखाना आणि खंडाळा तालुक्यासाठी खंडाळा कारखाना उपलब्ध आहे. मात्र, वाई तालुक्यातील आणि तालुक्याच्या सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांचा किसन वीर कारखाना हा श्वास आहे. इतर पिकांना कवडीमोल भाव मिळत असताना ऊस शेतीच्या आधारावर वाईमधील बहुतांश शेतकरी अवलंबून आहेत. कितीही अडचणी आल्या, उसाचा दर परवडत नसला तरी शेतकरी ऊस घेतोय. त्यात आंतरपीक लावून खर्चाचा ताळेबंद साधतोय.

लोगो : किसन वीर कारखाना वाचवा

१७ किसन वीर