शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

साथ उद्रेक होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी उपाययोजना कराव्यात : विनय गौडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात जलजन्य आजारांचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पाणीपुरवठा करताना टाकी स्वच्छता, पाणी ...

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात जलजन्य आजारांचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पाणीपुरवठा करताना टाकी स्वच्छता, पाणी शुद्धीकरण करून इतर उपाययोजनाही राबवाव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय गौडा यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यात २०२१ मध्ये जलजन्य आजाराचे साथ उद्रेक झाले आहेत. याची माहिती घेतल्यावर असे लक्षात आले की, हे उद्रेक मुख्य जलवाहिनीला गळती, खासगी नळ कनेक्शन गळती, तुंबलेली गटारे आणि गटारातून जलवाहिनी जाणे तसेच टाकी व विहिरीची अस्वच्छता, पाण्याचे शुद्धीकरण न होणे यामुळे झालेले आहेत. मागील वर्षाची तुलना करता २०२१ मध्ये सुरुवातीपासूनच जलजन्य आजाराचे साथ उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणात लागण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढे अशी स्थिती राहिल्यास पुढील नऊ महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात साथ उद्रेक होण्याची भीती आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी उपाययोजना तत्काळ राबवाव्यात. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यास मदत होईल.

ग्रामपंचायतीमार्फत दैनंदिन पाणीपुरवठा हा नियमित शुद्धीकरण करूनच व पुरेशा प्रमाणात करावा. पाणी उद्भव व पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात ५० फुटांपर्यंत शौचालय, जनावराचा गोठा तसेच सांडपाण्याचा निचरा असता कामा नये. पाणी उद्भवाशेजारी पाणी साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच कपडे आणि जनावरे धुणे टाळणे गरजेचे आहे, नळयोजनेला कोठेही गळती असता कामा नये, याबाबत वारंवार पाहणी करावी, शुद्धीकरणनंतर अर्ध्या तासाने पाण्याचे वितरण करावे. शुद्धीकरणानंतर पाण्याची गुणवत्ता (ओटी टेस्ट) टाकीजवळ, प्रत्येक एंड पाईपच्या ठिकाणी असणाऱ्या शेवटच्या नळाची घेऊन त्याची नोंद ठेवावी. तीन महिने पुरेल एवढा टीसीएल साठा करून ठेवावा. तीन महिन्यांतून एकदा सार्वजनिक हातपंपाचे शुद्धीकरण करावे, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे उद्भव याचे नमुने तीन महिन्यांतून एकदा तपासणीसाठी पाठवावेत, यासाठी ग्रामपंचायतींनी स्पीकरद्वारे लोकांत जागृती करावी, असेही स्पष्ट केले आहे.