शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

गोविंदा आला रे आला... दुसऱ्या दिवशी दवाखान्यात पळा रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:42 IST

दहीहंडी आणि तरुणाईचा उत्साह हे जणू समीकरणच बनलेले असते. अनेक भागात ठराविक दहीहंडी मंडळे उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी प्रसिद्ध ...

दहीहंडी आणि तरुणाईचा उत्साह हे जणू समीकरणच बनलेले असते. अनेक भागात ठराविक दहीहंडी मंडळे उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी प्रसिद्ध असतात. त्यांना तोड देण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करत असतात. या मंडळांचा आत्मविश्वास वाढल्यानंतर शहरांमध्ये जाऊन दहीहंडी फोडण्यासाठी नियोजन केले जाते. ट्रक टेम्पोमधून गोविंदा पथके शहरात जातात. अनेकदा ट्रक चालकाच्या केबिनवरील हौद्यावर बसून काही गोविंदा जातात. दहीहंडी फोडण्यासाठी जाताना किंवा परत गावी जाताना अपघात होऊन गोविंदा जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.

दहीहंडी कार्यक्रमात अतिउत्साहाच्या भरात गोविंदांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे लहान - मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. गोविंदांचे जास्तीत जास्त मनोरे उभारले जाऊ नयेत, यासाठी आयोजकांकडून पाण्याचे फवारे मारले जातात. काही ठिकाणी तर टॅंकर किंवा अग्निशमन दलाच्या बंबाचाही वापर केला जातो. या पाण्यांना दाब जास्त असतो. त्यामुळे पाण्याच्या अतिमाऱ्यामुळे कानठाळी बसणे, कायमचा बहिरेपणा येण्याचा धोका असतो. पाण्यामुळे हात - पाय घसरून गोविंदा पडतात. अशावेळी त्यांना झेलण्यासाठी शेकडो कार्यकर्ते असल्याचे पाहणाऱ्याला दिसत असले तरी एखादा गोविंदा झेलता आला नाही तर तो खालील कार्यकर्त्यांच्या डोक्यात पडतो. अशा वेळी तर त्याच्या अवयवांना मोठी इजा होण्याची शक्यता असते.

गाव पातळीवरील दहीहंड्या कमी उंचीच्या असल्या तरी किमान तीन ते चार थर लावावे लागतात. अशावेळी दहीहंडी उंच नाही त्याला काय होतंय, असा समज करून सर्वात वरच्या थरातील गोविंदा हेल्मेट किंवा इतर सुरक्षेची साधने वापरत नाहीत. दहीहंडी फुटतेही, परंतु खालचे थर ढासळतात आणि शेवटचा गोविंदा दोरीला धरून लटकत असतो. अशा वेळी दोरी सोडून उडी मारण्याशिवाय पर्याय उरत नाही. अन् त्यातूनही अपघात होतात.

दहीहंडीच्या दिवशी गोविंदांना लहान - मोठ्या इजा झाल्या तरी उत्साहाच्या भरात काही कळत नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी अंथरूण घेऊन झोपण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यातून गावोगावचे दवाखाने गोविंदा पथकांनी भरून जातात. गंभीर अपघात असतील तर अनेकदा शस्त्रक्रिया करण्याची वेळ त्यांच्यावर येत असते. त्यामुळे उत्सव साजरा करताना काळजी घेणे गरजेचे आहे.