शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदा आला रे आला... दुसऱ्या दिवशी दवाखान्यात पळा रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:42 IST

दहीहंडी आणि तरुणाईचा उत्साह हे जणू समीकरणच बनलेले असते. अनेक भागात ठराविक दहीहंडी मंडळे उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी प्रसिद्ध ...

दहीहंडी आणि तरुणाईचा उत्साह हे जणू समीकरणच बनलेले असते. अनेक भागात ठराविक दहीहंडी मंडळे उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी प्रसिद्ध असतात. त्यांना तोड देण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करत असतात. या मंडळांचा आत्मविश्वास वाढल्यानंतर शहरांमध्ये जाऊन दहीहंडी फोडण्यासाठी नियोजन केले जाते. ट्रक टेम्पोमधून गोविंदा पथके शहरात जातात. अनेकदा ट्रक चालकाच्या केबिनवरील हौद्यावर बसून काही गोविंदा जातात. दहीहंडी फोडण्यासाठी जाताना किंवा परत गावी जाताना अपघात होऊन गोविंदा जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.

दहीहंडी कार्यक्रमात अतिउत्साहाच्या भरात गोविंदांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे लहान - मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. गोविंदांचे जास्तीत जास्त मनोरे उभारले जाऊ नयेत, यासाठी आयोजकांकडून पाण्याचे फवारे मारले जातात. काही ठिकाणी तर टॅंकर किंवा अग्निशमन दलाच्या बंबाचाही वापर केला जातो. या पाण्यांना दाब जास्त असतो. त्यामुळे पाण्याच्या अतिमाऱ्यामुळे कानठाळी बसणे, कायमचा बहिरेपणा येण्याचा धोका असतो. पाण्यामुळे हात - पाय घसरून गोविंदा पडतात. अशावेळी त्यांना झेलण्यासाठी शेकडो कार्यकर्ते असल्याचे पाहणाऱ्याला दिसत असले तरी एखादा गोविंदा झेलता आला नाही तर तो खालील कार्यकर्त्यांच्या डोक्यात पडतो. अशा वेळी तर त्याच्या अवयवांना मोठी इजा होण्याची शक्यता असते.

गाव पातळीवरील दहीहंड्या कमी उंचीच्या असल्या तरी किमान तीन ते चार थर लावावे लागतात. अशावेळी दहीहंडी उंच नाही त्याला काय होतंय, असा समज करून सर्वात वरच्या थरातील गोविंदा हेल्मेट किंवा इतर सुरक्षेची साधने वापरत नाहीत. दहीहंडी फुटतेही, परंतु खालचे थर ढासळतात आणि शेवटचा गोविंदा दोरीला धरून लटकत असतो. अशा वेळी दोरी सोडून उडी मारण्याशिवाय पर्याय उरत नाही. अन् त्यातूनही अपघात होतात.

दहीहंडीच्या दिवशी गोविंदांना लहान - मोठ्या इजा झाल्या तरी उत्साहाच्या भरात काही कळत नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी अंथरूण घेऊन झोपण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यातून गावोगावचे दवाखाने गोविंदा पथकांनी भरून जातात. गंभीर अपघात असतील तर अनेकदा शस्त्रक्रिया करण्याची वेळ त्यांच्यावर येत असते. त्यामुळे उत्सव साजरा करताना काळजी घेणे गरजेचे आहे.