शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शासनाने हॉटेल व्यावसायिकांची वीजजोडणी तोडू नये : भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

सातारा : ‘लॉकडाऊन शिथिल असल्याने हॉटेल्समध्ये पन्नास टक्के क्षमतेने ग्राहकांना बसण्यास परवानगी दिली आहे. मात्र वीज कंपनीने लॉकडाऊन काळातील ...

सातारा : ‘लॉकडाऊन शिथिल असल्याने हॉटेल्समध्ये पन्नास टक्के क्षमतेने ग्राहकांना बसण्यास परवानगी दिली आहे. मात्र वीज कंपनीने लॉकडाऊन काळातील थकीत वीजबिल भरण्यासाठी तगादा लावला आहे. त्यांना पंधरा दिवसांची मुदत मागूनही वीज कंपनी मुदत देण्यास तयार नाही. जबरदस्तीने ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. ते शासनाने थांबवावे,’ अशी मागणी सातारा एनएच ४ हॉटेल असोसिएशनच्या वतीने सागर भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे हॉटेलमधील कर्मचारी सांभाळणे, हॉटेलचा नियमित खर्च ठेवणे, आर्थिक परिस्थिती फारच अवघड झाली आहे तरीही इतक्या दिवसांचा व्यवसाय सुरू ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक व्यावसायिक सर्व ताकतीनिशी उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सरकारच्या हातात असणारी वीज कंपनी जुलमी पद्धतीने वसुली करत आहे. याबाबतीत वीज कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना भेटल्यानंतरही वरूनच आम्हाला आदेश आले आहेत, असे सांगितले जात आहे. या पद्धतीने वसुली होत राहिली तर लोकांचा शासनावर विश्वास राहणार नाही. पुढील काळात अनागोंदी कारभार सुरू होईल, कोणी सरकारचे ऐकणार नाही. वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यासाठी वीजबिल भरण्यासाठी काही ठराविक काळाची मुदत द्यावी, सरकारला शक्य असेल तर काही अंशी सूट द्यावी. कोणाचेही वीजजोडणी तोडू नये.

याबाबत ‘राज्यभर वीजतोडणी मोहीम राबवली जात आहे. मात्र माझ्या पातळीवर काय करता येते का ते मी पाहतो,’ असे आश्वासन शेखर सिंग यांनी दिले.