शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

शासनाने हॉटेल व्यावसायिकांची वीजजोडणी तोडू नये : भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

सातारा : ‘लॉकडाऊन शिथिल असल्याने हॉटेल्समध्ये पन्नास टक्के क्षमतेने ग्राहकांना बसण्यास परवानगी दिली आहे. मात्र वीज कंपनीने लॉकडाऊन काळातील ...

सातारा : ‘लॉकडाऊन शिथिल असल्याने हॉटेल्समध्ये पन्नास टक्के क्षमतेने ग्राहकांना बसण्यास परवानगी दिली आहे. मात्र वीज कंपनीने लॉकडाऊन काळातील थकीत वीजबिल भरण्यासाठी तगादा लावला आहे. त्यांना पंधरा दिवसांची मुदत मागूनही वीज कंपनी मुदत देण्यास तयार नाही. जबरदस्तीने ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. ते शासनाने थांबवावे,’ अशी मागणी सातारा एनएच ४ हॉटेल असोसिएशनच्या वतीने सागर भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे हॉटेलमधील कर्मचारी सांभाळणे, हॉटेलचा नियमित खर्च ठेवणे, आर्थिक परिस्थिती फारच अवघड झाली आहे तरीही इतक्या दिवसांचा व्यवसाय सुरू ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक व्यावसायिक सर्व ताकतीनिशी उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सरकारच्या हातात असणारी वीज कंपनी जुलमी पद्धतीने वसुली करत आहे. याबाबतीत वीज कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना भेटल्यानंतरही वरूनच आम्हाला आदेश आले आहेत, असे सांगितले जात आहे. या पद्धतीने वसुली होत राहिली तर लोकांचा शासनावर विश्वास राहणार नाही. पुढील काळात अनागोंदी कारभार सुरू होईल, कोणी सरकारचे ऐकणार नाही. वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यासाठी वीजबिल भरण्यासाठी काही ठराविक काळाची मुदत द्यावी, सरकारला शक्य असेल तर काही अंशी सूट द्यावी. कोणाचेही वीजजोडणी तोडू नये.

याबाबत ‘राज्यभर वीजतोडणी मोहीम राबवली जात आहे. मात्र माझ्या पातळीवर काय करता येते का ते मी पाहतो,’ असे आश्वासन शेखर सिंग यांनी दिले.