शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे : उदयनराजे

By admin | Updated: January 8, 2017 23:30 IST

पंतप्रधानांना निवेदन : नोटाबंदीमुळे सामान्य नागरिक हवालदिल

सातारा : ‘देशाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड काढून टाकण्यासाठी पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. भ्रष्ट लोकांचा पैसा बाहेर येण्याऐवजी पैशाविना सामान्य जनता हवालदिल झाली. पंतप्रधानांनी काळ्या पैशाविरोधी केलेला हा सर्जिकल स्ट्राईक म्हणजे दुर्धर रोग घालविण्यासाठी विना भूल केलेली शस्त्रक्रिया होय,’ अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. दरम्यान, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली.याबाबत खा. उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले असून, या निवेदनात म्हटले आहे की, देशातील भ्रष्टाचारी, शासनापेक्षा हुशार निघाले. आपण भ्रष्टाचाराची मोठी मगर पकडण्यासाठी संपूर्ण मोठ्या तलावावर जाळे टाकले; पण भ्रष्टाचाराची मगर चाणाक्षपणे अगोदरच तळ्याबाहेर गेली होती. ज्याप्रमाणे मासे पाण्याशिवाय जगू शकत नाहीत, त्याचप्रमाणे सामान्य माणूस पैशाशिवाय जगू शकतनाही.नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी, कंत्राटी कामगार, रस्त्यावरचे व्यापारी, शेतमजूर, किराणा मालाचे दुकानदार, शेती, संबंधित दूध व्यवसाय, मासेमार, लहान व मध्यम उद्योजक यांचे अतोनात नुकसान झाले. नोटाबंदीमुळे शेतमालाचे बाजारभाव ५० टक्क्यांनी कमी झाले आणि मागणीही ५० टक्क्यांनी कमी झाली. डाळिंबाची फळे मागणी अभावी काही ठिकाणी झाडाला सुकली. दुधाची बिले वेळेवर मिळत नाहीत; पण दुभत्या जनावरांना चारा, खुराक मात्र वेळेवर घालावा लागतो.आपण दोन महिन्यांचे व्याज पीक कर्जावरील माफकेले आहे, असे जाहीर केले आहे. वस्तुस्थिती पाहिल्यास एका सहकारी बॅँकेने ६३० कोटींचे पीक कर्ज एकूण २ लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दि. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१६ या खरीप व रब्बी हंगामासाठी वाटलेले आहेत. याचा विचार केल्यास, प्रत्येक शेतकऱ्याला १९८ रुपये म्हणजे शेतमजुराच्या अर्ध्या दिवसाची मजुरी इतकी रक्कम मिळते, असेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)पीक कर्ज दोन टक्के व्याजदराने देण्यात यावे...पंतप्रधांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावी, शेतीचे भांडवली व पीक कर्ज सरळ व्याजदर पद्धतीने वार्षिक २ टक्के व्याजदराने देण्यात यावे, सिंचन, प्रक्रिया, साठवणूक, दळणवळण आदी सोयी योजनेतून पूर्ण करण्यात याव्या, शेती व पूरक व्यवसायातील उत्पन्नाला प्रत्यक्ष उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने बाजारभाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटापासून सुरक्षित करण्यासाठी जगातील प्रगत देशाप्रमाणे शेती उत्पन्नातील जोखमीचे व्यवस्थापन करावे, त्यामुळे भविष्यात भारतातील शेतकरी पत्नीसह पेन्शनयुक्त व अनारोग्यापासून संरक्षित होईल आणि शेती अनुदान मुक्त होईल, अशी मागणी केली आहे.