शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

शासनाला पश्चिम महाराष्ट्राचा अभ्यास नाही

By admin | Updated: February 15, 2016 23:58 IST

अजित पवार : विसापूर मेळावा; शेतकरी, उद्योजक समाधानी नसल्याचा आरोप

पुसेगाव : ‘राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे; पण या युती शासनाला पश्चिम महाराष्ट्राचा अभ्यास नाही. हे सरकार शेतकरी विरोधातील असल्याने सर्व कामे ठप्प आहेत. शिक्षक, उद्योजक व शेतकरी कोणीही या शासनाकडून समाधानी नाही. आपल्या येथील उद्योजकांना बाजूला सारून परदेशातील उद्योजकांना ‘मेक इन इंडिया’चा नारा देत रेड कारपेट टाकण्याची भाषा सुरू आहे. ग्रामीण भागातील कामगार चळवळ उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे,’ असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. दरम्यान, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसह इतर घटकांचे प्रश्न व न्यायासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार रहा, असे आवाहनही केले. खटाव तालुक्यातील विसापूर येथे सरपंच सागर साळुंखे यांच्या माध्यमातून व लोकसहभागातून झालेल्या जलसंधारण कामाची पाहणी करण्यासाठी पवार आले होते. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, बाळासाहेब सोळस्कर, नितीन भरगुडे-पाटील, प्रदीप विधाते, भाग्यश्री भाग्यवंत आदी उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘युती शासनाने राज्यावर पावणे चार हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना जाऊन एक वर्ष होत नाही तोपर्यंत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान बंद केले आहे. आमच्या शासनाच्या काळात सुरू असणाऱ्या चांगल्या योजना या शासनाने बाजूला करून बंद केल्या आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बट्याबोळ झाला आहे. जागतिक बाजारात रुपया घसरत चालला असून, डॉलर वाढत आहे. शेजारच्या पाकिस्तानची भूमिका देशाला मारक असून, निष्पापांचा जीव जात आहे. तरी मोदी सरकार गप्प आहे.’ (वार्ताहर)