शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शासनाला पश्चिम महाराष्ट्राचा अभ्यास नाही

By admin | Updated: February 15, 2016 23:58 IST

अजित पवार : विसापूर मेळावा; शेतकरी, उद्योजक समाधानी नसल्याचा आरोप

पुसेगाव : ‘राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे; पण या युती शासनाला पश्चिम महाराष्ट्राचा अभ्यास नाही. हे सरकार शेतकरी विरोधातील असल्याने सर्व कामे ठप्प आहेत. शिक्षक, उद्योजक व शेतकरी कोणीही या शासनाकडून समाधानी नाही. आपल्या येथील उद्योजकांना बाजूला सारून परदेशातील उद्योजकांना ‘मेक इन इंडिया’चा नारा देत रेड कारपेट टाकण्याची भाषा सुरू आहे. ग्रामीण भागातील कामगार चळवळ उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे,’ असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. दरम्यान, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसह इतर घटकांचे प्रश्न व न्यायासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार रहा, असे आवाहनही केले. खटाव तालुक्यातील विसापूर येथे सरपंच सागर साळुंखे यांच्या माध्यमातून व लोकसहभागातून झालेल्या जलसंधारण कामाची पाहणी करण्यासाठी पवार आले होते. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, बाळासाहेब सोळस्कर, नितीन भरगुडे-पाटील, प्रदीप विधाते, भाग्यश्री भाग्यवंत आदी उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘युती शासनाने राज्यावर पावणे चार हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना जाऊन एक वर्ष होत नाही तोपर्यंत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान बंद केले आहे. आमच्या शासनाच्या काळात सुरू असणाऱ्या चांगल्या योजना या शासनाने बाजूला करून बंद केल्या आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बट्याबोळ झाला आहे. जागतिक बाजारात रुपया घसरत चालला असून, डॉलर वाढत आहे. शेजारच्या पाकिस्तानची भूमिका देशाला मारक असून, निष्पापांचा जीव जात आहे. तरी मोदी सरकार गप्प आहे.’ (वार्ताहर)