शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

उसाला एकरकमी एफआरपी अशक्य!

By admin | Updated: November 15, 2015 01:03 IST

कारखानदारांवरच भरोसा : कोंडी कोण फोडणार; केंद्राने साखरेचाही दर निश्चित करण्याची मागणी

संजय कदम ल्ल वाठार स्टेशन गतवर्षी ऊसदराबाबत शांत बसलेली शेतकरी संघटना या हंगामातही हव्यासापोटी शांतच राहिल्याने शेतकऱ्यांच्या उसाचा दर हा कारखानदारांच्या भरोशावरच निश्चित होणार आहे. या हंगामात केंद्राने जाहीर केलेली एफआरपी (किमान आधारभूत किंमत) ही एकरकमी मिळावी हीच शासन व शेतकरी संघटनांची प्रमुख मागणी असली तरी कोणत्याही परिस्थितीत या हंगामात एकरकमी एफआरपी देता येणे शक्य नसल्याची भूमिका कारखानदारांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे या हंगामातील उसाची कोंडी कोण फोडणार? याकडे ऊस उत्पादकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. राज्यात उसाचा गाळप हंगाम स्थिर होऊ लागला असून, गत वर्षाच्या तुलनेत या हंगामात दुष्काळी परिस्थितीचा साखर उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. या हंगामात उसाचे एकरी उत्पन्न ३० टक्क््यांहून कमी झाले आहे. यामुळे उसाचे क्षेत्र जरी गतवर्षी एवढे दिसत असले तरी साखर उत्पादनात कमालीची घट होणार आहे. या हंगामात सातारा जिल्ह्यात उभा असलेल्या ६७ लाख मे टन उसाचे गाळप होणार असून, जिल्ह्यातील एकूण १३ साखर कारखान्यांनी आपल्या गाळपाची तयारी पूर्ण केली आहे. अजिंक्यतारा, साखरवाडी या कारखान्यांनी प्रत्यक्षात गाळपाचा शुभारंभ केला आहे. उर्वरित सर्वच कारखाने आठवडाभरात आपल्या गाळपाचा शुभारंभ करणार आहेत. उसाच्या गाळप हंगामाचा शुभारंभ आणि या दरम्यान होणारे शेतकरी संघटनांचे आंदोलन हे समीकरणच झाले होते. राज्यात शेतकऱ्यांच्या उसाला रास्त भाव देणारी संघटना म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर शेतकऱ्यांचा विश्वास होता. वर्षापूर्वी लोकसभा, विधानसभांच्या निवडणुका लागल्या. यामध्ये ही संघटना सध्याच्या सत्तेत असलेल्या सरकारमधील घटकपक्ष राहिली होती. यामुळे गतवर्षी या संघटनेला या सरकारमधील सत्तेत कुठेतरी स्थान मिळेल, ही आशा राहिल्याने संघटनेने सरकारच्या एफआरपीला महत्त्व दिले. याचीच पुनरावृती या हंगामात झाली. नुकत्याच जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत या संघटनेने आपली मवाळ भूमिका स्पष्ट केली. यामुळे आता शेतकऱ्यांच्या दराबाबत आवाज कोण उठवणार, असाच प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूने उसाचे क्षेत्र कमी होत असताना या हंगामात वाढती साखर कारखानदारी भविष्यात उसाअभावी संकटात सापडण्याची परिस्थिती दिसत आहे. पुढील हंगामात अनेक भागांतील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात मोकळे होऊ लागले आहे. यामुळे पुढच्या गाळप हंगामात ऊस उपलब्ध करण्याचे आव्हान अनेक नव्या कारखान्यासमोर राहणार आहे. त्यामुळे या हंगामात जे कारखाने शेतकऱ्यांच्या उसाबाबत योग्य भूमिका बजावतील त्यांनाच हे शेतकरी भविष्यात ऊस देण्याची मानसिकता ठेवतील, अशी परिस्थिती आहे. सध्याच्या हंगामात केंद्राने जाहीर केलेली एफआरपी राज्यातील सर्वच कारखान्यांसाठी बंधनकारक आहे. ही एफआरपी नियमाप्रमाणे एकरकमी देण्याबाबतचा कायदा आहे. त्यामुळे कारखान्यांना या कायद्याप्रमाणे ऊस गाळपानंतर १४ दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. शासन व शेतकरी संघटनाही या मुद्द्यशी ठाम असल्यातरी कारखानदारांना ती देणे शक्य आहे का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. दरापेक्षा ऊस वाळण्याची चिंता या हंगामात जिल्ह्यात उसाचे क्षेत्र गतवर्षी एवढेच असले तरी जिल्ह्यातील अनेक भागांत असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची वाढ झाली नाही. दुष्काळी भागात आता पाणीच नसल्याने शेतकरी ऊसदराची चिंता करण्यापेक्षा असणारा ऊस वाळून जाऊ नये, यासाठी मिळेल त्या कारखान्याला पाठवत आहे.  

साखर कारखानदारीत शासनाच्या एफआरपी धोरणास माझा विरोध नाही; परंतु केंद्र सरकार ज्याप्रमाणे उसाची आधारभूत किंमत निश्चित करते. त्याचप्रमाणे साखरेचा हमी भावाचा निर्णयही केंद्र सरकारने ठरवावा. तरच या गोष्टी शक्य आहेत; अन्यथा कारखानदारांना या परिस्थितीत एफआरपी देणे कदापि शक्य नाही. शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळालाच पाहिजे; पण त्यासाठी साखरेचा दरही निश्चित असायला हवा. शासनानेच याबाबत लक्ष द्यावे. - प्रल्हादराव साळुंखे-पाटील, अध्यक्ष न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी.