शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

ओगलेवाडीत जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

ओगलेवाडी : वाढती रुग्ण संख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी यासाठी हजारमाची ग्रामस्तरीय कोविड ...

ओगलेवाडी : वाढती रुग्ण संख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी यासाठी हजारमाची ग्रामस्तरीय कोविड दक्षता समितीने जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यास नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दोन्ही दिवशी चांगला प्रतिसाद दिला. बाजारपेठेसह संपूर्ण ओगलेवाडी व हजारमाचीसह संपूर्ण परिसरात कडकडीत लाॅकडाऊन पाळला गेला.

लोकहिताच्या कामात नेहमीच मदतीचा हात देण्यासाठी ओगलेवाडीकर तत्पर असतात याचा प्रत्यय पुन्हा आला.

ओगलेवाडी परिसरातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी असणारी औद्योगिक वसाहत बाजारपेठ आणि भाजी मंडई यामुळे या परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते. या वर्दळीचा परिणाम म्हणजे या परिसरातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ही वाढती रुग्णसंख्या वेळीच रोखली नाही तर पुन्हा भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल हे ओळखून कोविड दक्षता समिती हजारमाची व सरपंच विद्या घबाडे व उपसरपंच प्रशांत यादव व सर्व सदस्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.

हा जनता कर्फ्यू २०, २१ एप्रिलला पाळण्यात आला. ग्रामपंचायत हजारमाचीच्या वतीने दोन दिवस ध्वनिक्षेपकावरून वातावरण निर्मिती केली जात होती. दक्षता समिती सदस्य ही बाजारपेठ परिसरात जनजागृती करीत होते. याचा परिणाम असा झाला की, जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद लाभला. सर्व बाजारपेठ दोन दिवस कडकडीत बंद होती. नागरिकांनीही दोन्ही दिवस घरात राहून या अभियानात मोठी सक्रियता दिली. ओगलेवाडी आणि परिसर या काळात पूर्ण बंद असल्याने बाजारपेठ परिसरात शुकशुकाट जाणवत होता, तर रस्त्यावर फक्त राज्यमार्गावर तुरळक वर्दळ सुरू होती. ती इतर ठिकाणच्या वाहनांची होती. या प्रतिसादाने ज्या हेतूने कर्फ्यूचे आयोजन केले होते, तो हेतू सफल होण्यास हातभार लागणार आहे. पुढील काही दिवसांत येथील रुग्णसंख्येवर नियंत्रण येईल अशी आशा निर्माण झाली आहे.

चौकट

धोका समजून घेतल्याने प्रतिसाद : यादव

भविष्यातील संकटाची जाणीव करून दिली.

लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांना याची आवश्यकता का आहे याची जाणीवही स्पष्ट करून दिली. वाढती रुग्णसंख्या ही वेळेत रोखली गेली नाही तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, हे येथील जनता आणि व्यापाऱ्यांनी समजून घेतल्यानेच प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला, अशी माहिती हजारमाजीचे उपसरपंच प्रशांत यादव यांनी दिली.