शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

ओगलेवाडीत जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

ओगलेवाडी : वाढती रुग्ण संख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी यासाठी हजारमाची ग्रामस्तरीय कोविड ...

ओगलेवाडी : वाढती रुग्ण संख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी यासाठी हजारमाची ग्रामस्तरीय कोविड दक्षता समितीने जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यास नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दोन्ही दिवशी चांगला प्रतिसाद दिला. बाजारपेठेसह संपूर्ण ओगलेवाडी व हजारमाचीसह संपूर्ण परिसरात कडकडीत लाॅकडाऊन पाळला गेला.

लोकहिताच्या कामात नेहमीच मदतीचा हात देण्यासाठी ओगलेवाडीकर तत्पर असतात याचा प्रत्यय पुन्हा आला.

ओगलेवाडी परिसरातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी असणारी औद्योगिक वसाहत बाजारपेठ आणि भाजी मंडई यामुळे या परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते. या वर्दळीचा परिणाम म्हणजे या परिसरातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ही वाढती रुग्णसंख्या वेळीच रोखली नाही तर पुन्हा भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल हे ओळखून कोविड दक्षता समिती हजारमाची व सरपंच विद्या घबाडे व उपसरपंच प्रशांत यादव व सर्व सदस्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.

हा जनता कर्फ्यू २०, २१ एप्रिलला पाळण्यात आला. ग्रामपंचायत हजारमाचीच्या वतीने दोन दिवस ध्वनिक्षेपकावरून वातावरण निर्मिती केली जात होती. दक्षता समिती सदस्य ही बाजारपेठ परिसरात जनजागृती करीत होते. याचा परिणाम असा झाला की, जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद लाभला. सर्व बाजारपेठ दोन दिवस कडकडीत बंद होती. नागरिकांनीही दोन्ही दिवस घरात राहून या अभियानात मोठी सक्रियता दिली. ओगलेवाडी आणि परिसर या काळात पूर्ण बंद असल्याने बाजारपेठ परिसरात शुकशुकाट जाणवत होता, तर रस्त्यावर फक्त राज्यमार्गावर तुरळक वर्दळ सुरू होती. ती इतर ठिकाणच्या वाहनांची होती. या प्रतिसादाने ज्या हेतूने कर्फ्यूचे आयोजन केले होते, तो हेतू सफल होण्यास हातभार लागणार आहे. पुढील काही दिवसांत येथील रुग्णसंख्येवर नियंत्रण येईल अशी आशा निर्माण झाली आहे.

चौकट

धोका समजून घेतल्याने प्रतिसाद : यादव

भविष्यातील संकटाची जाणीव करून दिली.

लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांना याची आवश्यकता का आहे याची जाणीवही स्पष्ट करून दिली. वाढती रुग्णसंख्या ही वेळेत रोखली गेली नाही तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, हे येथील जनता आणि व्यापाऱ्यांनी समजून घेतल्यानेच प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला, अशी माहिती हजारमाजीचे उपसरपंच प्रशांत यादव यांनी दिली.