शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

ओगलेवाडीत जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

ओगलेवाडी : वाढती रुग्ण संख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी यासाठी हजारमाची ग्रामस्तरीय कोविड ...

ओगलेवाडी : वाढती रुग्ण संख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी यासाठी हजारमाची ग्रामस्तरीय कोविड दक्षता समितीने जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यास नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दोन्ही दिवशी चांगला प्रतिसाद दिला. बाजारपेठेसह संपूर्ण ओगलेवाडी व हजारमाचीसह संपूर्ण परिसरात कडकडीत लाॅकडाऊन पाळला गेला.

लोकहिताच्या कामात नेहमीच मदतीचा हात देण्यासाठी ओगलेवाडीकर तत्पर असतात याचा प्रत्यय पुन्हा आला.

ओगलेवाडी परिसरातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी असणारी औद्योगिक वसाहत बाजारपेठ आणि भाजी मंडई यामुळे या परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते. या वर्दळीचा परिणाम म्हणजे या परिसरातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ही वाढती रुग्णसंख्या वेळीच रोखली नाही तर पुन्हा भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल हे ओळखून कोविड दक्षता समिती हजारमाची व सरपंच विद्या घबाडे व उपसरपंच प्रशांत यादव व सर्व सदस्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.

हा जनता कर्फ्यू २०, २१ एप्रिलला पाळण्यात आला. ग्रामपंचायत हजारमाचीच्या वतीने दोन दिवस ध्वनिक्षेपकावरून वातावरण निर्मिती केली जात होती. दक्षता समिती सदस्य ही बाजारपेठ परिसरात जनजागृती करीत होते. याचा परिणाम असा झाला की, जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद लाभला. सर्व बाजारपेठ दोन दिवस कडकडीत बंद होती. नागरिकांनीही दोन्ही दिवस घरात राहून या अभियानात मोठी सक्रियता दिली. ओगलेवाडी आणि परिसर या काळात पूर्ण बंद असल्याने बाजारपेठ परिसरात शुकशुकाट जाणवत होता, तर रस्त्यावर फक्त राज्यमार्गावर तुरळक वर्दळ सुरू होती. ती इतर ठिकाणच्या वाहनांची होती. या प्रतिसादाने ज्या हेतूने कर्फ्यूचे आयोजन केले होते, तो हेतू सफल होण्यास हातभार लागणार आहे. पुढील काही दिवसांत येथील रुग्णसंख्येवर नियंत्रण येईल अशी आशा निर्माण झाली आहे.

चौकट

धोका समजून घेतल्याने प्रतिसाद : यादव

भविष्यातील संकटाची जाणीव करून दिली.

लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांना याची आवश्यकता का आहे याची जाणीवही स्पष्ट करून दिली. वाढती रुग्णसंख्या ही वेळेत रोखली गेली नाही तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, हे येथील जनता आणि व्यापाऱ्यांनी समजून घेतल्यानेच प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला, अशी माहिती हजारमाजीचे उपसरपंच प्रशांत यादव यांनी दिली.