शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओगलेवाडीत जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

ओगलेवाडी : वाढती रुग्ण संख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी यासाठी हजारमाची ग्रामस्तरीय कोविड ...

ओगलेवाडी : वाढती रुग्ण संख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी यासाठी हजारमाची ग्रामस्तरीय कोविड दक्षता समितीने जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यास नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दोन्ही दिवशी चांगला प्रतिसाद दिला. बाजारपेठेसह संपूर्ण ओगलेवाडी व हजारमाचीसह संपूर्ण परिसरात कडकडीत लाॅकडाऊन पाळला गेला.

लोकहिताच्या कामात नेहमीच मदतीचा हात देण्यासाठी ओगलेवाडीकर तत्पर असतात याचा प्रत्यय पुन्हा आला.

ओगलेवाडी परिसरातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी असणारी औद्योगिक वसाहत बाजारपेठ आणि भाजी मंडई यामुळे या परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते. या वर्दळीचा परिणाम म्हणजे या परिसरातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ही वाढती रुग्णसंख्या वेळीच रोखली नाही तर पुन्हा भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल हे ओळखून कोविड दक्षता समिती हजारमाची व सरपंच विद्या घबाडे व उपसरपंच प्रशांत यादव व सर्व सदस्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.

हा जनता कर्फ्यू २०, २१ एप्रिलला पाळण्यात आला. ग्रामपंचायत हजारमाचीच्या वतीने दोन दिवस ध्वनिक्षेपकावरून वातावरण निर्मिती केली जात होती. दक्षता समिती सदस्य ही बाजारपेठ परिसरात जनजागृती करीत होते. याचा परिणाम असा झाला की, जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद लाभला. सर्व बाजारपेठ दोन दिवस कडकडीत बंद होती. नागरिकांनीही दोन्ही दिवस घरात राहून या अभियानात मोठी सक्रियता दिली. ओगलेवाडी आणि परिसर या काळात पूर्ण बंद असल्याने बाजारपेठ परिसरात शुकशुकाट जाणवत होता, तर रस्त्यावर फक्त राज्यमार्गावर तुरळक वर्दळ सुरू होती. ती इतर ठिकाणच्या वाहनांची होती. या प्रतिसादाने ज्या हेतूने कर्फ्यूचे आयोजन केले होते, तो हेतू सफल होण्यास हातभार लागणार आहे. पुढील काही दिवसांत येथील रुग्णसंख्येवर नियंत्रण येईल अशी आशा निर्माण झाली आहे.

चौकट

धोका समजून घेतल्याने प्रतिसाद : यादव

भविष्यातील संकटाची जाणीव करून दिली.

लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांना याची आवश्यकता का आहे याची जाणीवही स्पष्ट करून दिली. वाढती रुग्णसंख्या ही वेळेत रोखली गेली नाही तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, हे येथील जनता आणि व्यापाऱ्यांनी समजून घेतल्यानेच प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला, अशी माहिती हजारमाजीचे उपसरपंच प्रशांत यादव यांनी दिली.