शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

निखळ मैत्री अन् बरंच काही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

सातारा जिल्ह्यात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चे फारसे वारे आलेले नसले तरी याबद्दल प्रत्येकालाच कमालीची उत्सुकता असते. लग्न करण्यापूर्वी एकमेकांना पुरेसे ...

सातारा जिल्ह्यात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चे फारसे वारे आलेले नसले तरी याबद्दल प्रत्येकालाच कमालीची उत्सुकता असते. लग्न करण्यापूर्वी एकमेकांना पुरेसे ओळखता यावे, स्वभाव समजावेत म्हणून शहरी भागात तरुण-तरुणी एकत्र राहतात. या काळात त्यांच्यात कसले नातेसंबंध असतील, हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. त्यावर ‘निखळ मैत्री आणि बरंच काही’ हे योग्य उत्तर असू शकते.

नवी पिढी जरा जास्तच व्यवहारी आहे. ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचे आहे त्याला आपण नीट ओळखले पाहिजे, पारखले पाहिजे, हा विचार नव्या पिढीत रुजत आहे. त्यामुळेच लग्नापूर्वी तरुण-तरुणी एकत्र राहतात. या संबंधांकडे ते केवळ निखळ मैत्री म्हणूनच पाहत आहेत. या काळात दोघेही होणारा नवरा किंवा बायको म्हणून न राहता मित्र-मैत्रीण म्हणूनच राहण्याचा प्रयत्न करत असतात. एकमेकांची काळजी घेतली जाते, कोणी आजारी पडले तर काळजी घेतले जाते. त्याची सेवा केली जाते. अनेकदा रात्री जागून काढल्या जातात. तसेच होणाऱ्या जोडीदाराला काय आवडतं, काय आवडत नाही, हे पाहिले जाते. साहजिकच कालांतराने आवडी-निवडी जपल्या जातात. या काळात कसल्याही नात्याचं दडपण नसल्याने हसणं, खेळणं चाललेलं असतं. हे तटस्थपणे पाहणाऱ्यांना छान-छान वाटत असले तरी या नात्यामध्ये अनेक अडचणी जाणवत असतात.

चौकट :

गाजराची पुंगी वाजली तर वाजली

‘लिव्ह इन रिलेशन’ म्हणजे एकप्रकारे व्यवहारच असतो. एकमेकांचे स्वभाव, मन जुळले तर त्याचा शेवट गोड होतो. लग्न लावून ते संसाराला लागतात. पण त्यांच्यात नाहीच काही जुळले तर दोघेही एकमेकांना सोडून आपापल्या मार्गाने निघून जातात.

चौकट :

व्यवहार आडवा येतो अन्...

‘लिव्ह इन रिलेशन’ हे एकमेकांना ओळखण्यासाठी एक नाव असले तरी अनेकदा दोघांमधील एक व्यवहार असतो. पुणे, मुंबईतील फ्लॅटचे भाडे परवडत नाही. अशावेळी आपापल्या गावाकडील तो किंवा ती एक खोली भाड्याने घेऊन राहतात. चहा, नाष्ट्याचा खर्च विभागला जातो. त्यामुळे हे म्हणजे केवळ व्यावहारिक तडजोड समजली जाते; पण त्यातील एखादा दुसऱ्यानेच खर्च करावा म्हणून भाग पाडतो. सुरुवातीला काहीवेळा मैत्रीच्या नात्यात तो केला जातोही, पण वारंवार घडत असल्यास किंवा मुद्दाम गंडवले जात असल्याचे लक्षात आल्यावर सर्व सोडून दिले जाते. पण त्यानंतर मनाला त्रास झाल्यास ते निघून जातात.