शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निखळ मैत्री अन् बरंच काही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

सातारा जिल्ह्यात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चे फारसे वारे आलेले नसले तरी याबद्दल प्रत्येकालाच कमालीची उत्सुकता असते. लग्न करण्यापूर्वी एकमेकांना पुरेसे ...

सातारा जिल्ह्यात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चे फारसे वारे आलेले नसले तरी याबद्दल प्रत्येकालाच कमालीची उत्सुकता असते. लग्न करण्यापूर्वी एकमेकांना पुरेसे ओळखता यावे, स्वभाव समजावेत म्हणून शहरी भागात तरुण-तरुणी एकत्र राहतात. या काळात त्यांच्यात कसले नातेसंबंध असतील, हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. त्यावर ‘निखळ मैत्री आणि बरंच काही’ हे योग्य उत्तर असू शकते.

नवी पिढी जरा जास्तच व्यवहारी आहे. ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचे आहे त्याला आपण नीट ओळखले पाहिजे, पारखले पाहिजे, हा विचार नव्या पिढीत रुजत आहे. त्यामुळेच लग्नापूर्वी तरुण-तरुणी एकत्र राहतात. या संबंधांकडे ते केवळ निखळ मैत्री म्हणूनच पाहत आहेत. या काळात दोघेही होणारा नवरा किंवा बायको म्हणून न राहता मित्र-मैत्रीण म्हणूनच राहण्याचा प्रयत्न करत असतात. एकमेकांची काळजी घेतली जाते, कोणी आजारी पडले तर काळजी घेतले जाते. त्याची सेवा केली जाते. अनेकदा रात्री जागून काढल्या जातात. तसेच होणाऱ्या जोडीदाराला काय आवडतं, काय आवडत नाही, हे पाहिले जाते. साहजिकच कालांतराने आवडी-निवडी जपल्या जातात. या काळात कसल्याही नात्याचं दडपण नसल्याने हसणं, खेळणं चाललेलं असतं. हे तटस्थपणे पाहणाऱ्यांना छान-छान वाटत असले तरी या नात्यामध्ये अनेक अडचणी जाणवत असतात.

चौकट :

गाजराची पुंगी वाजली तर वाजली

‘लिव्ह इन रिलेशन’ म्हणजे एकप्रकारे व्यवहारच असतो. एकमेकांचे स्वभाव, मन जुळले तर त्याचा शेवट गोड होतो. लग्न लावून ते संसाराला लागतात. पण त्यांच्यात नाहीच काही जुळले तर दोघेही एकमेकांना सोडून आपापल्या मार्गाने निघून जातात.

चौकट :

व्यवहार आडवा येतो अन्...

‘लिव्ह इन रिलेशन’ हे एकमेकांना ओळखण्यासाठी एक नाव असले तरी अनेकदा दोघांमधील एक व्यवहार असतो. पुणे, मुंबईतील फ्लॅटचे भाडे परवडत नाही. अशावेळी आपापल्या गावाकडील तो किंवा ती एक खोली भाड्याने घेऊन राहतात. चहा, नाष्ट्याचा खर्च विभागला जातो. त्यामुळे हे म्हणजे केवळ व्यावहारिक तडजोड समजली जाते; पण त्यातील एखादा दुसऱ्यानेच खर्च करावा म्हणून भाग पाडतो. सुरुवातीला काहीवेळा मैत्रीच्या नात्यात तो केला जातोही, पण वारंवार घडत असल्यास किंवा मुद्दाम गंडवले जात असल्याचे लक्षात आल्यावर सर्व सोडून दिले जाते. पण त्यानंतर मनाला त्रास झाल्यास ते निघून जातात.