शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

निखळ मैत्री अन् बरंच काही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

सातारा जिल्ह्यात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चे फारसे वारे आलेले नसले तरी याबद्दल प्रत्येकालाच कमालीची उत्सुकता असते. लग्न करण्यापूर्वी एकमेकांना पुरेसे ...

सातारा जिल्ह्यात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चे फारसे वारे आलेले नसले तरी याबद्दल प्रत्येकालाच कमालीची उत्सुकता असते. लग्न करण्यापूर्वी एकमेकांना पुरेसे ओळखता यावे, स्वभाव समजावेत म्हणून शहरी भागात तरुण-तरुणी एकत्र राहतात. या काळात त्यांच्यात कसले नातेसंबंध असतील, हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. त्यावर ‘निखळ मैत्री आणि बरंच काही’ हे योग्य उत्तर असू शकते.

नवी पिढी जरा जास्तच व्यवहारी आहे. ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचे आहे त्याला आपण नीट ओळखले पाहिजे, पारखले पाहिजे, हा विचार नव्या पिढीत रुजत आहे. त्यामुळेच लग्नापूर्वी तरुण-तरुणी एकत्र राहतात. या संबंधांकडे ते केवळ निखळ मैत्री म्हणूनच पाहत आहेत. या काळात दोघेही होणारा नवरा किंवा बायको म्हणून न राहता मित्र-मैत्रीण म्हणूनच राहण्याचा प्रयत्न करत असतात. एकमेकांची काळजी घेतली जाते, कोणी आजारी पडले तर काळजी घेतले जाते. त्याची सेवा केली जाते. अनेकदा रात्री जागून काढल्या जातात. तसेच होणाऱ्या जोडीदाराला काय आवडतं, काय आवडत नाही, हे पाहिले जाते. साहजिकच कालांतराने आवडी-निवडी जपल्या जातात. या काळात कसल्याही नात्याचं दडपण नसल्याने हसणं, खेळणं चाललेलं असतं. हे तटस्थपणे पाहणाऱ्यांना छान-छान वाटत असले तरी या नात्यामध्ये अनेक अडचणी जाणवत असतात.

चौकट :

गाजराची पुंगी वाजली तर वाजली

‘लिव्ह इन रिलेशन’ म्हणजे एकप्रकारे व्यवहारच असतो. एकमेकांचे स्वभाव, मन जुळले तर त्याचा शेवट गोड होतो. लग्न लावून ते संसाराला लागतात. पण त्यांच्यात नाहीच काही जुळले तर दोघेही एकमेकांना सोडून आपापल्या मार्गाने निघून जातात.

चौकट :

व्यवहार आडवा येतो अन्...

‘लिव्ह इन रिलेशन’ हे एकमेकांना ओळखण्यासाठी एक नाव असले तरी अनेकदा दोघांमधील एक व्यवहार असतो. पुणे, मुंबईतील फ्लॅटचे भाडे परवडत नाही. अशावेळी आपापल्या गावाकडील तो किंवा ती एक खोली भाड्याने घेऊन राहतात. चहा, नाष्ट्याचा खर्च विभागला जातो. त्यामुळे हे म्हणजे केवळ व्यावहारिक तडजोड समजली जाते; पण त्यातील एखादा दुसऱ्यानेच खर्च करावा म्हणून भाग पाडतो. सुरुवातीला काहीवेळा मैत्रीच्या नात्यात तो केला जातोही, पण वारंवार घडत असल्यास किंवा मुद्दाम गंडवले जात असल्याचे लक्षात आल्यावर सर्व सोडून दिले जाते. पण त्यानंतर मनाला त्रास झाल्यास ते निघून जातात.