शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निखळ मैत्री अन् बरंच काही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

सातारा जिल्ह्यात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चे फारसे वारे आलेले नसले तरी याबद्दल प्रत्येकालाच कमालीची उत्सुकता असते. लग्न करण्यापूर्वी एकमेकांना पुरेसे ...

सातारा जिल्ह्यात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चे फारसे वारे आलेले नसले तरी याबद्दल प्रत्येकालाच कमालीची उत्सुकता असते. लग्न करण्यापूर्वी एकमेकांना पुरेसे ओळखता यावे, स्वभाव समजावेत म्हणून शहरी भागात तरुण-तरुणी एकत्र राहतात. या काळात त्यांच्यात कसले नातेसंबंध असतील, हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. त्यावर ‘निखळ मैत्री आणि बरंच काही’ हे योग्य उत्तर असू शकते.

नवी पिढी जरा जास्तच व्यवहारी आहे. ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचे आहे त्याला आपण नीट ओळखले पाहिजे, पारखले पाहिजे, हा विचार नव्या पिढीत रुजत आहे. त्यामुळेच लग्नापूर्वी तरुण-तरुणी एकत्र राहतात. या संबंधांकडे ते केवळ निखळ मैत्री म्हणूनच पाहत आहेत. या काळात दोघेही होणारा नवरा किंवा बायको म्हणून न राहता मित्र-मैत्रीण म्हणूनच राहण्याचा प्रयत्न करत असतात. एकमेकांची काळजी घेतली जाते, कोणी आजारी पडले तर काळजी घेतले जाते. त्याची सेवा केली जाते. अनेकदा रात्री जागून काढल्या जातात. तसेच होणाऱ्या जोडीदाराला काय आवडतं, काय आवडत नाही, हे पाहिले जाते. साहजिकच कालांतराने आवडी-निवडी जपल्या जातात. या काळात कसल्याही नात्याचं दडपण नसल्याने हसणं, खेळणं चाललेलं असतं. हे तटस्थपणे पाहणाऱ्यांना छान-छान वाटत असले तरी या नात्यामध्ये अनेक अडचणी जाणवत असतात.

चौकट :

गाजराची पुंगी वाजली तर वाजली

‘लिव्ह इन रिलेशन’ म्हणजे एकप्रकारे व्यवहारच असतो. एकमेकांचे स्वभाव, मन जुळले तर त्याचा शेवट गोड होतो. लग्न लावून ते संसाराला लागतात. पण त्यांच्यात नाहीच काही जुळले तर दोघेही एकमेकांना सोडून आपापल्या मार्गाने निघून जातात.

चौकट :

व्यवहार आडवा येतो अन्...

‘लिव्ह इन रिलेशन’ हे एकमेकांना ओळखण्यासाठी एक नाव असले तरी अनेकदा दोघांमधील एक व्यवहार असतो. पुणे, मुंबईतील फ्लॅटचे भाडे परवडत नाही. अशावेळी आपापल्या गावाकडील तो किंवा ती एक खोली भाड्याने घेऊन राहतात. चहा, नाष्ट्याचा खर्च विभागला जातो. त्यामुळे हे म्हणजे केवळ व्यावहारिक तडजोड समजली जाते; पण त्यातील एखादा दुसऱ्यानेच खर्च करावा म्हणून भाग पाडतो. सुरुवातीला काहीवेळा मैत्रीच्या नात्यात तो केला जातोही, पण वारंवार घडत असल्यास किंवा मुद्दाम गंडवले जात असल्याचे लक्षात आल्यावर सर्व सोडून दिले जाते. पण त्यानंतर मनाला त्रास झाल्यास ते निघून जातात.