शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मंडईत जाताय; मोबाईल सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

सातारा : शहरात सध्या लाॅकडाऊनसदृश परिस्थिती असल्यामुळे मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना अत्यंत कमी आहेत. मात्र, इतर वेळी शहरात कमीत ...

सातारा : शहरात सध्या लाॅकडाऊनसदृश परिस्थिती असल्यामुळे मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना अत्यंत कमी आहेत. मात्र, इतर वेळी शहरात कमीत कमी मोबाईल चोरीच्या दोन तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. यातील सर्व तक्रारी या भाजी मंडईतील होत्या.

सातारा शहरामध्ये तीन वर्षांपूर्वी मोबाईल चोरणारी टोळी कार्यरत होती. बसस्थानकाशेजारी असलेल्या भाजी मंडईमध्ये विशेषत: मोबाईल चोरीचे प्रकार घडत होते. सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने या टोळीचा पर्दाफाश केला होता. या टोळीने तब्बल ४० हून अधिक मोबाईल जप्त केले होते. मात्र, काही दिवसांतच पुन्हा शहरात मोबाईल चोरीस जाऊ लागले. ते आजतागायत सुरूच आहे. गत वर्षी लाॅकडाऊन पूर्वी बसस्थानकासमोरील भाजी मंडईमध्ये चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. शहर पोलीस ठाण्यात रोज पाचहून अधिक तक्रारी दाखल होत होत्या. मात्र, सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे भाजी मंडई पूर्वीसारखी भरत नाही. तरीसुद्धा मोबाईल चोरीच्या दिवसाला दोन तक्रारी पोलीस ठाण्यात येत आहेत. मात्र, मोबाईल चोरीस गेल्यानंतर अनेकजण तक्रार देत नाहीत. पुन्हा मोबाईल सापडणार नाही, अशी प्रत्येकाची धारणा होते. त्यामुळे बरेचजण तक्रार देत नाहीत. एखाद्या गुन्ह्यात जर हरविलेल्या मोबाईलचा वापर झाला तर मग ज्यांनी तक्रार दिली नाही त्यांच्यावर बालंट येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपला मोबाईल हरविल्यास पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार देणे गरजेचे आहे. सध्या मात्र, तक्रारींचा ओघ कमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

५० टक्के मोबाईलचा तपास लागतच नाही

अनेकदा घरातून अथवा मंडईतून मोबाईल चोरीस गेल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाते. मात्र, चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लागत नाही. त्यामुळे अनेकजण पोलीस ठाण्यात तक्रारच देत नाहीत. तसं पाहिलं तर पोलिसांनी मनावर घेतले तर जेवढे मोबाईल चोरीस गेले तेवढे मोबाईल सापडू शकतात. एखादा मोठा गुन्हा घडल्यानंतर पोलीस लोकेशनद्वारे मोबाईलचा शोध घेतात. खून करून एखादा पसार झाला असेल तर त्याच्या मोबाईलचे लोकेशन पाहून त्याला पकडले जाते. मात्र, इथे पोलीस तत्परता दाखवत नाहीत.

मोबाईल तपास लागण्याचे प्रमाण किती?

चोरीचे मोबाईल सापडण्याचे प्रमाण केवळ २ टक्के आहे. घरफोडी, जबरी चोरी अशा प्रकरणामध्ये मोबाईल पोलिसांना सापडतात. कारण हा गुन्हा अत्यंत गंभीर असतो. त्यामुळे पोलीस या गुन्ह्यांचा शोध घेत असतानाच आरोपींसोबत मोबाईलही जप्त केला जातो. भाजी मंडईत अथवा एसटीमध्ये चढताना जर मोबाईल चोरीस गेला तर त्या मोबाईलचा तपास पोलीस तत्परतेने करत नाहीत. तपासाला वेळ नसल्याचे कारण सांगून पोलीस तपासाला टाळाटाळ करतात.

मोबाईल चोरीस जाताच हे करा

मोबाईल चोरीस गेल्यास अनेकदा काय करावे, हे बऱ्याच जणांना सुचत नाही. मात्र, घाईगडबड न करता मोबाईलमधील कार्ड ब्लाॅक करणे गरजेचे आहे. तसेच तत्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी. अनेकदा पोलीस तक्रार दाखल करताना मोबाईलची पावती मागतात. मात्र, त्यावेळी त्यांना पावती द्या. तक्रारीची पोहोच तुमच्याजवळ ठेवा. अधूनमधून पोलिसांना तपासाबाबत विचारणा करा.

मोबाईल चोरीस गेल्यानंतर प्रथमत: संबंधित व्यक्तीने पोलीस ठाण्यात यावे. मोबाईल कुठे चोरीस गेला याची माहिती पोलिसांना द्यावी. त्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा तपास लावतात. मात्र, बऱ्याचदा मोबाईल बंद असल्यामुळे पोलिसांना तपास करताना मोठ्या अडचणी ठरत असतात. परिणामी तपासाला दिरंगाई होते. नागरिकांनीही आपल्या मोबाईलची काळजी घेतली पाहिजे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी जाताना आपले पाकीट, मोबाईल सांभाळून ठेवला पाहिजे.

- सजन हंकारे, पोलीस निरीक्षक