शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मंडईत जाताय; मोबाईल सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

सातारा : शहरात सध्या लाॅकडाऊनसदृश परिस्थिती असल्यामुळे मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना अत्यंत कमी आहेत. मात्र, इतर वेळी शहरात कमीत ...

सातारा : शहरात सध्या लाॅकडाऊनसदृश परिस्थिती असल्यामुळे मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना अत्यंत कमी आहेत. मात्र, इतर वेळी शहरात कमीत कमी मोबाईल चोरीच्या दोन तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. यातील सर्व तक्रारी या भाजी मंडईतील होत्या.

सातारा शहरामध्ये तीन वर्षांपूर्वी मोबाईल चोरणारी टोळी कार्यरत होती. बसस्थानकाशेजारी असलेल्या भाजी मंडईमध्ये विशेषत: मोबाईल चोरीचे प्रकार घडत होते. सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने या टोळीचा पर्दाफाश केला होता. या टोळीने तब्बल ४० हून अधिक मोबाईल जप्त केले होते. मात्र, काही दिवसांतच पुन्हा शहरात मोबाईल चोरीस जाऊ लागले. ते आजतागायत सुरूच आहे. गत वर्षी लाॅकडाऊन पूर्वी बसस्थानकासमोरील भाजी मंडईमध्ये चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. शहर पोलीस ठाण्यात रोज पाचहून अधिक तक्रारी दाखल होत होत्या. मात्र, सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे भाजी मंडई पूर्वीसारखी भरत नाही. तरीसुद्धा मोबाईल चोरीच्या दिवसाला दोन तक्रारी पोलीस ठाण्यात येत आहेत. मात्र, मोबाईल चोरीस गेल्यानंतर अनेकजण तक्रार देत नाहीत. पुन्हा मोबाईल सापडणार नाही, अशी प्रत्येकाची धारणा होते. त्यामुळे बरेचजण तक्रार देत नाहीत. एखाद्या गुन्ह्यात जर हरविलेल्या मोबाईलचा वापर झाला तर मग ज्यांनी तक्रार दिली नाही त्यांच्यावर बालंट येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपला मोबाईल हरविल्यास पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार देणे गरजेचे आहे. सध्या मात्र, तक्रारींचा ओघ कमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

५० टक्के मोबाईलचा तपास लागतच नाही

अनेकदा घरातून अथवा मंडईतून मोबाईल चोरीस गेल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाते. मात्र, चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लागत नाही. त्यामुळे अनेकजण पोलीस ठाण्यात तक्रारच देत नाहीत. तसं पाहिलं तर पोलिसांनी मनावर घेतले तर जेवढे मोबाईल चोरीस गेले तेवढे मोबाईल सापडू शकतात. एखादा मोठा गुन्हा घडल्यानंतर पोलीस लोकेशनद्वारे मोबाईलचा शोध घेतात. खून करून एखादा पसार झाला असेल तर त्याच्या मोबाईलचे लोकेशन पाहून त्याला पकडले जाते. मात्र, इथे पोलीस तत्परता दाखवत नाहीत.

मोबाईल तपास लागण्याचे प्रमाण किती?

चोरीचे मोबाईल सापडण्याचे प्रमाण केवळ २ टक्के आहे. घरफोडी, जबरी चोरी अशा प्रकरणामध्ये मोबाईल पोलिसांना सापडतात. कारण हा गुन्हा अत्यंत गंभीर असतो. त्यामुळे पोलीस या गुन्ह्यांचा शोध घेत असतानाच आरोपींसोबत मोबाईलही जप्त केला जातो. भाजी मंडईत अथवा एसटीमध्ये चढताना जर मोबाईल चोरीस गेला तर त्या मोबाईलचा तपास पोलीस तत्परतेने करत नाहीत. तपासाला वेळ नसल्याचे कारण सांगून पोलीस तपासाला टाळाटाळ करतात.

मोबाईल चोरीस जाताच हे करा

मोबाईल चोरीस गेल्यास अनेकदा काय करावे, हे बऱ्याच जणांना सुचत नाही. मात्र, घाईगडबड न करता मोबाईलमधील कार्ड ब्लाॅक करणे गरजेचे आहे. तसेच तत्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी. अनेकदा पोलीस तक्रार दाखल करताना मोबाईलची पावती मागतात. मात्र, त्यावेळी त्यांना पावती द्या. तक्रारीची पोहोच तुमच्याजवळ ठेवा. अधूनमधून पोलिसांना तपासाबाबत विचारणा करा.

मोबाईल चोरीस गेल्यानंतर प्रथमत: संबंधित व्यक्तीने पोलीस ठाण्यात यावे. मोबाईल कुठे चोरीस गेला याची माहिती पोलिसांना द्यावी. त्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा तपास लावतात. मात्र, बऱ्याचदा मोबाईल बंद असल्यामुळे पोलिसांना तपास करताना मोठ्या अडचणी ठरत असतात. परिणामी तपासाला दिरंगाई होते. नागरिकांनीही आपल्या मोबाईलची काळजी घेतली पाहिजे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी जाताना आपले पाकीट, मोबाईल सांभाळून ठेवला पाहिजे.

- सजन हंकारे, पोलीस निरीक्षक