शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

भिलारसह गोडवली, राजपुरीमध्ये दहा दिवसांच्या लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST

पाचगणी : पुस्तकांचे गाव म्हणून जग प्रसिद्ध असलेल्या भिलार गावात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी भिलार ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवार ...

पाचगणी : पुस्तकांचे गाव म्हणून जग प्रसिद्ध असलेल्या भिलार गावात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी भिलार ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवार दि.१६ एप्रिल ते मंगळवार दि.२७ एप्रिलपर्यंत दहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला असून, या पाठोपाठ तालुक्याच्या पूर्व भागातील गोडवली, खिंगर, आंब्रळ व राजपुरी या चार गावांतील ग्रामस्थांनी स्वंयस्फूर्तीने दि. १९ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.

तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केलेल्या आदेशाला बांधिल राहत व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा बसावा, याकरिता स्वयंस्फूर्तीने अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेत जनता कर्फ्यू यशस्वी निर्णय घेण्यात आला. स्थानिक प्रशासन व व्यापारी बांधवांनी भिलारमध्ये कडक निर्बंधांंचा अवलंब करत जनता कर्फ्यूची अमंलबजावणी सुरू केली आहे. यावेळी सरपंच शिवाजी भिलारे, राजेंद्र भिलारे, अनिल भिलारे, भिलार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भिलारे, शशिकांत भिलारे, वैभव भिलारे, गणेश भिलारे, संदीप पवार, राजेंद्र चव्हाण, तलाठी शशिकांत वणवे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

१८भिलार

भिलार येथे जनता कर्फ्यूमुळे निर्मनुष्य झालेला भिलार गावचा मुख्य रस्ता.