शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

प्रभाग आरक्षणासाठी ‘अनेकांचे देव पाण्यात’

By admin | Updated: June 26, 2016 00:34 IST

खंडाळा नगरपंचायत : प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

खंंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे खंडाळ्याची निवडणूक रणधुमाळी रंगू लागली आहे. नगरपंचायतीच्या पहिल्या नगरसेवक यादीत आपली वर्णी लागावी यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, प्रभागासाठी आरक्षण आपल्या पथ्यावर पडावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. त्यामुळे सर्वांना प्रभाग रचनेचे वेध लागले आहेत. तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या खंडाळा नगरपंचायतीची घोषणा झाल्यानंतर राजकीय पटलावर रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. खंडाळा येथील प्रभाग रचनेचा प्रारूप प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासक शिवाजीराव तळपे यांनी सादर केला आहे. यामध्ये नवीन नगरपंचायतीत १७ नगरसेवक निवडून दिले जाणार असून, यामध्ये ९ महिला व ८ पुरुष असणार आहेत. ४ जुलैपर्यंत प्रभाग रचना निश्चित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या असल्याने प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. प्रभागांची संख्या आणि जातीनिहाय आरक्षणे निश्चित झाली असून, प्रभागांचा भौगोलिक आराखडा निश्चित होणे बाकी आहे. खंडाळ्यातील मुळचे ५ वॉर्डमध्ये १७ प्रभाग बनवले जाणार आहेत. याची सुरुवात उत्तरेकडून पूर्व व दक्षिण अशी होणार आहे. त्यामुळे आपल्याला सोयीस्कर प्रभाग व्हावा, अशी अपेक्षा बाळगून अनेकजण कामाला लागले आहेत. प्रभाग रचनेनंतर तेथील मतदार संख्येवरून आरक्षणे पडणार आहेत. ८ जुलैपर्यंत प्रभाग रचनेला मंजुरी मिळाल्यानंतर १४ जुलैपर्यंत आरक्षण सोडत होणार आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणूक हालचाली गतिमान होत असताना राजकीय पटलावरही प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत कामकाजाने वेग घेतल्याचे दिसत आहे. अनेक वर्षे सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसची दुसरी फळी निवडणुकीत सक्रिय झाली आहे. नियोजित प्रभागानुसार लोकांच्या भेटीगाठी घेऊन आजवर केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे. सकाळी व सायंकाळी लोकांच्या वेळेनुसार घरभेटी घेऊन पक्षाची बाजू मजबूत केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीनेही खंडाळा नगरपंचायतीसाठी कंबर कसली असून, चौकाचौकांमध्ये कार्यकर्त्यांची सल्लामसलत सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. खंडाळ्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा कलगीतुरा जगजाहीर आहे. कोणत्याही गोष्टीवरून श्रेयवादाचे राजकारण येथे घडताना वारंवार पाहायला मिळते. याच गोष्टीचा फायदा उठवून शिवसेना आणि भाजपा यांनी आपले बस्तान पक्के करण्यावर भर दिला आहे. तर रिपब्लिकन पक्षाने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. (प्रतिनिधी) तिसऱ्या आघाडीला खतपाणी खंडाळ्यात यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच जोरदार लढाई झाली आहे. मात्र, नगरपंचायतीचे व्यासपीठ हे वेगळ्या धर्तीवर मानले जाते. एका प्रभागातून एकालाच संधी असल्याने ज्याचे काम जनमाणसात चांगले आहे त्याला नगरसेवकपदाची संधी मिळू शकते. त्यामुळे प्रभागरचनेनंतर शिवसेना आणि भाजपा यांची ताकद एकटवून अंतर्गत नाराजांना बरोबर घेऊन सक्षम तिसरा पर्याय उभा करण्याच्या हालचालीही पडद्यामागून सुरू आहेत. असा प्रयोग झाल्यास निवडणूक वेगळ्या धर्तीवर होण्याची दाट शक्यता आहे.