शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

पश्चिम भागात अवतरलाय माणसांमधील ‘देव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:38 IST

वाई : कोंढावले - देवरुखवाडी, जांभळी आणि जोर येथे झालेल्या भूस्खलनाला सात दिवस झाले. या दुर्घटनेत चारजणांचा मृत्यू झाला, ...

वाई : कोंढावले - देवरुखवाडी, जांभळी आणि जोर येथे झालेल्या भूस्खलनाला सात दिवस झाले. या दुर्घटनेत चारजणांचा मृत्यू झाला, पशुधन गाडले गेले. हक्काची घरे बेचिराख झाली, संसार मातीमोल झाला अन् सोन्यासारख्या जमिनीचा अक्षरशः ‘चिखल’ झाला. निराधार, बेघर झालेल्या इथल्या जनतेकडे आता शहर व तालुक्यातून मदतीचा ‘पूर’ वाहू लागला आहे. माणसातील ‘देव’ इथं अवतरल्याचे चित्र अनुभवायला येत आहे.

अस्मानी संकटाने पश्चिम भागाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर काळवंडलाय. दुःखाचे धूर सर्वदूर पसरलेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली इथली टुमदार गावं, वाड्या-वस्त्यांवर स्मशानशांतता पसरली आहे. इथल्या माणसांना दिवस-रात्र मृत्यू आजूबाजूला घोंगावताना दिसतोय.

जोरची माय-लेकरं अजून सापडली नाहीत. अख्ख गावं चिंतातूर आहे. काय त्यांनी पाप केलं होतं? निसर्गाला देव मानणाऱ्या या भूमीत अघटित घडलं कसं? असा प्रश्न इथल्या प्रत्येकाला पडला आहे.

अतिवृष्टीचे ‘ते’ चार दिवस जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या या कष्टकऱ्यांना पिण्यासाठी ना स्वच्छ पाणी आहे ना खायला आहे. कधीही मृत्यू कवटाळेल, या भीतीने त्यांची तहान-भूक हरवली होती. आता कुठे ही लोकं बोलती झाली आहेत. त्या दिवसांचा क्षण ना क्षण ते सांगताहेत.

संसार उघडे पडलेल्या या ‘जीवांना’ आपण एकटे पडलो नाही, आपल्याला सावरायला आहे कोणीतरी येतंय या जाणीवेने ते सर्वजण सुखावले होते.

वाईच्या दिशेने तरुण, आबाल- वृद्ध गटागटाने येत आहेत. सोबत खाण्यापासून सर्व काही आणताहेत. सर्व काही भारावून टाकणारं. खचलेल्या माणसाला पुन्हा ‘मनाने’ उभं करण्याचं ‘पुण्य’ आज अनेक संघटनांचे, राजकीय पक्षांचे तरुण करताना दिसत आहेत. माणुसकी अजून जिवंत आहे, यांचा प्रत्यय आज पश्चिम भाग अनुभवतोय.

रविवारी पावसाचा जोर मंदावला. एनडीआरएफ पथकाच्या माध्यमातून जोरला प्रशासकीय यंत्रणाही पोहोचली. पाठोपाठ सामाजिक संघटनेचे कार्यकर्तेही अन्न, धान्य, पिण्याचे पाणी, सर्व जीवनावश्यक वस्तू घेऊन पोहोचले. सह्याद्री ॲकॅडमी, रुद्रशंभू प्रतिष्ठान, हिंदुस्थान प्रतिष्ठान, आरपीआयचे कार्यकर्ते, रोटरी क्लब, सर्वोदय सेवा ट्रस्ट, काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्था, संघटना याशिवाय अनेक दानशूर व्यक्तींनी इथे मदत पोहोचवली आहे. जगण्याची खात्री नसलेल्या इथल्या माणसाला या सर्वांनी जी मदत केली आहे त्याची पैशात किंमत होऊ शकत नाही.

सरकारची मदत मिळेल तेव्हा मिळेल पण स्वखर्चाने माणसं उभं करण्याचे महत्तम काम पुरोगामी विचारांचा वाई तालुका करत आहे. या तमाम तरुणांना, संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते-पदाधिकारी साऱ्यांना सलाम..!

चौकट...

वाईतील डॉक्टर्सही उतरले सेवेसाठी

या परिसरातील आजारी रूग्णांना दवाखान्यात पोहोचणे अवघड झाले आहे. ही अडचण लक्षात घेऊन वाईतील डॉ. प्रकाश कासुर्डे, डॉ. शैलेश देढे, डॉ. योगेश फरांदे , डॉ. गजानन गव्हाणे, डॉ. दिनेश हरियाल, डॉ. नीलेश देखमुख, डॉ. सागर धोत्रे, डॉ. केतन शहा, डॉ. पवनकुमार सोनावणे, डॉ. संदेश शिंदे, डॉ. रमेश जाधव यांनी दुर्घटनाग्रस्त गावात जाऊन देवरुखवाडीसह परिसरातील पाचशेहून अधिक ग्रामस्थांची मोफत तपासणी करताना त्यांना मोफत औषधेही दिली. यानंतरही उर्वरित गावात मोफत उपचार केले जाणार आहेत.

फोटो... अतिदुर्गम जोर गावात असंख्य अडचणींचा सामना करत सामाजिक कार्यकर्ते अन्न-धान्य सोबत घेऊन पोहोचत आहेत.