शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

पश्चिम भागात अवतरलाय माणसांमधील ‘देव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:38 IST

वाई : कोंढावले - देवरुखवाडी, जांभळी आणि जोर येथे झालेल्या भूस्खलनाला सात दिवस झाले. या दुर्घटनेत चारजणांचा मृत्यू झाला, ...

वाई : कोंढावले - देवरुखवाडी, जांभळी आणि जोर येथे झालेल्या भूस्खलनाला सात दिवस झाले. या दुर्घटनेत चारजणांचा मृत्यू झाला, पशुधन गाडले गेले. हक्काची घरे बेचिराख झाली, संसार मातीमोल झाला अन् सोन्यासारख्या जमिनीचा अक्षरशः ‘चिखल’ झाला. निराधार, बेघर झालेल्या इथल्या जनतेकडे आता शहर व तालुक्यातून मदतीचा ‘पूर’ वाहू लागला आहे. माणसातील ‘देव’ इथं अवतरल्याचे चित्र अनुभवायला येत आहे.

अस्मानी संकटाने पश्चिम भागाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर काळवंडलाय. दुःखाचे धूर सर्वदूर पसरलेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली इथली टुमदार गावं, वाड्या-वस्त्यांवर स्मशानशांतता पसरली आहे. इथल्या माणसांना दिवस-रात्र मृत्यू आजूबाजूला घोंगावताना दिसतोय.

जोरची माय-लेकरं अजून सापडली नाहीत. अख्ख गावं चिंतातूर आहे. काय त्यांनी पाप केलं होतं? निसर्गाला देव मानणाऱ्या या भूमीत अघटित घडलं कसं? असा प्रश्न इथल्या प्रत्येकाला पडला आहे.

अतिवृष्टीचे ‘ते’ चार दिवस जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या या कष्टकऱ्यांना पिण्यासाठी ना स्वच्छ पाणी आहे ना खायला आहे. कधीही मृत्यू कवटाळेल, या भीतीने त्यांची तहान-भूक हरवली होती. आता कुठे ही लोकं बोलती झाली आहेत. त्या दिवसांचा क्षण ना क्षण ते सांगताहेत.

संसार उघडे पडलेल्या या ‘जीवांना’ आपण एकटे पडलो नाही, आपल्याला सावरायला आहे कोणीतरी येतंय या जाणीवेने ते सर्वजण सुखावले होते.

वाईच्या दिशेने तरुण, आबाल- वृद्ध गटागटाने येत आहेत. सोबत खाण्यापासून सर्व काही आणताहेत. सर्व काही भारावून टाकणारं. खचलेल्या माणसाला पुन्हा ‘मनाने’ उभं करण्याचं ‘पुण्य’ आज अनेक संघटनांचे, राजकीय पक्षांचे तरुण करताना दिसत आहेत. माणुसकी अजून जिवंत आहे, यांचा प्रत्यय आज पश्चिम भाग अनुभवतोय.

रविवारी पावसाचा जोर मंदावला. एनडीआरएफ पथकाच्या माध्यमातून जोरला प्रशासकीय यंत्रणाही पोहोचली. पाठोपाठ सामाजिक संघटनेचे कार्यकर्तेही अन्न, धान्य, पिण्याचे पाणी, सर्व जीवनावश्यक वस्तू घेऊन पोहोचले. सह्याद्री ॲकॅडमी, रुद्रशंभू प्रतिष्ठान, हिंदुस्थान प्रतिष्ठान, आरपीआयचे कार्यकर्ते, रोटरी क्लब, सर्वोदय सेवा ट्रस्ट, काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्था, संघटना याशिवाय अनेक दानशूर व्यक्तींनी इथे मदत पोहोचवली आहे. जगण्याची खात्री नसलेल्या इथल्या माणसाला या सर्वांनी जी मदत केली आहे त्याची पैशात किंमत होऊ शकत नाही.

सरकारची मदत मिळेल तेव्हा मिळेल पण स्वखर्चाने माणसं उभं करण्याचे महत्तम काम पुरोगामी विचारांचा वाई तालुका करत आहे. या तमाम तरुणांना, संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते-पदाधिकारी साऱ्यांना सलाम..!

चौकट...

वाईतील डॉक्टर्सही उतरले सेवेसाठी

या परिसरातील आजारी रूग्णांना दवाखान्यात पोहोचणे अवघड झाले आहे. ही अडचण लक्षात घेऊन वाईतील डॉ. प्रकाश कासुर्डे, डॉ. शैलेश देढे, डॉ. योगेश फरांदे , डॉ. गजानन गव्हाणे, डॉ. दिनेश हरियाल, डॉ. नीलेश देखमुख, डॉ. सागर धोत्रे, डॉ. केतन शहा, डॉ. पवनकुमार सोनावणे, डॉ. संदेश शिंदे, डॉ. रमेश जाधव यांनी दुर्घटनाग्रस्त गावात जाऊन देवरुखवाडीसह परिसरातील पाचशेहून अधिक ग्रामस्थांची मोफत तपासणी करताना त्यांना मोफत औषधेही दिली. यानंतरही उर्वरित गावात मोफत उपचार केले जाणार आहेत.

फोटो... अतिदुर्गम जोर गावात असंख्य अडचणींचा सामना करत सामाजिक कार्यकर्ते अन्न-धान्य सोबत घेऊन पोहोचत आहेत.